संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क.
खरेच सार्वजनिक गणेशोत्सव बन्द झाला पाहिजे.
>>>>>
मायबोलीवर आज हे वाक्य वाचले.
आणि असं वाटले कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसतेय..
निसर्गाच्या सानिध्यात असणार अस आमचं छोटंसं उरण हे मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रमाणेच माझ्या ऋदयात घर करून आहे. आमच्या उरणमध्ये मोरा बंदर, करंजा बंदर व पिरवाडी -दांडा या निसर्गसंपन्न समुद्रकिनार्यांची झालर आहे. पिरवाडीचा समुद्रकिनारा हा आम्हा रहिवाशांसाठी मनःशांती, करमणुकीचे मोठे स्रोत आहे. सुट्टीच्या दिवसांत अनेक पर्यटक ह्या समुद्रकिनारी भेट देऊन मनात आनंद घेऊन जातात. उरणमध्ये पूर्वी खूप खाड्या होत्या, मिठागरे होती. परंतू आता औद्योगिककरणामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. तरीही काही खाड्या शाबूत आहेत. त्यातील पाणज्याची खाडी ही विदेशी रोहीत पक्षांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध आहे.
भारत का दिल देखो : तान्हा पोळा, मारबत आणि गोटमार
इडा पीडा, रोगराई, भ्रष्टाचार घेऊन जाय गे मारबत ...
इबोला, स्वाईन फ्लू, मंदी घेऊन जाय गे मारबत..
काही अर्थ लागतोय का? नागपूरकरांना नक्कीच लागला असेल.
दरवर्षी येतो पावसाळा आणि पावसाळा संपता संपता येतो बैलपोळा.
इकडे विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरतो तान्हापोळा.
“दहीहंडी”
शब्दरचना:- तुषार खांबल/महेश घाणेकर
काल रक्षाबंधनानिम्मित बहिणीकडे गेलो होतो. सोसायटीच्या आवारात १५-२० लहान मुले दहीहंडीचा सराव करताना दिसली. त्यांच्या एकंदरीत हावभावावरून हा सण कसा करायचा याबाबत चिंतातुर असावे असं वाटत होत.
त्यांच्याच दुसऱ्या बाजूला त्या सोसाटीमधील काही जेष्ठ (३५ ते ४५ वयोगटातल्या) व्यक्ती बसलेल्या होत्या. आम्ही असताना कसे सर्व छान चालायचं, कसे सण साजरे होत असत, आम्ही कसे थर लावायचो यावर फुशारक्या मारत बसले होते.
महाराष्ट्र देश माझा
(ह्या कवितेत महाराष्ट्रातील किती गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख आलेला आहे ते कृपया मोजावे).
सातपुडा सह्याद्रि अन दख्खन
विदर्भ मराठवाडा खानदेश अन कोंकण
कृष्णा गोदावरी तापी भीमा अन कावेरी
काटक राकट पवित्र बनवी भूमी भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी १
ऊस कापूस हापूस अन पायरी
कांदा नारळ केळी द्राक्ष अन संत्री
गहू धान ज्वारी नाचणी अन बाजरी
धनधान्य फळांची इथे रेलचेल भारी
महाराष्ट्र देश माझा, लई भारी, लई भारी २
हस्तिनापुराच्या महालात युवराज देवव्रत चिंताग्रस्त होऊन फेऱ्या घालत होते. महाराजांची प्रकृती गेल्या सप्ताहात बरीच खालावली होती. वैद्यांनीही हात टेकले होते. तरीही राजवैद्य सतत प्रयत्न करत होते. महाराजांची प्रकृती अशी खंगावत चाललेली पाहत रहाणे आता देवव्रतसाठी कठीण झाले होते. माताश्री आणि पिताश्री यांचे प्रेम कधी एकत्र लाभलेच नाही. माताश्री तर पित्याची सेवा करण्याचा आदेश देउन निघून गेल्या आणि पिताश्रींची तब्येत अशी! आपण वैद्यकशास्त्र अवगत केले असते तर आज ही वेळच आली नसती. तत क्षणी बाकी सर्व विद्या देवव्रतला व्यर्थ वाटत होत्या.
हस्तिनापुरात आनंद वार्ता पसरली. सम्राट प्रतिप यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. पुरुवंशाचा दिपक! बाळाला हातात घेउन सम्राटनी प्रेमाने त्याच्या तेजस्वी मुखकमलावरून हात फिरवला. "शंतनू....!" त्यांच्या मुखातून नाव बाहेर पडताच सर्वांनी युवराज शंतनू च्या नावाने जयघोष सुरु केला. ढोल-नगारे वाजवत जल्लोषाचे ध्वनी हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरले.