मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
गद्यलेखन
ऋतुराज – वसंत
॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘
ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.
गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’
'परिचय'- बर्खूरदार खलनायकाचा !....’दादासाहेब फाळके ‘पुरस्काराचे निमित्ताने !
आज दादासाहेब फाळके पुरस्काराने एक असे व्यक्तिमत्व सन्मानित होत आहे कि ज्यामुळे सन्मानित व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसणार आहे ? का त्या पुरस्काराचा सन्मान होतो आहे ? असा प्रश्न पडावा.
कारण १९६९ पासून गेली चव्वेचाळीस वर्षे दिला जाणारा हा भारत सरकारचा मानाचा पुरस्कार हा,दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती आणि नभोवाणी मंत्रालयामार्फत सुरु करण्यात आला.
तडकासे
"डोन्ट टच मी"
९३ वर्षांचे भाई, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, अंगात असेल नसेल ती ताकद एकवटून त्या गृहस्थाला ओरडून म्हणाले.
रिक्षावाला - ४ (अंतिम)
आधीचे भाग...
भाग १ - http://www.maayboli.com/node/42624
भाग २ - http://www.maayboli.com/node/42643
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42647
तुषारने नीताकडे मोर्चा वळवला.
"तुम्ही... आय मीन... तू काहितरी बोल ना... ताई..."
नीताने एक थंड कटाक्ष तुषारकडे टाकला. इतका थंड की तुषारच्या अंगावर शहारा आला. पण लगेचच तिच्या डोळ्यात त्याला सामान्य भाव दिसले.
"मी? काय बोलू?"
"तुमच्या मिस्टरांचे युद्धातले काही अनुभव सांगा की."
नीताचं तोंड जरासं पडलं. "ते नसतात इथे. त्यांचे अनुभव सांगण्यापुरतेही."
"त्यांची खूप आठवण येते तुला?"
"...."
सापडेन ना मी तुला?
शोधशील ना रे मला?
जेंव्हा मी हरवेन या अस्ताव्यस्त पसार्यात,
जेंव्हा झाकोळून जाईन मी अपयशाच्या काळोखात,
जेंव्हा कोसळून जाईन जबाबदारीच्या ओझ्याने,
जेंव्हा गमवून बसेन स्वतःवरचा विश्वास,
जेंव्हा उन्मळून पडेन दु:खाच्या वाराने,
जेंव्हा होईन मी अगतिक परिस्थितीच्या चालीने,
जेंव्हा विव्हळेन मी काळाच्या जखमेने,
जेंव्हा जाईन मी दमून चालताना वाटेने,
जेंव्हा विसरुन जाईन मी स्वतःचचं अस्तित्व,
जेंव्हा होईन मुकी या जगाच्या कोलाहलात,
जेंव्हा होईन पांगळी, शक्ति असून पायात,
जेंव्हा होईन बंदिस्त स्वतःच्याच बंदिवासात,
जेंव्हा घेईन लपवून मी स्वतःला एका कोषात,
शोधशील ना रे मला?
सापडेन ना मी तुला?
प्रारब्ध - भाग ८ (अंतिम)
आधीच्या भागांची लिंक
भाग १ - http://www.maayboli.com/node/40847
भाग २ - http://www.maayboli.com/node/42011
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077
भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134
भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252
भाग ६ - http://www.maayboli.com/node/42292
भाग ७ - http://www.maayboli.com/node/42397
पुढे..
"आता लगेच एका दिवसात आत्याशी गाठ घेऊन बोलायला वेळ नव्हता. पण आम्ही आमचं ठरवून टाकलं की लग्न पक्कं आहे. ती रात्र मी टक्क डोळे उघडे ठेवून छताकडं बघत काढली.
रिक्षावाला - ३
एक गंभीर श्वास सोडून बर्वे उद्गारले - "कळलं मला!"
"काय कळलं साहेब?"
"जे कळायचं होतं ते कळलं. उतरा राजे..." ते तुषारकडे पाहून म्हणाले.
"का? मी का उतरू?" - तुषार साशंक आवाजात म्हणाला.
"मी सांगतोय म्हणून. उ त र!!!"
तुषारने चमकून एकदा बर्व्यांकडे पाहिलं. पण त्यांच्या आवाजाची धार जाणवून तो निमुटपणे रिक्षातून उतरला. त्याच्यामागून बर्वे उतरले.
"बसा आता आत. या ताईंकडे थांबा जरा. आणि हे सांभाळा..."
"हे काय आहे?"
रिक्षावाला - २
रिक्षाच्या एका कडेला बसून नीता विचारात गढलेली होती. तोंडाने सतत रामनाम पुटपुटत होती. तरी मनातलं वाईट विचारांचं वादळ काही थांबेना. अवघ्या तास-दिड तासापुर्वी कुठे होतो आपण! शाळेत रानडे बाईंना मनातल्या मनात शिव्या घालत घालत भरभर काम उरकत होतो. मनगटातल्या घड्याळ्याकडे पाहत मनात म्हणत होतो कि याहून वाईट काही होऊच शकत नाही. आणि आता... एवढ्या लगेच दैवानं दाखवून दिलं कि आहे त्याहूनही वाईट असू शकतं. परमेश्वराच्या कल्पनाशक्तीला अंत नाही हेच खरं. मघाशी वेळेत... किमान लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून आटपिटा चालला होता जीवाचा. आणि आता... परमेश्वरा...
रिक्षावाला
नीता शाळेतून बाहेर पडली तेंव्हा बरंच अंधारून आलं होतं. त्यातून पाऊस दाटलेला. वारा सुटलेला. तिची पावलं झपाझप पडत होती. डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त तिचं घर आणि चिमण्या आतूर डोळ्यांनी तिची वाट बघणारं तिचं पिल्लू!!.... पिलाची आठवण येताच घशाशी आलेला आवंढा गिळत तिनं पावलांचा वेग आणखी वाढवला. जवळ जवळ धावतच तिनं बसस्टॉप गाठला. आभाळ आता चांगलंच भरून आलं होतं. मनातही प्रचंड हुरहूर माजल्यासारखी... ही वेळच प्रचंड घातकी!