गेली ती आज....मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली ,तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोच्क्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्तेक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्तेक साहिले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून.
खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी इथे फुलांच्या रांगोळ्यांचा जो १ धागा टाकला. http://www.maayboli.com/node/36516 तो धागा तसा नवोदित होता.अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या पौरोहित्याच्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.
सगळ्यांना एव्हाना कळलेच असेल की दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन (आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने 'अजाण' ) ठरला आहे.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे. तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात".आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य, आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!
आनंदसागर
सुरूवात ही तुझ्याकडून,
शेवट ही तुझ्याकडेच.
पण मधला प्रवासच भरकटलेला,
अशाश्वतात गुरफटलेला.
ह्या भरकटलेल्या वाटेवरती
पुन्हा गवसतो तोच गांव
विस्मरून ते पावन तत्व
अन् मीही मांडते तोच डाव.
खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या
इथे मिटवीते माया
ममतेचे कच्चे बंध
इथे निर्मिते काया
नसे अशक्य जरी मिळविणे
भारतीय समाजाचे चित्र
दिल्लीत झालेल्या दामिनी प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर सध्याच्या भारतीय समाजाचे चित्र रेखाटणारा चेतन भगत यांचा लेख १३-१-१३ च्या टाईम्स मध्ये वाचला. त्या लेखातील प्रतिपादन मला समजले तसे थोडक्यात देत आहे. जिज्ञासूनी लेख मुळातून वाचावा.
एवढ्या प्रचंड समाजाचे चित्रण कोणी एक जण करेल आणि ते सर्वमान्य होईलच असे नाही. पण बरेचसे तंतोतन्त चित्र तयार होण्यास लागणारे स्केच असे त्याकडे बघता येईल. परिवर्तन व्हावे असे वाटणार्यांसाठि त्यांनी लेख लिहिल्याचे म्हटले आहे.
लेखाचा सारांश
एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अॅलिस अल्बेनिया
अॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.