साहित्य

भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी

0

भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी

बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.

जिप्सी

साधारणत: साडेसहाचा सुमार असेल. गजबजलेल्या रानडे रोडवरुन 'तो' प्लाझाच्या दिशेने चालत होता.आजूबाजूला लोकांची तुफान गर्दी होती. असंख्य वाहनांचे हॉर्न एकामागून एक वाजतच होते. या प्रचंड तोबा गर्दित जो तो आपआपल्या ठिकाणी भरभर जाऊ पहात होता. संध्याकाळ असूनही उन कायम होतं. उन्हात वाहनांच्या काचा चमचमत होत्या. एक प्रकारचं चैतन्य सगळ्या वातावरणात भरुन राहिलं होतं. त्याची पावलंही त्या गर्दित भराभर पडत होती. पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक त्याच्या ह्रुदयाची धडधड वाढत होती. अखेर एकदाचं जिप्सी आलं. त्याने क्षणभर श्वास घेतला आणि तो आपल्या नेहमीच्या टेबलावर जाऊन बसला. ओळखीच्या वेटरने त्याला पाहून हात वर केला.

लॉराचे ' लिटल हाऊस '

0

लहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.

नभाचे शब्द स्वच्छंदी : गझल सहयोगचा मुशायरा

'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. त्यानिमित्ताने एक गझल मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आलेले आहे

तपशीलः

मुशायर्‍याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'

दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार

समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००

स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे

संयोजन - अजय जोशी व बेफिकीर

सहभागी गझलकारः

डॉ. अनंत ढवळे

श्री. मिलिंद छत्रे

श्री. केदार पाटणकर

डॉ. ज्ञानेश पाटील

श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस

श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट

श्री. अजय जोशी

लेखन प्रकल्पासाठी सहभागाचे आवाहन

Dear Friends,
I am embarking on a new literary project. This is a Marathi book with "20*20" as the title. Apart from the usual 20/20 or 6/6 perfect vision or "India 2020" vision, the title is so because I am going to compile 20 stellar profiles of young budding Marathi administrators along with 20 implementable and practical ideas collected from Marathi folks for betterment of India. Hence the name of the book is "20*20".

स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके

0

मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.

१) http://www.new.dli.ernet.in/

माझ्या आवडीचे पुस्तक-परिच्छेद

0

जेंव्हा नवीन असं काही वाचायला जवळं नसतं किंवा नवीन असे वाचताना आकलन व्हायला हवी असलेली मनाची स्थिती नसते, तेंव्हा संग्रही असलेलं आणि आधीच वाचलेलं पुस्तक मी घेतो आणि त्या पुस्तकांच कुठलं पान मला निदान विरंगुळा तरी देईल हे मला इतकं छान माहिती असतं की बरेचदा ते ते पान.. त्या त्या पानावरील ते ते परिच्छेद मुखपाठ व्हायला लागतात.

पुष्कळशी पुस्तके ही पहिल्या पानापासून अगदी अखेरच्या पानापर्यंत वाचनिय नसतात पण अधून-मधून लेखकाला मनापासून स्फुरलेलं काहीतरी असतं आणि तो ते चांगलं लिहून जातो.

पानझड - ना. धों. महानोर

0

ना. धों महानोर ह्यांचा मी वेगळा परिचय करुन द्यायची काहीच गरज नाही. स्मित महानोरांच्या कविता ह्या मुख्यतः निसर्गाशी संबंधित असतात. कवि आपल्या लेखनीतून निर्सगाचे त्याला भावलेले वर्णन वाचकापर्यंत नुस्ते पोहचवतच नाही तर त्यांना आपल्या सोबत त्याचा भावविश्वात घेउन जातो. त्यांचा कविता वाचताना आपल्यातील एका वेगळ्याच "मी" ची जाणिव झाल्याशिवाय राहत नाही. हा "मी" जसा निसर्गाच्या वर्णनाने आंनदतो तसाच तो अंतर्मूख झाल्याशिवाय राहत नाही.

हे असं का घडतं??

हा मी जुन्या मायबोलीवर लिहिलेला एक लेख आहे. एका तत्कालिक घटनेवर मनात उठलेल्या प्रतिक्रियेवर. त्या वेळेला मनात फार चलबिचल झाली होती. असे कसे घडू शकेल असे प्रश्न होते आता दोन तीन वर्षानंतर ती घटना देखील नीट आठवत नाहिये. रोजच्या अमानुष खून्, बलात्कार आणि अतिरेकी कारवाया. काय काय लक्षात ठेवणार. आणि किती लक्षात ठेवणार??

कदाचित माझे मन मुर्दाड बनत चाललेय.
किंवा कदाचित या घटना आता "नॉर्मल" झाल्या आहेत.

साहित्याचे निकष यावर माझे मत

0

नमस्कार

या फलकावर तुम्ही चांगल्या साहित्याची निवड करताना कुठले निकष लावता यावर लिहा. ज्यानी त्यानी विचारविनिमय करुन आपापले मत प्रामाणिक होऊन मांडावे. स्पष्टीकरण देता आले तर अजून छान. अलिकडे मायबोलिवर चांगल्या कवितांची निवड होते आहे. पुढे कधीतरी आणखी कुठल्या तरी साहित्यप्रकारचीही निवड केली जाईल. त्यावेळी इथली बहुसंख्य मते विचारात घेता येतील.