नातीगोती

तिची- माझी

Submitted by vaiju.jd on 21 April, 2013 - 03:11

।। श्री ।।

माझे काका वारले,तेव्हा ते साताऱ्याला मुलीकडे म्हणजे माझ्या चुलतबहिणीकडे होते. आणि योगायोगाने ती माझी 'जाऊ'ही लागते. माझे वडिल हयात नसल्याने माझे कन्यादान माझ्या या काका-काकूंनीच केले होते. वयस्कर, आजारी काकांनी शेवटच्या दिवसात मुलीकडे राहण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्यामुळे अंतसमयी ते साताऱ्याला होते.

कळले तसे आम्ही सर्वजण साताऱ्याला जमलो. सगळे दिवस होईपर्यंत अगदी घरात घरात राहून आमची छोटी मुले सगळी कंटाळली होती. 'दिवस' झाल्यावर चुलतभाऊ त्याच्या बायकोला म्हणाला, "तू आणि वैजयन्ती सगळ्या मुलांना जरा बागेत नेऊन आणा."

काजळी

Submitted by vaiju.jd on 18 April, 2013 - 14:12

।। श्री ।।

एकदा एका घरी हळदीकुंकवाला गेले असताना घरच्या बाईंनी माझी एका बाईंशी ओळख करून दिली. नांव, गांव, कुठे राहतो विचारताना लक्षात आले कि आम्ही नातेवाईकच आहोत. म्हणजे त्या बाई माझ्या चुलत आते जाऊबाईच लागत होत्या.त्याची खातरजमा झाल्यावर त्यांनी मला घरी बोलावले. त्या रहातही होत्या आमच्या घराजवळच. त्यानंतर लगेच श्रावणातल्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी घरी बोलावले. मी लहान असल्याने मीच आधी त्यांच्या कडे जाणे सयुक्तिक होते.

पण माझ्यातला 'मी' आडवा आला

Submitted by ashishcrane on 15 April, 2013 - 02:23

आज बसमध्ये गर्दी नाही हे पाहून अनुने समाधानाने एक मोठ्ठा श्वास घेतला. खूप दिवसांनी असा दिवस आला होता. माणसं शोधता शोधता हल्ली जिथं माणसं नसतील अशी जागा शोधावी लागते. बऱ्याच दिवसांनी खिडकीजवळची सीट रिकामी मिळाली होती. जागा पकडून ती शांत नजरेने लहान मुलं जशी उत्सुकतेने बाहेर बघतात तशी बाहेर बघू लागली. जास्त ट्राफिक नसल्याने बसही वेगाने चालत होती. वारा केसांशी खेळत होता. छान हसली अनु. गालातल्या गालात. एकटीच.

निमित्त फक्त एका भेटीचे

Submitted by सुज्ञ माणुस on 8 April, 2013 - 04:04

निमित्त फक्त एका भेटीचे

परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.

जोडीदाराच्या भावना

Submitted by सौ. वंदना बर्वे on 2 April, 2013 - 00:01

शेखर एका बड्या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. त्याची पत्नी वासंती ही माझी मैत्रीण. लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. उभयतांना एक मुलगी आहे. संसार सुखाचा सुरू होता. निदान आम्हा मैत्रिणींना तरी असं वाटायचं. शेखरचे त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या स्त्रीशी असलेल्या अफेअरची खबर बाहेर आली. त्यातल्या सत्यतेची खात्री झाल्यावर वासंतीने त्याच्याशी बोलणं टाकलं. संसार तुटण्याच्या मार्गावर आहे.

एक सॉरी

Submitted by ashishcrane on 1 April, 2013 - 06:57

बसमधून उतरता उतरता तो बोलला.
"सॉरी. माफ करा. जे काही झाले ते मुद्दाम नाही केले मी."
"सगळेच पुरुष सारखेच तुम्ही. बेशरम! बाई दिसले की आले लांडगे धावत!"
हे काल घडले.

"अहो सौभाग्यवती. लक्ष कुठे आहे तुमचे? इतक्या कुठे रमलात तुम्ही?" अजितने हलवून विचारले.
"काही नाही हो. असंच बसले होते शांत." मी उगाच म्हटले त्याला तसे आणि विषय टाळला.

आता यांना कसे सांगू की, माझ्या मनात काय चाललंय ते.समजून घेतील का ते?
'बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रीण' हि दोन असून नसलेली नाती आहेत; ज्यांना कधीच समाज मान्य करत नाही. समाजच काय तर? आपणही कधी मान्य करत नाही; करणार नाही.

शब्दखुणा: 

भय

Submitted by हेमंततनय on 31 March, 2013 - 04:29

दिनकरराव भोसल्यांची एक सवय होती, त्यांना रात्री उशीरापर्यंत नीट झोप येत नसे व पहाटे डोळा लागतो न लागतो तोच, बबलीच्या म्हणजे त्यांची नात श्रेयाच्या हाकेने त्यांची झोपमोड होई. मधाळ आवाजात हाक मारत बबली म्हणे, “आजोबा गुड मॉर्निंग, मी शाळेत जाऊन येते हं !” एवढ्याशा, चार-सहा वर्षांच्या मुलांना सकाळी सात वाजता घर सोडावं लागतं याचं त्यांना वाईट वाटे. झोपेतून उठून दिनकरराव तीला बाय-बाय करित असत.

शब्दखुणा: 

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

Submitted by लिलि के. on 30 March, 2013 - 07:26

आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का?

आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे.

स्मशान

Submitted by ashishcrane on 26 March, 2013 - 07:38

आज मी स्मशानात आलो जाऊन ....
पाहिले थोडा वेळ....मी त्या मुडद्यांत राहून....
शांत वाटले त्यातले काही ...
पाहिले काहींना मरूनही...इच्छांसाठी अजूनही जिवंत पाहून....

काही देह....तेथे हि हसरे होते....
जितके मिळाले त्यातच सुख त्यांचे..मागणे ना अजुनी कसले होते....
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....

काहींच्या ओठी काळजी मुलाबाळांची होती,
काहींच्या ओठी....गाणी रडकी....भूतकाळाची होती,
काहींच्या मनी अजूनही......न सुटलेले हिशोब होते,
दहाच बोटे हाताची....तरी पुन्हा तीच तीच ते मोजत होते....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती