गद्यलेखन

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2013 - 06:39

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||

सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||

"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.

हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

मृगजळ!

Submitted by आर.ए.के. on 9 April, 2013 - 02:05

पडले ते ऊनच होते,
खोटे ते मृगजळ होते,
आनंदातही पाझरणारे,
अश्रू ते अश्रूचं होते!

हारले ते ससे होते,
जिंकले ते कासव होते,
क्षमतेला डावलणारे,
ते आळसाचे नमुने होते!

हसणारे ते नेत्र होते,
हसवणारे ते किस्से होते,
काळासोबत गळून पडलेले,
ते ह्रदयाचे हिस्से होते!

वाटा त्या मोकळ्या होत्या,
रिकामे हे जग होते,
रस्ता सापडूनही चुकलेले,
हतबल ते वाटसरु होते!

घडल्या त्या मूर्त्या होत्या,
बनले ते शिल्प होते,
प्रहारांनी रक्ताळलेले,
दगड ते दगडचं होते!

एका वेदनेची गोष्ट...

Submitted by मी मुक्ता.. on 8 April, 2013 - 05:53

तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब..

शब्दखुणा: 

निमित्त फक्त एका भेटीचे

Submitted by सुज्ञ माणुस on 8 April, 2013 - 04:04

निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

Submitted by अंड्या on 7 April, 2013 - 09:20

मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

स्मृतींची चाळता पाने......अर्थातच Down memory lane!

Submitted by मानुषी on 7 April, 2013 - 02:13

स्मृतींची चाळता पाने......अर्थातच Down memory lane!
बऱ्याच दिवसांनी सांगलीला दोनच दिवस पण निवांतपणे रहायला मिळालं. माहेरघरची बाग अजून तरी...म्हणजे उन्हाळ्याची सुरवात होती त्यामुळेच... चांगली हिरवी दिसत होती. नारळाची ७/८ झाडं घरावर अगदी छत्र चामरं ढाळत होती.

शब्दखुणा: 

भक्ति: सक्तीची आणि भपक्याची!!

Submitted by झुलेलाल on 6 April, 2013 - 00:05

होळीच्या दिवशी बाहेरही पडणं अशक्य असल्यानं वेळ घालवण्यासाठी काही ना काही ठरवावंच लागलं असेल. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहात कुणी सुट्टी ‘विनाकारणी’ लावली असेल, तर कुणी गप्पाटप्पा करत वेळ घालवला असेल.. त्या दिवशी आदल्या दिवशीचं एक वर्तमानपत्र चाळताना दोन बातम्या पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागल्या. एका बातमीत होळीच्या भक्तिरंगांची भपकेबाज उधळण होती, तर दुसरीत, ‘सक्तीच्या भक्ती’चे रंग विखुरले होते..

प्रारब्ध- भाग ६

Submitted by पारिजाता on 5 April, 2013 - 08:57

आधीच्या भागांची लिंक

भाग १ - http://www.maayboli.com/node/40847

भाग २ - http://www.maayboli.com/node/42011

भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077

भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134

भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252

पुढे..

अशी वेळ येणं कठीण होतं. घरात सतत कुणी ना कुणी असायचं हे एक आणि आक्कात्या सहसा घरातून बाहेर पडत नसत हे दुसरं.

सुप्रसिद्ध पशु-पक्षी

Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25

लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्‍या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.

पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.

पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन