बारह माह - मार्गशीर्ष/पौष- (५)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 15:13

अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)

कार्तिक महीन्यानंतर येणारा मार्गशीर्ष, कडाक्याची थंडी घेउन येतो. हिवाळा ऐन भरात आहे. अर्जन दास म्हणतात -

मंघिरि माहि सोहंदीआ हरि पिर संगि बैठड़ीआह ॥
तिन की सोभा किआ गणी जि साहिबि मेलड़ीआह ॥
तनु मनु मउलिआ राम सिउ संगि साध सहेलड़ीआह ॥
साध जना ते बाहरी से रहनि इकेलड़ीआह ॥
तिन दुखु न कबहू उतरै से जम कै वसि पड़ीआह ॥
जिनी राविआ प्रभु आपणा से दिसनि नित खड़ीआह ॥
रतन जवेहर लाल हरि कंठि तिना जड़ीआह ॥
नानक बांछै धूड़ि तिन प्रभ सरणी दरि पड़ीआह ॥
मंघिरि प्रभु आराधणा बहुड़ि न जनमड़ीआह ॥१०॥

कडाक्याच्या थंडीच्या मार्गशीर्ष महीन्यात पतीजवळ असलेली स्त्री सुंदर भासते. अशा वधू ज्या त्यांच्या पतीसमवेत आहेत त्या सर्वाधिक सुंदर दिसतात, त्यांच्या रुपगुणाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात. संतसज्जानांच्या सहवासात ईश्वरभक्तीत रममाण होणारे भाविक लोक लोभस दिसत आहेत. परंतु ज्या लोकांना संतसंगतीच प्राप्त झालेली नाही त्यांची अवहेलना होते. तीळाच्या वाळक्या रोपट्यासारखे बिन मालकाचे असे हे अभक्त आहेत. असे अभक्त जेव्हा सत्संगतीवीण दिवस कंठतात तेव्हा त्यांच्यावरती अनेक दुर्गुण झडप घालतात. आणि अशा दुर्गुणांनी आधीच त्रास पावलेले हे लोक शिवाय यमाच्या फासात अडकतात. पण ज्या वधूंना त्यांच्या पतीची प्राप्ती झालेली आहे त्या वधू स्वतःला कटाक्षाने या दुर्गुणांपासून दूर ठेवतात. रत्नमाळांऐवजी, ईश्वराच्या नामाचीच माळ गळ्यात परीधान केलेल्या या जीवरुपी वधूंपाशी कोणतेही संकट अथवा दुर्गुण फिरकायचे धाडस करत नाहीत. नानक अशा संतांच्या पायधूळीची सुद्धा पूजा करु इच्छितात जे संत सदैव ईश्वरचरणी रुजू असतात. मार्गशीर्ष महीन्यात केलेले नामस्मरण , व्यक्तीचा जन्ममरणाचा फेरा चुकविते.
या पौरींमध्ये अर्जन दास जी यांनी दुर्गुण, मोह-ममता आष्डरिपूंपासून दूर रहाण्याकरता, सत्संगाची महती गायली आहे.

पोखि तुखारु न विआपई कंठि मिलिआ हरि नाहु ॥
मनु बेधिआ चरनारबिंद दरसनि लगड़ा साहु ॥
ओट गोविंद गोपाल राइ सेवा सुआमी लाहु ॥
बिखिआ पोहि न सकई मिलि साधू गुण गाहु ॥
जह ते उपजी तह मिली सची प्रीति समाहु ॥
करु गहि लीनी पारब्रहमि बहुड़ि न विछुड़ीआहु ॥
बारि जाउ लख बेरीआ हरि सजणु अगम अगाहु ॥
सरम पई नाराइणै नानक दरि पईआहु ॥
पोखु सोहंदा सरब सुख जिसु बखसे वेपरवाहु ॥११॥

पौष महीन्यात थंडीचा कडाका इतका वाढतो की जनजीवन ठप्प होते. सर्व लोक घरात, ऊबेत दडून बसतात. बाहेर पडत नाहीत. तेव्हा अशा पौष महीन्याबद्दल बोलताना अर्जन दास म्हणतात - जे लोक तनामनाने ईश्वरचरणी रुजू झालेले आहेत, त्यांना गारठा बाधत नाही, त्यांना थंडीचा त्रास होत नाही. असे लोक कोणत्याच मोहाच्या , दोषांच्या आहारीही जात नाहीत त्यांना आस असते ती फक्त प्रभुचरणाची. ईश्वराचे चरण हेच त्यांचे सर्वस्व असते त्यांना ईश्वरचरणाची फक्त ओढ असते. मायेचे आवरण त्यांना ना बाधू शकते ना विघ्न घालते. फक्त गोविंद-गोपाळ अर्थात ईश्वराची स्तुती हे त्यांचे ध्येय रहाते. असे ईश्वरभक्त काही औरच माझा त्यांना लाख लाख दंडवत. हे नानक परमात्म्याच्या द्वारी तिष्ठत असलेले हे जीव फक्त सद्गतीच पावतात. पौष महीना ईशरी कृपा ज्यांवरती झाली अशा लोकांना आरामदायी व शांतपूर्ण जातो.

माघ(जनेवारी/फेब्रुवारी)
फाल्गुन(फेब्रुवारी/मार्च)

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users