'प्लॅटफॉर्म नंबर झिरो' हे रेल्वे स्टेशनावरच्या मुलांचं जीवन समोर आणणारं पुस्तक समकालीन प्रकाशनानं नुसतंच प्रसिद्ध केलं आहे. या मुलांसाठी, मुलांमध्ये गेली अनेक वर्षं काम करणार्या अमिता नायडू यांनी ते लिहिलं आहे. किशोर, जग्गू, अॅन्थनी, बिल्लू, झहीर, मुन्ना अशा कितीतरी मुलांच्या अस्वस्थ करून सोडणार्या कहाण्या या पुस्तकातून आपल्या समोर येतात.
या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा-सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमची मनमोकळी दाद-प्रतिसादच संयोजकांचा उत्साह वाढवत होते. परंपरेप्रमाणे हा गणेशोत्सव देखिल श्राव्य व लिखित सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च होता.
आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.
'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!