mi maayboliwar navin aahe. kalach aley. mazyz computerwar bahuda marathi akshara umtat nahit kay karu kahi sangu shakal ka?
mi maayboliwar navin aahe. kalach aley. mazyz computerwar bahuda marathi akshara umtat nahit kay karu kahi sangu shakal ka?
नमस्कार लोक्स.
मी इथे "नियमित"पणे "पडिक" रहायला लागुन ६-७ महिने झालेत.
पण आजकाल अनपेक्षितपणेच "दाद" यांचे काही लेख वाचायला मिळालेत.
मस्त वाटले वाचुन. त्यातले काही "जुन्या मायबोली वरुन" असेही आहेत.
तर या धाग्याचा उद्देश असा आहे, की हे "जुनं सोनं" नव्यांनाही दाखवा..."
म्हणजेच "जुन्या मायबोलीचे कपिल देव-सुनिल गावसकर" आम्हालाही भेटवुन
हे टॉप क्लास क्रिकेट वाचायला द्या आम्हालाही.
सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..
"जुन्या मायबोली" च्या काळापासुन तिथे असलेल्यांना आग्रहाची नम्र विनंती.
* आधीच असा धागा असल्यास सांगा. लग्गेच हे बंद!
१९७५ सालच्या दरम्यान कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली. गावातले लोक तिला वायमन गार्डन, वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे. खरंतर ते Wyman Gordon होतं. माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard, आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे. तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते. पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली. चार शिफ्ट, त्यासाठी नेणार्या आणणार्या बसेस, मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या, टेम्पो इत्यादी वाहनांची जा/ये सतत चालू असायची.
माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm
सकाळ पुणे आवृत्ती (दि. ७ मे २०१० मधे आलेला फोटो)


उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.
माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.
पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.
देणार्याचे देत जावे, घेणार्याने घेत जावे; घेता घेता घेणार्याने, देणार्याचे हात घ्यावे -- असे तुमचे-आमचे विंदा असे म्हणालेत. जगभराच्या कानाकोपर्यात वसलेल्या मायबोलीकरांनी आपली पुस्तके एकमेकांसोबत वाटून घ्यावीत असे इथे कित्येक वाचकांना वाटत असेल. इथे तुम्ही तुमच्याकडील पुस्तकाची यादी करा. तुम्ही कुठल्या गावात-शहरात-देशात राहतात ते लिहा. पत्ता लिहू नका. फोन न. लिहू नका. फक्त यादी लिहा. म्हणजे पुस्तके देता-घेता येतील आणि त्यातून नवीन मित्रही जमतील. ही कल्पना मीनूने सुचवली आहे. मी फक्त अमलात आणत आहे. हे जर तुम्ही करू शकलात, वेळ असल्यास, तर तेच तुमचे विंदांना मी देणे म्हणेल.
नंदनने सुचवल्याप्रमाणे मी इथे हा बीबी उघडत आहे जेणेकरुन त्या बीबीवर भेट न देत असलेली मंडळी चटकन इथे येऊन लिहितील.
मराठी साहित्य संमेलन, ग्रंथप्रदर्शन -२ ०१०, पुणे इथे अजून पुस्तकांची विक्री सुरु आहे का? कुणीकुणी भेट दिली? कुठली पुस्तके विकत घेतलीत? नवीन पुस्तके कुठली घेतली? नवीन काय काय होते.. हे सर्व लिहा.
मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.
मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
आत्ता थोडा वेळेपर्यत मला खात्री होती की मी ठीक होतो.
मराठी साहित्यसंमेलनात काय चाललंय म्हणून नेटवर शोध घेतला तर साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण सापडलं, मला कोण आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात अख्खं भाषण प्रिंट करून घेतलं. म्हटलं वाचूया मस्त बसून.
http://www.sahityasammelan2010.org/sites/default/files/pdf/D_B_Kulkarni_...