महाराष्ट्र देश माझा
(ह्या कवितेत महाराष्ट्रातील किती गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आलेला आहे ते कृपया मोजावे).
सातपुडा सह्याद्रि अन दख्खन
विदर्भ मराठवाडा खानदेश अन कोंकण
कृष्णा गोदावरी तापी भीमा अन कावेरी
काटक राकट पवित्र बनवी भूमी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी १
ऊस कापूस हापूस अन पायरी
कांदा नारळ केळी द्राक्ष अन संत्री
गहू धान ज्वारी नाचणी अन बाजरी
धनधान्य फळांची इथे रेलचेल भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी २
हस्तिनापुराच्या महालात युवराज देवव्रत चिंताग्रस्त होऊन फेऱ्या घालत होते. महाराजांची प्रकृती गेल्या सप्ताहात बरीच खालावली होती. वैद्यांनीही हात टेकले होते. तरीही राजवैद्य सतत प्रयत्न करत होते. महाराजांची प्रकृती अशी खंगावत चाललेली पाहत रहाणे आता देवव्रतसाठी कठीण झाले होते. माताश्री आणि पिताश्री यांचे प्रेम कधी एकत्र लाभलेच नाही. माताश्री तर पित्याची सेवा करण्याचा आदेश देउन निघून गेल्या आणि पिताश्रींची तब्येत अशी! आपण वैद्यकशास्त्र अवगत केले असते तर आज ही वेळच आली नसती. तत क्षणी बाकी सर्व विद्या देवव्रतला व्यर्थ वाटत होत्या.
हस्तिनापुरात आनंद वार्ता पसरली. सम्राट प्रतिप यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. पुरुवंशाचा दिपक! बाळाला हातात घेउन सम्राटनी प्रेमाने त्याच्या तेजस्वी मुखकमलावरून हात फिरवला. "शंतनू....!" त्यांच्या मुखातून नाव बाहेर पडताच सर्वांनी युवराज शंतनू च्या नावाने जयघोष सुरु केला. ढोल-नगारे वाजवत जल्लोषाचे ध्वनी हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरले.
"ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे,
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे"
ह्या लोकप्रिय गाण्याची आर्तता मला खर्या अर्थाने कळली ती उरणमधील लोहार दादांची भेट घेतल्यावरच. माझ्या ऑफिसला जाण्याच्या वाटेवरच मला बरेचदा हे लोहार काम दृष्टीस पाडायचा त्यामुळे ह्या कलेबद्दल जाणून घेण्यासाठी एक दिवस माझ्या पतीसोबत मी उत्सुकतेपोटी लोहार परिवाराची भेट घेतली.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा!
युगांतर- आरंभ अंताचा!
मराठीत संख्या वाचण्याची पद्धती बदलण्यावरून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बराच उहापोह आणि गदारोळ झाला. त्यानिमित्ताने सहज काही निरीक्षणं केली. सुदैवाने खालील संकेतस्थळ मला सापडले ज्यावर एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या तसेच त्यापुढील शतक सहस्र इत्यादी संख्या जगातील अनेक भाषांत कसे लिहितात ते सांगितले आहे (पण त्यात त्यांनी मराठी मात्र घेतलेली नाही!):
https://www.omniglot.com/language/numbers/
शोध मराठीपणाचा : संपादन - अरुणा ढेरे,भूषण केळकर, दिनकर गांगल (ग्रंथाली )
भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्याबरोबर पहिले आंघोळ आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. आंघोळ केल्याशिवाय सहसा लोक बाहेर कामाला पडत नाहीत. अनेक जण चहासुद्धा घेत नाहीत. लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर आंघोळ हे इतके डोक्यात पक्के बसले होते की इतर संस्कृती/प्रदेशात दुसरी कुठली पद्धत असेल असे मनातदेखील कधी आले नाही.
(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)
सध्या एक पत्रिका सोशल मीडीयात धुमाकूळ घालतेय. एबीपी माझाने सुद्धा ही बातमी कव्हर केली. पालगर इथल्या एका रिक्षाचालकाचे बेबी नावाच्या एका मुलीशी सूत जुळले. ते एकत्र राहू लागले. काही वर्षांनी त्याचे सूत पुन्हा रिना नावाच्या दुस-या मुलीशी जुळले. ती ही यांच्या बरोबर राहू लागली. अशी पाच सहा वर्षे झाली. दरम्यान रीनाला एक अपत्य झाले.
आता एकाच मांडवात हे तिघेही लग्न करीत आहेत. या लग्नाची पत्रिका सध्या चर्चेचा विषय झालेली आहे. मात्र त्यात आश्चर्य करण्यासारखे फक्त एकच कारण आहे ते म्हणजे एकाच मांडवात दोघींशी लग्न.