वादळ
एक आला झोका ,
सगळ्यांच्या हृदयाचा वाजला ठोका .
पाखराने केली किलबिल,
त्यांच्या जीवाची झाली चिलबिल .
झाडांना राहिले नाही भान ,
त्यांच्या वर टिकले नाही पान .
वाऱ्याची वाढली गती ,
फुल फळांची झाली वाईट स्थिती .
मच्छी मरानी केली लगबग ,
त्यांच्या नौकाची झाली डगमग .
नदीने पकडला सूर,
माशांना लागली हुर हुर.
शेतकऱ्यांची वाढली चिंता ,
पिकांची वाटू लागली त्यांना खंता .
नदीला आला पूर ,
पाखरे उडाली भूर भूर .
जोरात वारा देखील सुटला ,
आमचा दरवाजा पण तुटला.