गद्यलेखन

गेट आयडीया !

Submitted by कवठीचाफा on 27 August, 2013 - 17:12

" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? "

" माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? "

" कोणती तक्रार सर ? "

" मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून"

" सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? "

" ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? "

" मी समजलो नाही सर"

" नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं "

" त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ? "

बकुळ - शतशब्द्कथा

Submitted by कविन on 27 August, 2013 - 08:37

गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी

कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी

ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच

मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत

बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं

"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,

शब्दखुणा: 

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

Submitted by अभय आर्वीकर on 27 August, 2013 - 07:56

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर

Submitted by बेफ़िकीर on 26 August, 2013 - 07:03

एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?

ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!

इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी?

वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊसुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

Submitted by अभय आर्वीकर on 25 August, 2013 - 19:22

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

नाट्योपचार (ड्रामा थेरपी)

Submitted by डॉ अशोक on 25 August, 2013 - 11:53

नाट्योपचार (ड्रामा थेरपी)

तीस पस्तीस वर्षे वैद्यकिय महाविद्यालयात शिकवलं. औरंगाबदला आणि नांदेडला. विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या भावजीवनातला महत्वाचा घटक. विद्यार्थी आठवतात ते त्यांच्या हुषारीनं, त्यांच्या अंगी असलेल्या काही गुणांमुळे. अशीच एक आठवण....

तळ्यात का मळ्यात...

Submitted by भानस on 25 August, 2013 - 01:20

टिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्ट धरत ती घराबाहेर पडली.

रिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.

पाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.

ब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.

चक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.
पुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.
’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.

तळ्यात का मळ्यात...

Submitted by भानस on 25 August, 2013 - 01:19

टिकली लावावी म्हणून आरशात डोकावले तिने. तारवटलेले डोळे. वाढत चाललेली काळी वर्तुळे. स्वत:ची म्लान छबी पाहून तिला भडभडून आले. अनावर झालेले कढ आटोकाट दाबत लेकाचे चिमुकले बोट आधारासाठी घट्ट धरत ती घराबाहेर पडली.

रिक्षा.... हाकेसरशी ब्रेक मारत रिक्षा थांबली. तिला-लेकाला घेऊन धावू लागली.

पाळणाघर.... ब्रेक..... लेकाचा पापा... टाटा. रिक्षा भरधाव.

ब्रेक.... स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर २. लेडीज स्पेशल.

चक्क खिडकीचा लाभ. एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... मन सैरावैरा.
पुन्हा एक दीर्घ श्वास... दुसरा... तिसरा.... गालावर ओल.
’आज हवा पावसाळी झालीये नं... ’ शेजारणीशी सारवासारवी.

विषय क्र. २. : तेल क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्यासाठी निर्माण झालेली भारताची मूळ राष्ट्रीय तेल कंपनी - इंडियनऑयल

Submitted by अश्विनी के on 23 August, 2013 - 02:38

१५ ऑगस्ट १९४७ ह्या दिवशी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु त्याआधीचा १५० वर्षांपुर्वीचा भारत ते स्वातंत्र्य मिळाल्यादिवशीचा भारत ह्या कालावधीत इंग्रजांनी त्यांच्या राजकारण आणि राज्यकारण सुकर होण्यासाठी केलेले बदल ह्यामुळे भारत कित्येक बाबतीत परावलंबीच राहिला होता. कारण त्या बदलांमुळे भारतीयांचे राहणीमान बदलले होते आणि ते त्या बदलांना स्वबळावर निभावून, जनतेला पुढे घेऊन जाणे हे स्वतंत्र भारतापुढे एक आव्हान होते. अश्याच अनेक आव्हानांपैकी एक होते इंधनामध्ये स्वावलंबी होणे.

थरार..... एक विलक्षण अनुभव

Submitted by gajanan59 on 22 August, 2013 - 04:25

थरार..... एक विलक्षण अनुभव - भाग १

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझे नवीन लेखन इथे टाकत आहे.
येथील हि माझी पहिलीच कथा त्यामुळे प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल भरपूर भीती आहे मनात.
आशा करतो कि तुम्हा सर्वाना हि कथा आवडेल.

आपला
गजानन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन