मतदान
मतदानाचे कर्तव्य पवित्र
लोकशाहीला नमन करा
ठोकशाहीला टाळून तुम्ही
निर्भयतेने मतदान करा
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
परीक्षा ही अजब कुणाची
मतदान करणाऱ्या मतदारांची
निवडणुकीस उभ्या उमेदवारांची
की शांत झोपल्या लोकशाहीची?
असेल जर स्वाभिमान
तर करा तुम्ही मतदान
माझे चित्रकार मित्र श्री.लीलाधर कोल्हे यांनी काढलेल्या सुंदर चित्रासह माझी कविता-
*पोया*
(लेवा गणबोली)
चमचा!
आपण पुनर्जन्म वगैरे मानत असू किंवा नसू. पण एक प्रश्न मात्र आपल्याला खूप आवडतो. तो म्हणजे, ‘पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल?’… कारण, या प्रश्नाचं उत्तर एका मानसशास्त्राशी जोडलं गेलेलं असतं. बऱ्याचदा, या जन्मात न जमलेली किंवा राहून गेलेली एखादी गोष्ट जमविणे किंवा पूर्ण होणे हे आपल्या पुढच्या जन्माचं ध्येय असलं पाहिजे, असंच अनेकांना वाटतं. ‘पुनर्जन्म असलाच, तर पुढच्या जन्मी मला अमुक व्हायला आवडेल’, असं या प्रश्नावरचं उत्तर मिळतं, ते त्यामुळेच...
ती
पानांवर अलगद थेंबी ती आरसपानी होते
.......ती अशीच उमटत जाते
कुसुमांच्या बहरातूनही काटेही पेरीत जाते
......ती अशीच वेडी असते
सुंदरता हाती धरुनी ओंगळास थारा देते
......ती सदा मनस्वी असते
सुंदरासुंदरापलिकडली व्यक्तता केवळ असते
....... ती कधीही कृत्रिम नसते
प्रिय स्पर्शाने अनामिक भावना मनी उमटते
....... ती अशीच बहरत जाते
जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते
भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते
प्रगतीचा हव्यास
हव्यास प्रगतीचा नडतो
ग्लोबल वॉर्मिंग चहूकडे
हिमालये सागरास मिळती
प्रलयाचे घुमती बोल खडे
जमीन घटली नगरे वाढली
पाऊस पाणी जिरेल कुठे
घरादारात शिरते पाणी
प्रलयाचे घुमती बोल खडे
नद्या नाले तुडुंब भरले
पाणीच पाणी चोहीकडे
गुरेढोरे माणसे बुडाली
प्रलयाचे घुमती बोल खडे
माणसे मरती उजाड धरती
आकांडतांडव चोहीकडे
प्रगतीच्या हव्यासापोटी
प्रलयाचे घुमती बोल खडे
राज्याच्या हव्यासासाठी
कौरव-पांडव सैन्य लढले
कोण वाचले काय मिळाले
प्रलयाचे घुमती बोल खडे
नव्या युगाची पहाट
आल्हाददायक तुझे आगमन
दिनकरा, जसे आमचे बालपण
तळपत असते माध्यान्य
भास्करा, जसे आमचे तरुणपण
मलूल असते संध्याकाळ
दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण
कापून टाक या किरणांनी
मरिचया, संसाराचे हे मायाजाल
घे कवेत मला हे अग्निरुप
हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट
करून टाक भस्म हा नश्वर देह
अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट
राजेंद्र देवी
मला नाही गर्व तरी आहे अभिमान
वंद्य मज धर्म हिंदू गातो मी गुणगान
जात माझी मराठा नाही तिचा ताठा
सर्वांना सोबत घेत झालो मी मोठा
रामदास शिवरायांना देतो मी मान
मिळवून सर्वां वाढवू राष्ट्राची शान
कुणी नाही थोर नाही कुणी सान
हिंदू धर्मात असावे सर्व एकसमान
भेदभाव मिटवून सारे या करू एकी
मनभेद अंतरातले गाडू ना करू बेकी
हिंदू म्हणून घ्यावया वाटेल तेव्हा गर्व
प्रेमानं वागतील जेव्हा एकमेकांशी सर्व
सभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ!
होते रात्र अधाशी, सांजही हुलकावण्या देते
औदुंबराला पाठ लावून, पणतीही जीव तोडते
एक आर्त साद येते, दुर क्षितीजापल्याडून मिनमिनतो राऊळातला दिवा, जीव मुठीत धरून
एक घास रात्रीचा घेताना, घश्यात काटा रुततो
या किर्रर्र काळोखात, एक उपाशी पिंगळा दिसतो
आकळेच न मजला, किती आहेत शून्य सोबती
का बोथट जाणिवांचे, शल्य खुपते हृदयामंधी
या विषण्ण संध्यासमयी, कुठे आसरा मिळतो
अन जीर्ण घरट्यापाई, एकटाच पारवा रडतो
©प्रतिक सोमवंशी