श्री नृसिंह स्तोत्र
कडकडकड स्तंभी स्फोट विस्फोट मोठा
गुरगुरगुर व्यापी व्योम पाठी धपाटा
दणदणदण नादे भूमी ती कापताहे
धगधगधग ज्वाळे नेत्र विस्फारताहे
सळसळसळ स्कंधी कुंतले रुळताहे
अकटविकट मुखे सिंह तो गर्जताहे
लखलखलख नेत्री तेज ते फाकताहे
लळलळलळ जिव्हा भक्ष्य ते शोधताहे
झडकरि उचलोनी दैत्य तो घेतलासे
धड न घर न मार्गे उंबर्यामाजी बैसे
करकरकर दाती काळ सन्निध भासे
खरखर नख तीक्ष्णे दैत्य तो फाडिलासे
रुधिर गळत देही भीषणे दृष्य सारे
थरथरथर कापे लोकसृष्टी थरारे
रेनूकेच्या सूता तुला शिवाचे वरदान ।
अन एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।धृ।।
सर्व भक्त शिवाचे, तूच एकमेव शिष्य।
प्राप्त त्यांच्याकडून तुला, पिनाक धनुष्य।।
जन्म घेऊन ब्राम्हणाचा, क्षत्रियाचे केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।१।।
सहस्त्रबाहुने जेव्हा केले, कैद रावणाला।
शिवाच्या आज्ञेने गेला, त्यासी सोडविण्याला।।
वध करून पाहरेकर्यांचा, पूर्ण केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।२।।
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥
प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन....
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.
जगात इतकी विषमता का असावी असा प्रश्न कधी तरी प्रत्येकाला पडतोच. एखादी व्यक्ती जन्मजात गरीब असते ती गरिबीतच मरते. काही रॅग्ज टू रीचेस कथा असतात तर जन्मापासूनच काही जण स्टिंकिंग रिच असतात. दोन बालकं एकाच इस्पितळात एकाच वेळी जन्म घेतात पण नंतर त्यांच्या आयुष्यात फरक पडतो. एकाला दूध महाग तर दुसऱ्याच्या तोंडाला सोन्याचा चमचा.
दोन्ही बालके निष्पाप, देवाचे अंश, मग असं फक्त एकाच्याच वाट्याला का? काहीजण गौतम बुद्ध प्रवृत्तीचे, संतवृत्तीचे तर काही हिटलर, पॉल पॉट. कोणी जन्मजात कलाकार, शास्त्रज्ञ उत्कृष्ट लेखक, कवी किंवा गणितज्ञ असतात तर काही जण
गेल्या काही महिन्यांपासून फेबुवर मराठी भाषाप्रेम टिपेला पोहचले आहे. विविध ग्रुपांतून मराठी शब्दांची उत्पत्ती, इंग्रजी शब्दांसाठी मराठी शब्द शोधणे हे सुरु आहे. दक्षिण भारतीय भाषांमधे बनणारे सिनेमे हे नेहमीच बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षा कथा,पटकथेच्या दृष्टीने कसे दर्जेदार असतात ते पटवून देण्यात बॉलीवूडविरोधक पुढे असतात. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील महानगरांमधे हिंदी भाषिकांकरवी होणारे हिंदी भाषेचे आक्रमण हे स्थानिक भाषांची गळचेपी करत असल्याबद्दलची अोरड तर नेहमीच होते. हिंदीची दादागिरी थांबवा अशी फेसबुकी आंदोलने बरीच सुरु आहेत. जोडीला सावरकरप्रेमींची भाषाशुद्धी आहेच.
आपल्या सनातन किंवा हिंदु धर्माचा नविन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. १३ एप्रिलला शालिवाहन शकेप्रमाणे १९४३ वे वर्ष सुरू होतं आहे. माझ्या लहानपणी सगळेच सण धार्मिक व कौटुंबिक द्रुष्टीकोनातून साजरे व्हायचे. त्यामुळे मोठ्यांबद्दल आदर, इतरांबद्दल सहिष्णूता, माया, ममता ही सगळी नैतिक मुल्ये जपली जायची. एकमेकांच्या सहकार्यामुळे समाजात सुख, शांतता होती. म्हणून सध्ध्यांच्या रोजच्या बातम्यांमधुन, जगांतली वाढत असलेली अस्थिरता व कमी होतं असलेली शांतता व मानवतां फार जाणवते. म्हणूनच, मी या वर्षी, नविन विचारांची "मानवतेची गुढी" स्थापन करायचे ठरवल आहे.
अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।
महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
अंतरंग – भगवद्गीता – भाग ९
झळकत कटि शोभे पीत वस्त्रे जयास
कनक किरिट माथी उज्वले नीलभास
शर धरि कर स्कंधे सज्ज कोदंड दंडा
असुरगण गळाठे हर्ष भक्ता उदंडा
मृदुल स्मित खुणावी ना भी संसारदुःखा
कर तरि नित पाठी धीर देई प्रभूचा
सजल जलद मोही रुप या राघवाचे
निशिदिनि मनी ध्याता मूळ तुटे भवाचे
अवतरण जयाचे भाविका उद्धराया
निजजन हित वाहे देऊनी नामछाया
असे आगळा राम आदर्शमूर्ती
जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे
असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती
बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे
जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती