मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
समाज
काय देवा कसा आहेस?
"पहिल्यांदाच लिहिलय , कृपया समजून घ्या. माझा आणि लेखनाचा तसा संबंध कमीच.."
देव आहे कि नाही या प्रश्नावरून वाद आहे पण कदाचित ज्या शक्तीवर हे निसर्ग चक्र सुरु आहे त्या शक्तीला देव हे नाव दिले गेले असेल .माझा मुद्दा देव आहे कि नाही हा नाहीये . त्यामुळे तो विषय राहू देत .
आज ऑफिसमध्ये बसले होते आणि नेहमीप्रमाणे खुर्ची मधून उठता उठता बोलले .."अरे देवा "..जस कि आपण "अग आई ग " पण म्हणतो तसच ..
बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे
मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण
बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे
सहभाग-
वैभव जोशी
सुषमा सावरकर जोग
प्राची दुबळे
अपर्णा वेलणकर
सूत्रसंचालन- उत्पल व.बा.
नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
लोकशाहीत नक्की उत्तरे आहेत का?
डॉ. अनिल अवचट आणि ओरिगामीसह एक सुरेख संध्याकाळ
काही व्यक्तींच्या आस्तित्वाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. भोवतालच्या सर्वाना सकारात्मक उर्जा मिळते. डॉक्टर अनिल अवचट म्हणजे बाबा यांपैकी एक.
२०१०च्या पर्किन्सन दिनादिवशी मित्रमंडळाच्या स्नेहमेळाव्याला ते प्रमुख पाहुणे म्हणुन आले होते. त्यावर्षीचा विषय 'आर्टबेस थेरपी' असा होता. डॉ. अवचटानी ओरिगामी, चित्रे, बासरी असं करत सर्वाना दिड तास खिळवून ठेवल होत. तेंव्हापासुन पर्किन्सन्स मित्रमंडळाच्या सर्वानाच ओरिगामी शिकायची होती. २०१३या वर्षाची सुरुवात आणि तिळगूळ समारंभ या कार्यक्रमात तो योग आमच्या शुभार्थी श्रद्धा भावे यांनी जुळवून आणला.
ओज-शंकराची कहाणी
पुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन'
सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे.
मन्ह्या गावन्या गप्पा!
नमस्कार लोकेसहो!
इब्लिसनी आठेनी पोस्ट दखीसन मन्ह्या गावनी याद उनी. काय याद दिधी भौ तु 'डोलची'नी! तुम्ही बी लिखाच आते धुय्यानी धुयवडवर!
http://www.maayboli.com/node/42113
तर आपला गावन्या आठवनी लिहिन्याकरता हाई धागा काढा. तठा गप्पानां बाफ व्हावाडी देत, म्हनुन हाउ बाफ.:) तर लोकेसहो, तुम्हन्या गावना बद्दल काही याद उनी, काही लिखानं शे त आठे लिखानं.
सुरवात मी करस! मन्हं गाव धुळे. आते धुळवडना विषय निघेल शे तं त्यावर लिखस.
वेताळ आणि वेताळ
‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल..