अक्षरवार्ता

नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील. दर महिन्याला निवडक अशा पुस्तकांतील काही भाग इथे आपल्याला वाचता येईल. ही पुस्तकं मायबोलीवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्रंथाली, राजहंस, मृण्मयी, चिनार, समकालीन यांसारख्या मातब्बर प्रकाशनांचं सहकार्य आपल्याला यासाठी मिळाले आहे.

'युगमुद्रा' - बाबा आमटे : साधना, वारसा आणि प्रेरणा

Submitted by चिनूक्स on 23 December, 2014 - 14:41

परवा, म्हणजे २६ डिसेंबर रोजी बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता होते आहे. या दिवशी लोकबिरादरी प्रकल्पाच्या नव्या, अत्याधुनिक दवाखान्याचा लोकार्पण सोहळा हेमलकशाला होणार आहे. बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्तानं महारोगी सेवा समिती आणि आमटे कुटुंबीय यांच्या सहकार्यानं तयार झालेल्या मेनका प्रकाशनाच्या 'युगमुद्रा' या पुस्तकाचं प्रकाशनही याच कार्यक्रमात होणार आहे.

'मला (न) कळलेले बाबा' - श्री. विलास मनोहर

Submitted by चिनूक्स on 21 December, 2014 - 11:46

'श्रम ही है श्रीराम हमारा' असं कायम म्हणणारे मुरलीधर देविदास आमटे, म्हणजे बाबा आमटे अनेकांना माहीत आहेत ते 'महारोगी सेवा समिती'चे संस्थापक म्हणून. कुष्ठरोगी-अंध-अपंग-आदिवासी यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणारी ही संस्था गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. बाबांचं कुष्ठरोग-निर्मूलनाचं, अंध-अपंग-आदिवासी यांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचं काम खूप मोठं असलं, तरी बाबांची तत्त्वं, त्यांची मतं ही त्यांच्या संस्थेच्या परिघात अडकून राहिली नाहीत.

'नाही लोकप्रिय तरी' - बर्ट्रांड रसेल (अनु. - डॉ. करुणा गोखले)

Submitted by चिनूक्स on 13 August, 2014 - 02:58

Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free.

- बर्ट्रांड रसेल

बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे.

विषय: 

'शोध स्वामी विवेकानंदांचा' - डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर

Submitted by चिनूक्स on 27 January, 2014 - 11:58

समाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.

जय महाराष्ट्र! - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्री. प्रकाश अकोलकर

Submitted by चिनूक्स on 21 October, 2013 - 13:46

'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा. बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही त्यांच्या निधनामुळे बदलली.

'गोष्टी सार्‍याजणींच्या' : 'मिळून सार्‍याजणी'तल्या निवडक कथा - मेनका प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 21 August, 2013 - 12:54

'मिळून सार्‍याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. 'मिळून सार्‍याजणी' हे जगण्याशी, प्रामुख्यानं स्त्रीच्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलं गेलेलं आणि म्हणूनच अनुभवांना प्राधान्यानं स्थान देणारं मासिक आहे. स्त्रीप्रश्नांबाबत बोलताना पुरुषांनाही सामावून घेत 'जगणं' जोडून घ्यायचा प्रयत्न या मासिकानं सतत केला आहे. जगण्याचा अनुभव देणार्‍या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्‍याजणींच्या'.

'असा घडला भारत' - रोहन प्रकाशन

Submitted by चिनूक्स on 17 June, 2013 - 12:17

कुठल्याही देशाचं वर्तमनातलं स्वरूप हे त्याच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासावर अवलंबून असतं. भारतही याला अपवाद नाही. अगदी सिंधू संस्कृतीपासून ते ब्रिटिशकाळापर्यंतच्या असंख्य घडामोडींनी या देशाला आजचं रुपडं बहाल केलं आहे. या हजारो वर्षांच्या काळातल्या व्यक्तींचं, घटनांचं म्हणूनच आजही महत्त्व आहे. कारण भूतकाळातल्या घटनांवरच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे व्यक्तिगत व सामाजिक राष्ट्रीय स्तरावर जगतो, त्यातून भविष्यकाळ आकार घेत असतो.

विषय: 

'ड्रीमरनर' - ऑस्कर पिस्टोरिअस, अनु. सोनाली नवांगुळ

Submitted by चिनूक्स on 3 August, 2012 - 13:33

उद्या, म्हणजे शनिवारी दुपारी, ऑस्कर पिस्टोरिअस लंडनला सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत आपली पहिली शर्यत धावेल. यापूर्वी त्यानं अनेक स्पर्धांमध्ये पदकं मिळवली आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. पण उद्याची शर्यत मात्र खास असेल. ही शर्यत तो जिंको न जिंको, पण मैदानात उतरताक्षणी त्यानं इतिहास घडवलेला असेल. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कृत्रिम पायांनिशी धावणारा तो पहिला स्पर्धक असेल. जेमतेम पंचविशीचा ऑस्कर ’ब्लेडरनर’ या नावानं ओळखला जातो. ’पाय नसलेला जगातला सर्वांत वेगवान मनुष्य’ असंही त्याला म्हटलं जातं, कारण कार्बन फायबरांपासून तयार केलेले कृत्रिम पाय लावून तो धावतो.

'रेषाटन - आठवणींचा प्रवास' - श्री. शि. द. फडणीस

Submitted by चिनूक्स on 11 June, 2012 - 01:00

ज्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली, ते व्यंग्यचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीनं शिदंनी गेली पाच दशकं वाचकांना हसवलं आहे. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.

'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' - श्री. सुमेध वडावाला (रिसबूड)

Submitted by चिनूक्स on 19 March, 2012 - 00:13

खरा भारत हा खेड्यांमध्ये वसला आहे, असं आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. मात्र या खर्‍या भारताकडे अजून सरकारचंच पुरेसं लक्ष गेलेलं नाही, तर बड्या कंपन्यांना तरी हा भारत कसा माहीत असणार? भारतातल्या शहरांबाहेर राहणार्‍या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत पोहोचायचं कसं, हा प्रश्न त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कायमच भेडसावत आलेला आहे. कारण या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी सखोल माहिती हवी, तीच मुळात उपलब्ध नाही. ही माहिती मिळवणं हे भारतासारख्या खंडप्राय देशात महाकठीण.

चिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'

Submitted by चिनूक्स on 3 January, 2012 - 00:11

यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.

चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.

Pages