हितगुज ग्रूप

श्रीगणेशा

Submitted by मनोलय ... on 3 September, 2022 - 10:47

*श्रीगणेशा ...*

उत्सवाने दूर नेला श्रीगणेशा,
मानवाने दूर केला श्रीगणेशा ...

सूर गेला, छंद गेला, नृत्य गेले,
कर्ण कर्कश्शात बुडला श्रीगणेशा ...

मिरवणुक ती, पंथ माझा का हरवला ?
लाख खड्डे बघुन पुसतो श्रीगणेशा ...

खिळखिळी हाडे जिवाचे हाल कसले !
सहन धक्के करित बसला श्रीगणेशा ...

मानवाचे तत्त्व गेले, नीती गेली,
राजकारण बघत बसला श्रीगणेशा ...

धर्म गेला, पंथ गेला, 'जात' आली,
सोवळे नेसून नंगा श्रीगणेशा ...

झिंग तरुणाईस आली जी विदेशी,
मद्य प्याले बघत बसला श्रीगणेशा ....

राष्ट्रपतींचे डबे

Submitted by पराग१२२६३ on 21 July, 2022 - 06:21

भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवास करण्याचा सल्ला त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी तयार केल्या गेलेल्या खास डब्यांचा वापर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या दौऱ्यासाठी केला जाऊ लागला. ब्रिटिश राजवटीच्या काळात तो डबा भारताच्या गव्हर्नर-जनरलसाठी एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता.

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

Submitted by पराग१२२६३ on 17 July, 2022 - 02:04

सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती.

अस्वस्थ पाचूचे बेट

Submitted by पराग१२२६३ on 11 May, 2022 - 05:54

अतिशय अस्थिर परिस्थितीत श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी 9 मे 2022 ला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. श्रीलंकेतील सद्यपरिस्थितीला राजपक्षे जबाबदार असल्याचे श्रीलंकन जनतेचे मत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी जनतेवरील कर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यावर त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेसुद्धा. त्याचबरोबर अन्य काही लोकानुनयी निर्णयही लागू केले. एकीकडे करसंकलन घटले, त्याचवेळी लोकानुनयी निर्णयांमुळे सरकारी खर्च मात्र वाढत गेला.

शब्दखुणा: 

सुखोईवर ब्रह्मोस

Submitted by पराग१२२६३ on 22 April, 2022 - 11:08

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.

आपला अशांत शेजार !

Submitted by रमेशमामा1 on 4 April, 2022 - 20:30

सध्या भारताच्या शेजारील देशात प्रचंड उलथापालथ चालू आहे . त्याचप्रमाणे अशांत शेजार हे भारताच्या प्रगतीसाठी देखील मारक आहे .

राजधानीची सफर (भाग-३)

Submitted by पराग१२२६३ on 30 March, 2022 - 02:16

भोपाळ जंक्शनवर गाडी थांबल्यावर मी खाली उतरून जरा फलाटावर रेंगाळलो. इथे आमच्या ‘राजधानी’चे चालक, गार्ड, तपासनीस, पोलीस बदलले गेले. भोपाळ जं.वर नियोजित वेळेच्या दोन मिनिटं आधी दाखल झालेली आमची ‘राजधानी’ सुटली मात्र नियोजित वेळेच्या 4 मिनिटं उशिरा म्हणजे मध्यरात्री 2:09 वाजता.

राजधानीची सफर (भाग-२)

Submitted by पराग१२२६३ on 29 March, 2022 - 07:00

खेरवाडीला संध्याकाळी 6:48 वाजता तपकिरी रंगातील कल्याणच्या WCAM-2 इंजिनासह संक्रेल गुड्स टर्मिनलकडून आलेली आणि छत्रपती शिवाजी महाराज (ट) कडे निघालेली पार्सल विशेष एक्सप्रेस क्रॉस झाली. 19:05 वाजता लासलगाव आले. स्टेशन ओलांडत असताना तिथे आणखी एक एक्सप्रेस गाडी लूप लाईनवर उभी करून आमच्या ‘राजधानी’ला मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. ती होती लोकमान्य टिळक (ट)हून पाटण्याला निघालेली एक्सप्रेस. लासलगाव स्टेशनमधून ‘राजधानी’ बाहेर पडत असतानाच WAG-7 कार्यअश्वांची एक जोडी गाडीविनाच नाशिक रोडकडे निघून गेली.

ऑपरेशन गंगा

Submitted by पराग१२२६३ on 12 March, 2022 - 00:10

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती. भारताकडे परत येत असताना भारताच्या विमानांमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश अशा शेजारी देशांच्या नागरिकांनाही संकटग्रस्त भागातून परत आणले गेले.

अस्थिर माली

Submitted by पराग१२२६३ on 26 February, 2022 - 01:20

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे.

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप