धर्म

मंदिरे/धार्मिक संस्था

Submitted by केअशु on 24 August, 2020 - 05:19

दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_
बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?

भजेहम् भजेहम् ।। (स्त्री दृष्टिकोन)

Submitted by अस्मिता. on 31 July, 2020 - 22:16

श्रीहरी स्तोत्रम् ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई गणेशोत्सव २०२० पूर्वतयारी व श्रींचे आगमन

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2020 - 22:38

आज श्रावणी शुक्रवार. भाद्र्पद लागल्यावर श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल व पूर्वतयारीचे वेध लागले आहेत. कोविड परिस्थितीनुसार थोडे बदल करून हा सर्वांचा आवडता सण साजरा करायचा आहे.

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना सोपे जावे म्हणून सरकारने बसेस आयोजित केल्या आहेत. ऑन लाइन पोर्टल वर आपापल्या गटाची नोंद करून त्या नुसार दिल्या गेलेल्या बस ने जायचे यायचे आहे. दोन्ही तारखा व क्वारंटाइन चे दिवस पक्के केले जातील व ते संभाळून गावाकडे गर्दी न करता
उत्सव साजरा करायचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

माया नावाची संकल्पना

Submitted by सामो on 22 July, 2020 - 14:09

मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.

अप्रिय आठवणींपासून सुटका

Submitted by शाम भागवत on 6 July, 2020 - 00:04

मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

Submitted by शीतल उवाच on 27 June, 2020 - 01:33

गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..

अंतरंग - भगवद्गीता - भाग ५

Submitted by शीतल उवाच on 20 June, 2020 - 08:41

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.

अंतरंग – भगवद्गीता – ४

Submitted by शीतल उवाच on 17 June, 2020 - 05:58

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥

अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

Submitted by शीतल उवाच on 15 June, 2020 - 12:29

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

Pages

Subscribe to RSS - धर्म