14th फेब्रुवारी 2019
माझी मनीमाऊ,
Wish you a very happy birthday dagadi
साऱ्यांसाठी आज Valentine's day असेल. आमच्यासाठी तुझ्या वाढदिवसाहून मोठे काहीच नाही.
मी आज सिक्कीम हून आसामला आले. आजच्या दिवशी दुसऱ्या कोणाला पत्र लिहावंसं वाटत नाही. आणि दगडी तू मोठं पत्र वाचणार पण नाहीस म्हणून तुझ्यासाठी goodbye Sikkim असा व्हिडीओच तयार केला.
इथे गोहाटी स्टेशन वर बसून तुझ्यासाठी हा व्हिडीओ बनवायचे उपद्व्याप चालू आहेत. इथे पुढची तारीख उजाडली तरी तिथे कालची तारीख संपायच्या आधी पत्र तुला मिळेलच.
नीट रहा. गुणी आहेसच. तशीच रहा. Love you
मम्मा
डिसक्लेमर - लेखिका ज्योतिषावरती विश्वास ठेवते. या धाग्याचा स्कोप, तो विश्वास योग्य आहे की अयोग्य हा नाही.
स्वामींना केलेली एक छोटीशी प्रार्थना
"जब लडका लडकी राजी तो क्या करेगा काजी"
हे वाक्य तर तुम्ही ऐकलं असेलच, पण जेव्हा ही गोष्ट "आंतरजातीय विवाह" यावर येते तेव्हा मध्ये येतो तो सर्वात मोठा शत्रू म्हणजे "समाज".
या धाग्यावरील कविता अन्यत्र हलवली आहे
आपल्या पुरातन कालगणनेचे गणित, विश्वाच्या आधुनिक कालमापनाशी किती जुळते ? सर्वसाधारणत: पंचागात या कालमापनेचे गणित दिलेले असते. अनेकांना हे गणित माहीत आहे, पण या लेखात आवश्यक वाटले म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती करत आहे.
(इथे एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध ही अंकगणना विचारात घेतली आहे.)
महाराष्ट्रात जर फसवणीस साहेबांना त्यांचे आवडते विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर दक्षिणेतील एका प्रसिद्ध देवस्थानाला घरापासून उलटे चालत जाईन असा नवस बोललो होतो. तरी या साठी काय काय तयारी करायला हवी ? काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती हवी आहे. अनुभवी व जाणकारांचे अनुभव वाचायला आवडतील. हातकाही पुरूषांना उलटे चालत जाताना वेगळी काळजी घ्यावी लागते का ? (जर कुणी असेलच तर म्हणून असू द्यावी माहीती. ऐन वेळी कुठे धागा काढत बसू ?)
मायबोलीकरांकडून सहकार्याच्या प्रतिक्षेत.
हिंदू धर्मातील जुनाट कर्मठ चालीरीती , परंपरा आणि कालबाह्य , तर्कविसंगत शास्त्रनियम व रूढी फेकून देवून नवीन कालसुसंगत धर्मशास्त्र निर्मितीच्या प्रयत्नांकरिता हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!!
धर्मशास्त्रात काही "स्थिर तत्त्वे" व काही "चल तत्त्वे'" आहेत असे म्हटले जाते . "कर्म" आणि "क्रिया" या भिन्न आहेत जसे की स्वतःच्या शारीरिक क्रिया म्हणजे जेवणे , न जेवणे , आंघोळ , शौचक्रिया इत्यादी . ह्या क्रिया म्हणजे कर्म नव्हे . कर्म तेव्हाच बनते जेव्हा त्या क्रियेमागे विशिष्ट हेतु अस्सतो . व त्या हेतुनुरूप ते कर्म चांगले अथवा वाईट ठरते .
आई तुझ्या चरणांची सेवा घडू दे
तुझ्यावरी आई माझा जीव जडू दे
कोल्यांची बाय तू लाडाची हाय
तुलाच माझ्या मनीचं ठाय
डोंगरावर तुझा दरबार भरू दे
तुझ्यावर आई माझा जीव जडू दे
लेकरांवर तुझी पाखर हाय
चंदनपालखी तुझी दिमाखात जाय
माणिकमोत्यांची फुलं तुला वाहू दे
चाफेनं आई तुझी परडी भरु दे
खणानारळानं तुझी ओटी भरीन
तांबुलविडा आई तुला अर्पिन
चरणांची आई तुझ्या सेवा घडू दे
तुझ्यावर बाय माझा जीव जडू दे
___________________________________
रेणु राजाची सुकन्या ऋषी जमदग्नींची भार्या
हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल , शंकर, ब्रह्मदेव अशा कालापरत्वे आता मुख्य असलेल्या देवता आहेतच पण पूर्वेची देवता इंद्र, पश्चिमेची वरुण, दक्षिण - यम, उत्तर - कुबेर, वगैरे दिकपालही आहेत. अनेक देवी आहेत, काही देवींचे पुत्र जसे पार्वतीचा स्कंद व गजानन वगैरे वगैरे. कुलदेवता तर निराळ्याच - एकविरा, शांतादुर्गा, जोतिबा वगैरे.
नक्की कोणाची उपासना करायची व का? त्याचेही ढोबळ नियम आहेत.
उदाहरणार्थ - लक्ष्मीची समृद्धीसाठी, नरसिंहाची ऋणमुक्तीकरता (ऋणमोचन स्तोत्र घ्या ना), गणपतीची बुद्धीसाठी वगैरे.
.