कालचा सकाळमधला लेख वाचुन मी हा लेख लिहीत आहे.. डॉ. केशव साठ्ये या मान्यवरांनी " प्रेक्षकांना दिलासा -- ब्रेक के बाद ..." अश्या नावाचा लेख दै. सकाळ मध्ये १३ मार्च २०१३ ला प्रसिध्द केला.
मुळ लेखाचे लेखक डॉ केशव साठ्ये हे संवाद्शास्त्र आणि प्रसार माध्यम या विषयाचे प्राध्यापक आहेत.
मुळ लेखाचा गोषवारा मायबोलीकरांनी वाचावा असे आवाहन आहे पण मुळ लेख वाचल्या शिवाय आपली मते लिहु नयेत असे आग्रहाचे आवाहन आहे.
अर्थातच हा लेख दुरदर्शन आणि त्याच्या वाहिन्या असा आहे त्यामुळे मुळ लेखाच्या मुद्याला धरुन लिहावे. उगाच दुरदर्शन किती वाईट यावर लिहीण्याचे टाळावे.
किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!
शिव पार्वती, ही जरी दैवते असली, तरी इतिहासात या खर्याखुर्या व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात असे मला
वाटते. पण त्या इतिहासावर, दंतकथेची अनेक पुटे चढल्याने, अनेक संदर्भ सत्याशी फारकत घेतल्यासारखे
वाटतात.
या दंतकथांमागे काही सत्यांश असेल का ? असे माझ्या मनात नेहमी येते. या संदर्भात काही संशोधन / लेखन
नक्कीच झाले असेल, पण माझ्या मर्यादांमूळे ते ग्रंथ माझ्या वाचनात आले नाहीत. खुपदा पुस्तकांच्या
दुकानातही, असे ग्रंथ सहज समोर मिळतील, असे नसतातच. शिवाय त्यांचे वाचक मर्यादीत असल्याने,
त्यांच्या आवृत्त्याही कमीच निघत असाव्यात.
झी टिव्हीवर २९ सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ( भारतीय प्रमाणवेळेनुसार ) हिंदी सारेगमप २०१२ हे नवीन पर्व सुरू झालेय. त्यासंदर्भातली चर्चा करण्यासाठी हा नवीन धागा.
जजेस - १. राहुल राम ( ईंडियन ओशन ह्या बँडमधील बास गिटारिस्ट )
२. शंकर महादेवन.
३. साजिद वाजिद.
अँकर - गायक - जावेद अली.
ह्या पर्वात अनेक उत्तमोत्तम उदयोन्मुख गायक गायिकांची निवड केली गेलीये. प्रत्येकाची स्वतःची अशी खासियत आहे. ऑलराऊंडर गायक शोधण्यापेक्षा प्रत्येकाच्या आवाजाची वेगळी जातकुळी लक्षात घेऊन ऑडिशन्समधून ह्या सर्वांना निवडण्यात आले आहे.
सेट टॉप बॉक्स सरकारने बंधनकारक केला आहे. आता आम्ही केबल वापरत आहोत. तर हा बॉक्स केबल ऑपरेटर कडूनच घ्यावा लागेल की तो बाहेरही विकत मिळतो. कोणत्या कंपनीचा सेट टॉप बॉक्स चांगला आहे?
"एका लग्नाची दुसरी गोष्ट" या मालिकेवर माबोच्या सभासदांनी केलेली समीक्षा पाहून
आज या धाग्याचे उद्घाटन करताना उर भरून आलेला आहे .
ए ल दु गो संपल्याने तसेच तो धागा दुधडी भरून वाहू लागल्याने , हे नवीन धागारुपी धरण बांधण्यात आलेले आहे
माबोचे स्टार समीक्षक स्वप्ना राज , भुंगा, रिया, अश्विनिमामी , मामी , साधना, उदयन,मैना आणि इतर टीम (मी धरून
)
या धाग्यावर ,सध्या धुमाकूळ घालणाऱ्या मालिकांची समीक्षा (?) {बाजार उठला रे } तसेच बर्यापैकी बघितल्या जाणार्या मालिकांचे गुणविशेष वर लिहिलेल्या पॅनल द्वारे नोंदवले जातील
माबोचे सभासद उत्स्फूर्त पणे यात भाग घेतील हि अपेक्षा .
आताच आजचा सत्यमेव जयतेचा "पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......
सत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/
या आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------
या आधीच्या भागांच्या लिंक्स-

सगळीकडे वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाचा नुसता झगमगाट... मनातलेही विचार ऐकु येणार नाहीत इतक्या जोरात वाजणारं ‘डब्बा गुल’ संगीत... कुठल्याही रंगमंचाला असतो तो श्वासांवर दरवळणारा गंध.... आसपास वावरणारे सेलिब्रेटीज्.... विलक्षण गोड आणि कमालीच्या छळवादी कार्ट्यांचा अफलातून गोंधळ आणि ‘स्कीट रायटर’ म्हणुन सगळ्यांनीच आवर्जुन दखल घेतल्यामुळे सुखावलेलं मन.......
......ह्या अशा भारावलेल्या वातावरणात हरवलेला मी रंगमंचाजवळ उभा होतो.