मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण
अंधश्रद्धा आणि मेंदूविज्ञान

योग आणि व्यसनमुक्ती यांचा विचार करताना सुरुवात आसनाने करावी असे डॉ. वैशाली दाबके यांनी सुचवले होते. त्याचे स्पष्टीकरण त्यांनी त्याबद्दल सविस्तर बोलताना केले. त्यावेळी त्यांनी आसनाचा संबंध शिस्त, तर्कसंगतपणा, स्थैर्य, शांतता, मनाला आत वळविणे यांच्याशी लावला. त्यांनी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने आसनांचा काय उपयोग होऊ शकतो त्या संदर्भात जे सांगितले ते विशद करण्याआधी व्यसनामुळे नक्की काय घडते हे जर स्पष्ट झाले तर येथे आसनांची मदत कशी होते हे नीटपणे लक्षात येईल असे वाटते.
मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है (स्व-साधर्म्य - भाग १)) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.
आपल्याला असा कधी प्रश्न पडला आहे का, की माणूस नेहमी सगळ्या वस्तूंना ठराविक आकारच का देतो? आमची घरे चौकोनी असतात. आमची पुस्तके चौकोनी, संगणकसुद्धा एका विशिष्ट आकाराचा; सगळीकडे चौकोन, आयत, त्रिकोण, गोल हेच आकार. आम्ही एखादे वेळी त्रिकोण किंवा पिरेमिड बांधतो. पण पृथ्वीवर सगळीकडे जमीन उंच-सखल आहे, आम्ही ती सपाट करून टाकतो. खोल भागात भराव टाकतो, डोंगर फोडून काढतो. पण सृष्टी अशी कुठे आहे? कुठला डोंगर अगदी बरोबर त्रिकोणी अथवा शंकू आकाराचा असतो? ढगांना कधी विशिष्ट आकार असतो का? आपले हात, पाय, नाक, डोळे, सगळेच वेगळे आकार. हे आकार आपण भूमितीमध्ये शिकतच नाही.
इस्ट इंडिया कंपनी सरकारने १७७६ साली मिलिटरी विभागाची निर्मिती केली. तिथून वाटचाल करत करत १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रीमंडळात ह्या खात्याचे पहिले कॅबिनेट मंत्री होते श्री बलदेव सिंग. १९४७ ते १९५५ तिनही संरक्षण दलांना कमांडर ऑफ़ चीफ़ होते. १९५५ त्यांना मध्ये चीफ़ ऑफ़ आर्मी स्टाफ़, चीफ़ ऑफ़ नेव्हल स्टाफ़ आणि चीफ़ ऑफ़ एअर स्टाफ़ असे म्हटले जाऊ लागले.
सद्ध्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली खाती येतात :
मुक्तांगण संशोधनासाठी केसस्टडी म्हणून निवडले आणि दर महिन्याला माधवसरांच्या ठाणे येथिल फॉलोअप ग्रुपला जायला लागलो. डॉ. माधवी साळुंखे यांना सर्वप्रथम तेथेच पाहिल्याचं आठवतंय. त्या दिवशी त्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची मुलाखत घेत होत्या. त्यानंतर दुसर्यावेळी त्या स्वतःच फॉलोअप ग्रुपमध्ये बोलण्यासाठी येणार होत्या. त्यादिवशी बसमधून उतरताना त्यांना अपघात झाला होता आणि हाताला खुप खरचटलं होतं. मिटींगच्या जागीच त्या औषध लावून घेत होत्या. त्या दिवशी कुठल्यातरी देवाचा सण असावा. आपसूकच त्या देवाला लोटांगण घातले गेले असे त्या विनोदाने म्हणाल्या. तेव्हाच त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोणाचे दर्शन घडले होते.