मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
साहित्य
विकास
गाव- पांदीत पायाचा , आता उमटेना ठसा
सांदीकोपऱ्यात उभा , गाव रडे ढसाढसा ...
ओढ आटली; जिव्हाळा, नात्यातला हरपला
अंगणातला पिंपळ, उभ्या उभ्या करपला...
रस्ते डांबरट झाले, वीज उजळते गाव
मिणमिण कंदिलास, कवडीचे मोल भाव...
लेकबाळ माहेराला, सणासुदीला पारखी
मायमाऊली सचिंत, लागे उचकी सारखी...
चिल्या-पिल्यांचा गलका, नाही पदराशी झोंबी
चिंचा आवळे सुकले, गेली करपून ओंबी...
गुरावासरांचा गोठा; नाही हंबरत गाय
डेअरीच्या दुधावर, मेली येईनाच साय...
माझा लेखन प्रपंच!
माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे.
आमचे धोत्रे गुरुजी (भाग ७)
अजूनही हवी तशी पक्की माहिती मिळत नव्हती.आम्ही हॉटेल वर परत आलो. विचार करता करता लक्षात आलं की त्या दिवशी मला दम देणारी माणसं शंकरभैया ऊर्फ शंकर पाटलाची होती. दोनतीन दिवसात फार काही साधेल असं वाटत नव्हतं. मलाही माझी नोकरी होती.बॉससुद्धा फार दिवस जमवून घेईल असं वाटत नाही.असो..... आता शंकर पाटलाचा वाडा शोधला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर देखणे आणि पवार यांना न सांगता मी स्वतःच भटकायला निघालो. तसं आता बदलेलं गाव मी फारसं पाहिलं नव्हतं. भिडे आळीतून जाता जाता बरीच आरसीसी कन्स्ट्रक्शन दिसली. आमच्या वेळी जिथे जंगल होतं तिथे घरं दिसली.
लिखाण असे घडले
लिखाण असे घडले
खरंतर लेखन कसे घडले/घडते ह्या सांगण्याचा मला काहीच अधिकार नाहीय. कारण माझी ‘लेखनसंपदा’ ती कित्ती.. तर चार-सहा कथा अन् तितपतच कविता! पण कुणीसं काहीतरी म्हटलंय नं, ‘हंसाचे चालणे.. म्हणोनी कोणी..’
तर मला लहानपणापासून वाचनाची आत्यंतिक आवड. म्हणजे आठवतंय तेव्हापासून वाचतेच आहे. अक्षरओळख केव्हा झाली, ते सुद्धा आठवत नाही, पण अगदी लहान असल्यापासून, बाबांचं बोट धरून रस्त्याने चालतांना माझं लक्ष मात्र दुकानांवरच्या पाट्यांकडे असायचं.
थरांवर थर
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
थरांवर थर
सुमा रिक्षेतून उतरली, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. कशी बशी रिक्षेतून तिने तिची अवजड लोखंडी ट्रंक एकटीनेच खाली काढली. थंडीचे दिवस होते, तरी एवढा वेळ सायकल रिक्शा चालवल्याने, घामाघूम झालेला रिक्षेवाला घाम पुसत होता. तिने दुसरी छोटी बॅग काढून ट्रंकेवर ठेवली. पर्स मधून पैसे काढून त्याला दिले, अन् त्याने रिक्शा वळवली, तशी ती कुंपणाचं लाकडी फाटक उघडायला वळली.
फाटक उघडतांना तिचं लक्ष आता घराकडे गेलं. सगळी कडे अंधार होता. रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात दिसलं, घराच्या दाराला कुलूप होतं.
मोबाईल.....
उतरणीच्या भेटी
दुपारचं जेवण झालं. बाईंनी मागचं टेबल आवरलं, भांडी विसळून ती जागेवर लावून ठेवली. आणि त्या, “पुढचं दार लावून घ्या. मी येते संध्याकाळी येते” म्हणून गेल्या. रामरावांनी अंगणातली खुर्ची थोडसंच उन्ह अंगावर येईल अशा बेतानं ठेवली आणि सकाळच्या पेपरमधलं शब्दकोडं सोडवायला घेतलं. मन तसं निवांत होतं, कुठे जायचं नव्हतं आणि कुणी येणारही नव्हतं. मुलं परदेशात आपापल्या ठिकाणी, त्यांचे फोन आले तरी रात्री नाहीतर सकाळीच. त्यांची बायको निर्मलाला जाऊनही आता पाच वर्ष होत होती. ती गेल्यापासून त्यांचा दिनक्रम असाच असायचा. नशिबानं बाई चांगली मिळाली होती, म्हातारपणाच्या काळ्या छायेचं अस्तित्व त्यांना जाणवतं तर होतंच.
कुलवधु
संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?
कुलवधु
संध्यासमयीच्या विझत्या सोनेरी किरणांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दिवसभर तळपणारे रविराजही आता श्रांत, क्लांत होऊन क्षितिजाच्या दिशेनी मार्गक्रमण करत होते. तसं पाहता हा त्यांचा रोजचाच दिनक्रम होता. या अहोरात्र चालणाऱ्या प्रवासाची त्यांना सवय होती. रोज संध्यासमयी या सृष्टीचा निरोप घेताना मनात एक ओढ असायची - दुसऱ्या दिवशी पुन्हा परतून येण्याची… आपल्या सहस्त्ररश्मी पुन्हा एकदा धरतीवर विखुरण्याची ! पण आज मात्र रविराजाचं मन जणू छिन्न-विच्छिन्न होत होतं ; आक्रंदून स्वतःलाच विचारत होतं…'आता उद्यापासून कोणासाठी परतून यायचं ? आपलं हे ओजस्वी अस्तित्व कोणाला दाखवायचं ?