बारह माह - माघ/फाल्गुन - (६)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 15:53

मार्गशीर्ष(नव्हेम्बर/डिसेंबर)
पौष(डिसेंबर/जानेवारी)

माघि मजनु संगि साधूआ धूड़ी करि इसनानु ॥
हरि का नामु धिआइ सुणि सभना नो करि दानु ॥
जनम करम मलु उतरै मन ते जाइ गुमानु ॥
कामि करोधि न मोहीऐ बिनसै लोभु सुआनु ॥
सचै मारगि चलदिआ उसतति करे जहानु ॥
अठसठि तीरथ सगल पुंन जीअ दइआ परवानु ॥
जिस नो देवै दइआ करि सोई पुरखु सुजानु ॥
जिना मिलिआ प्रभु आपणा नानक तिन कुरबानु ॥
माघि सुचे से कांढीअहि जिन पूरा गुरु मिहरवानु ॥१२॥

माघ महीन्यात हिंदूंमध्ये प्रयाग आदि तीर्थक्षेत्रात स्नान महत्वाचे समजले जाते. गुरु अर्जन दास जी म्हणतात - सत्संगत प्राप्त करा. तीर्थक्षेत्री जाउन केलेल्या स्नानाचे फळ तुम्हाला सज्जन, साधू संताम्च्या सहवासातच लाभेल. अशा संत सज्जनांचय चरणधूळीत स्नान करा अर्थात त्यांची भेट घ्या, त्यांचे विचार ऐका, आचरणात आणा. अनेक जन्मांच मळ आनि कुसंस्कारांची वासनांची मनावरील पुटे दूर होतील. अहंकार, गर्व, मी-मी-मी पणा यांना तिलांजली मिळेल. नामस्मरण केल्यानेच काम, लोभ, क्रोध अशा दोषांच्या जाळ्यात आपण फसणार नाही. आणि धर्माचरणामुळे इहलोकातही मानच मिळेल. फक्त नामस्मरण केल्याने ६८ तीर्थक्षेत्रांत स्नान केल्याचे पुण्या प्राप्त होइल. हे नानक, असे जीव ज्यांनी ईश्वरास प्राप्त केलेले आहेत त्यांना माझे शतकोटी प्रणाम. फक्त असेच जीव जे की गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर अथक चालत आहेत, या माघ महीन्यामध्ये (स्नान न करताही) पुण्यवान झालेले आहेत.

बारावा व शेवटचा महीना आहे फाल्गुन. हा महीना २ शब्द जोडुन बनलेला आहे फळ + गुण अर्थात या महीन्यात जीवास त्याने आतापर्यंत केलेल्या नामस्मरनाचे, सत्संगाचे, धर्माचरणाचे, भकसद्गि, सद्गुणांचे फळ प्राप्त होते तो महीना.

फलगुणि अनंद उपारजना हरि सजण प्रगटे आइ ॥
संत सहाई राम के करि किरपा दीआ मिलाइ ॥
सेज सुहावी सरब सुख हुणि दुखा नाही जाइ ॥
इछ पुनी वडभागणी वरु पाइआ हरि राइ ॥
मिलि सहीआ मंगलु गावही गीत गोविंद अलाइ ॥
हरि जेहा अवरु न दिसई कोई दूजा लवै न लाइ ॥
हलतु पलतु सवारिओनु निहचल दितीअनु जाइ ॥
संसार सागर ते रखिअनु बहुड़ि न जनमै धाइ ॥
जिहवा एक अनेक गुण तरे नानक चरणी पाइ ॥
फलगुणि नित सलाहीऐ जिस नो तिलु न तमाइ ॥१३॥

थंडीनंतर येतो फाल्गुन - रंगांची उधळण करणारा महीना. या महीन्यात होळी येते तसेच ज्या जीवरुपी वधूंनी सतत ईश्वराचे स्मरण केलेले आहें त्यांच्या हृदयात सत्चितानंद फुलण्याचा हा महीना आहे. आतावरच्या, संतांच्या संगतीचे, फळ मिळण्याचा महीना. इच्छा तृप्तीचा महीना. हा महीना उत्सवी आहे, लाभदायक, मोक्षदायक आहे. या वधूंना त्यांच्या पतीची प्राप्ती झालेली आहे. आणि जीवाचे जन्ममृत्यूचे फेरे वाचलेले आहेत. हे नानक आपल्याला एकच मुख आहे पण ईश्वराचे गुण अगणित आहेत. त्यांचे वर्णन आपल्या मर्यादेबाहेरचे आहे. त्याचा जयजयकार करु यात.
------------------------------------------------

बारह माह मांझ ची पुढील शेवटची पौरी. यामध्ये सारांश आहे. नामस्मरण, सत्संग, गुरुकृपा , दोषमुक्त रहाणे, मायेपासून दूर रहाणे हेच यातही आहे.

जिनि जिनि नामु धिआइआ तिन के काज सरे ॥
हरि गुरु पूरा आराधिआ दरगह सचि खरे ॥
सरब सुखा निधि चरण हरि भउजलु बिखमु तरे ॥
प्रेम भगति तिन पाईआ बिखिआ नाहि जरे ॥
कूड़ गए दुबिधा नसी पूरन सचि भरे ॥
पारब्रहमु प्रभु सेवदे मन अंदरि एकु धरे ॥
माह दिवस मूरत भले जिस कउ नदरि करे ॥
नानकु मंगै दरस दानु किरपा करहु हरे ॥१४॥

-समाप्त-

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users