दिनांक २१ फेब्रुवारी २०५७: एक अंत्ययात्रा चाललेली आहे, शहरातले सर्व आणि देशातले काही दिग्गज पोलिस अधिकारी, राजकारणी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक जमलेले होते. स्वतः श्रीमती तेजस्विनी विष्णू कुलकर्णी पुढे चालल्या होत्या, अर्थातच, अंत्ययात्रा त्यांच्या पतीची डॉ. विष्णू कुलकर्णी यांची होती. तेजस्विनीला माहित होते कि येथे जमलेला एकूण एक व्यक्ती हा फक्त उद्या येणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोत दिसण्यासाठी इथे जमलेला होता. प्रत्यक्षात जरी विष्णू कुलकर्णी यांनी कुणाशी शत्रुत्व केले नाही तरी त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना भरपूर शत्रू मिळाले होते.
प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे.
कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात.
हजार शब्दांच्या आतील कथांचं नामकरण मी खालीलप्रकारे केलं आहे -
संशोधन गुप्त होतं म्हणून तो गप्प बसला नाहीतर ‘युरेका युरेका’ असं ओरडत नागडं पळाला असता. पण ज्याच्यामुळे या शोधाची प्रेरणा मिळाली त्या जैवशास्त्रज्ञ मित्राला बातमी देणं आवश्यक होतं. डॉक्टर नाकतोडेने शंकुपात्रात पडून असलेला मोबाईल उचलला अन लंबेला कॉल केला
“बुट्ट्या, लगेच प्रयोगशाळेत ये.”
“नंतर येतो, सध्या मी माकडांना डान्स शिकवतोय.”
“त्यांचं सोड, इथे आल्यावर तूच डान्स करायला लागशील. बेट्या तू शापमुक्त होणार आज.”
“काय सांगतोस नाकतोड्या. आलोच बघ शून्य मिनिटात.”
सातव्या मिनिटाला तो डॉक्टर नाकतोडेच्या प्रयोगशाळेत होता.
मोठ्या शहरांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण व बिकट होत चालला आहे. औद्योगिक क्षेत्रे एकसारखी वाढत चालली असून त्यामुळे शहरे अयोग्य प्रकारे वाढत आहेत. शहरी लोकसंख्या सर्व बाजूंनी वाढत असून ही वाढ रोखणे अथवा टाळणे अवघड आहे. तसेच लोकसंख्या वाढीचे अंदाजही पुष्कळदा चुकतात. यामुळे शहरांना होणारा पाण्याचा पुरवठा हा नेहमी कमीच पडत राहतो. पुढील तीस वर्षांचा हिशोब करून दिलेले पाणी पाच-दहा वर्षांत कमी पडु लागते.
निसर्गात मिळणार्या पाण्याचे मुख्यतः दोन वर्ग करण्यात येतात : (१) भूमिगत पाणी व (२) पृष्ठभागावरील पाणी.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
स्पेस एक्स, टेस्ला मोटर्स आणि मस्क :
मंगळ ग्रहावर जर पहिला मानव कोणी नेईल तर असा विश्वास वाटतोय ते काम स्पेसएक्स (SpaceX) च करेल...
मी अगदी सुरवाती पासुन मस्क साहेब व ते करत असलेल्या कामचा फॅन आहे...
त्यांच्या पेपाल च्या स्थापने पासुन ते SpaceX पर्यंत चा प्रवास मला तरी थक्क करतो..
आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते. कधी कधी त्याचे जाळे किती मजबूत आणि उपयोगी असते यावर एखादा लेख आपण वाचलेला असतो. घरातल्या गृहीणींना तर “काय मेले कोळीष्टके करून ठेवतात, सारखी सारखी साफ करावी लागतात” असेच वाटत असते. पण स्पायडरमॅन चित्रपटामुळे कोळी आपल्याकडे मुलांमधे भलतेच "पॉप्युलर" झाले आहेत. पण नवलाची गोष्ट अशी की आपल्या भारतात हजारो जातीचे वेगवेगळे छोटे मोठे कोळी आढळतात.
mypedia हे अॅप कोणी वापरते का? काही शाळा या अॅपचा उपयोग करतात असे कळले. या अॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?
. . . . . जड पदार्थांना वस्तुमान असतं तर अजड गोष्टी ह्या चैतन्यस्वरूपात असतात, त्यांना वस्तुमान नसतं. जड देह आणि अजड आत्मा हे गणितीय परिभाषेत अपसंख्येने म्हणजेच complex number notation ने दाखवता येतात. अपसंख्येचे दोन भाग असतात :
१. स्थूलांक (real part) आणि
२. सूक्ष्मांक (imaginary part)