संस्कृती

चिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'

0
Average: 4.5 (2 votes)

यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.

चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.

मांजर आडवे जाणे अपशकून असते का?

0

समजा तुम्ही एकादे चांगले काम करायला घरातून बाहेर पडला असाल, आणि त्याचवेळी तुमच्या समोरून मांजर आडवे गेले तर तुम्ही काय कराल.
तुम्ही पाच पावले मागे चालून परत आपल्या वाटेला लागाल? कि ते काम रद्द करून उद्यावर ढकलाल का.?

हिंदू धर्मात अनेक चालीरितीं पैकी वरची घटनाही अशूभ समजली जाते. त्यापाठी काय कारण असू शकते?
की माणसाच्या असफलतेचे पाप त्या मांजराच्या गळ्यात मारण्याचा हा प्रयत्न असेल.?
आणि खरच मांजर आडवे गेले तर जे काम करायला जातो, ते झालेच नाही असा कुणाला अनुभव आहे का.?

वैश्वदेव म्हणजे काय?

0

वैश्वदेव करणे म्हणजे काय? वैश्वदेव न करणार्‍या लोकांचा ( ब्राह्मणांचा) अनेक साधुसंतानी धिक्कार केला आहे, ते कसे करावे, कुणी, कुठे करावे? त्याने नेमके काय साध्य होते? ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख येतो, ते हेच का?

लक्ष्मी अन अवदसा

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

गावाकडची छायाचित्रं : प्रकाशचित्र स्पर्धा २ (विषय-'देऊळ')

0

'देवळाशिवाय गाव' ही कल्पना कुणाला सहन होणार नाही, इतकं महाराष्ट्रातलं ग्रामीण भावजीवन देवळाभोवती गुंफलं गेलं आहे. रोज नवीन फार काही घडत नसलेल्या कुठच्याही खेड्यात 'देऊळ', त्याभोवतीचा 'पार' ही सर्वात महत्वाची गोष्ट. लग्नकार्य असो, सुखदु:ख असो, सणसमारंभ असोत, वायफळ गप्पा असोत की गावातले महत्वाचे निर्णय असोत- श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या डोलार्‍यावर उभ्या राहिलेल्या या विश्वाचे किती रंग, किती ढंग!

तुमच्या कॅमेर्‍यातलं देऊळ काय दाखवतंय?

भारतीय लोकसंगीत

0

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

भारता तील पान वीडा खाण्याची संस्क्रुती

0

आपल्या सर्व संस्क्रुती मध्ये पानाला, वीड्याला विषेश महत्व दिलेल आहे. का ?

भारतात सर्व सार्वजनीक स्थानावर, ठीकाणी पानांची रंग रंगोटी बघुन तुम्हाला काय वाट्ते ?

माहिती हवी आहे : सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र, प्रार्थनास्थळाचे नाव

0

नमस्कार,

मला खालील खालील धर्मांची [सण, धार्मिक ग्रंथ, तीर्थक्षेत्र , प्रार्थनास्थळाचे नाव] ही माहिती हवी आहे. कृपया माहीत असल्यास लिहा / चुकीचे असल्यास दुरुस्त करा. धन्यवाद.

जैन :
सण : पर्युषण
धार्मिक ग्रंथ : आगम
तीर्थक्षेत्र : श्रवणबेळगोळ, मांगी-तुंगी, गिरनार, शत्रूंजय (?), पालिताना (?)
प्रार्थनास्थळाचे नाव : मंदिर / बस्ती / देरासर

पारशी :
सण : जमशेद नवरोझ ( न्यू इयर)
धार्मिक ग्रंथ : झेंद अवेस्ता
तीर्थक्षेत्र : ??
प्रार्थनास्थळाचे नाव : अग्यारी

ख्रिश्चन :
सण : नाताळ
धार्मिक ग्रंथ : बायबल
तीर्थक्षेत्र : जेरुसलेम

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

0

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

0

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.