संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?
मी , आधीच चिठ्ठी सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतोच त्यात, इन्स्पेक्टर म्हणाले होते, आरोपी सापडलाय. एवढ्या लवकर यांना आरोपी कसा सापडला ? माझ्या मनात असं आलं म्हणून गैरसमज करून घेऊ नका. एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यावर ,माझा या घटनेशी काहीच संबंध नव्हता हे पटलं असेलच .निदान तुम्ही तरी नक्कीच विश्वास ठेवाल.......मग मला अचानक वाटलं, पोलिसांनी हा गुगली तर टाकला नव्हता. पण मी ती शक्यता झटकून टाकली ,कारण माझा अजून तरी पोलिसांवर थोडा विश्वास होता. बघता बघता,गाडी पो. स्टेशनच्या आवारात शिरली. मी घाईघाईने इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमधे शिरलो. ते वाट पाहातच होते. त्यांनी बसण्याची खूण केली.
*लढाई*
नेहमीप्रमाणे अपेक्षित टार्गेट पूर्ण न झाल्याने बॉसचे फायरिंग ऐकून जड पावलाने बँकेबाहेर पडलो. रोजचंच होतं हे.
“अगं किती वेळ व्हरांड्यात होतीस? तुझ्यासाठी आलोय ना मी?” मी आई वर चिडलो.
“अरे नाही रे. ती खूप वर्षांनी आली म्हणून,” आईने चक्क स्पष्टीकरण कसे दिले हा प्रश्न पडला.
“काय गं एवढी खूश दिसतेस, कोण आलं होतं?”
“अरे ती भिकारीण.”
“काय? एवढा वेळ भिकारणीशी बोलत होतीस? असं कोणाबरोबर ही काय गप्पा मारतेस? थोडं ‘स्टॅंडर्ड’ वागत जा,”
मी तिच्यावर डाफरत असतानाच ती चिडली, “ए तुझे तोंड बंद कर आधी. तू मला शिकवायचे नाही. आवाज खाली!”
“अगं पण ही लोकं खोटं बोलतात. आपण कष्ट करून खातो मग ह्यांना कामं करायला काय होतं?”
'एम टी आयवा मारू' हे एका व्यापारी जहाजाचं नाव आहे. हे जहाज स्वतःचे कर्मचारी स्वतः निवडतं. जो एकदा आयवा मारू वर काम करतो, त्याला त्या जहाजाचं आकर्षण खेचून आणतं. असा साधारण प्लॉट.
कादंबरीच्या निवेदकाचं नावही अनंत सामंत असंच आहे. हे निवेदन वाचकांना समोर ठेवून केलेलं नाही. डायरी फॉर्मॅटमध्ये केलेलं हे लिखाण आहे.. 'चला, आता मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगतो', असलं काही नाही.
निवेदक जिथं कुठं असतो, तो भवताल, इमारती, रस्ते, थंडी, ऊन, आभाळ, मनस्थिती सगळं चित्रासारखं आपल्यापुढं उभं करतो. पार्श्वभूमी शब्दांतून उभी करतो. सामंतांना हे चांगलं जमतं, असं मला वाटतं.
माझा मित्र अनिल. दापोलीला महाविद्यालयीन शिक्षणावेळचा माझा वर्गमित्र. तेंव्हा पासूनच तो काहीसा अबोल आणि अतीसंवेदनशील वगैरे. चार मित्रांच्या घोळक्यात फार न बोलता कडेला उभा राहून विनोदांची मजा घेणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला ठाण्याला एका स्थानिक वृत्तपत्रात नोकरी मिळाली.
'लव अंकुश' या डोंबिवली येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात माझे 'चित्रपट' विषयक शब्दकोडे प्रसिद्ध झाले आहे

हळद आणि हडळ - भाग २ पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. Notionpress.com वर उपलब्ध आहे.
अस्तित्व ..!!
तिलोत्तमाने आईच्या फोटोला फुलांचा हार घातला. बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला. फोटोतल्या आपल्या आईच्या हसऱ्या चेहर्याकडे एकटक बघणाऱ्या तिलोत्तमा वाटलं, आईने आपल्या जीवनात आई आणि वडीलांची दोहोंची भूमिका एकाचवेळी पार पाडली. ... आपल्या दुःखाचा, एकाकीपणाचा कुठलाही ऊहापोह न करता... अगदी निखळ आनंदाने..!
मात्र ह्या हसऱ्या चेहर्यामागे अफाट दुःख असावं, इतरांना न जाणवणारी वेदना लपलेली असावी.. जी कधीच कुणापुढेही उघड झालेली नाही आणि आता आईचं ह्या दुनियेतून अस्तित्वचं लोप पावल्याने ती उघड होण्याची काडीमात्र शक्यताच उरलीसुरली नव्हती..