विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हाच माझ्या चिडचिडीला सुरुवात झाली, कारण बरोबर फायनलच्या संध्याकाळी मी दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांतीत असणार हे स्पष्ट झाले होते. आमच्या शाळेची ट्रीप (सॉरी, सॉरी ट्रीप नाय काय, आउटवर्ड बाऊंड प्रोग्रॅम, इंटरनेशल शाळा हाय म्हटलं!!) बरोबर त्याच काळात निघावी, बॅडलकच खराब दुसरे काय!
श्रीलंका इनिंग सुरु झाली तेव्हा आम्ही ह.नि स्टेशनवर बरोबरीचे रेडिओवाले, पोलिस; जो मिळेल त्याला 'स्कोर क्या हुआ' चा मंत्र जपत अपडेट होण्याचा प्रयत्न करीत होतो.
जगभरात पसरलेल्या मायबोलीकर बंधूभगिनींना नमस्कार! जगाच्या कुठल्या तरी एका कानाकोपर्यात आपण वावरत असतो आणि आपल्या देशाची विजयगाथा जेंव्हा आपण ऐकत असतो-बघत असतो-लोकांना सांगत असतो- तेंव्हा ऊर कसं अगदी आनंदानं भरभरुन डोळ्यांवाटे सांडायला लागतं. माझ्या भारताने, माझ्या देशाने, माझ्या मायभूमीने, माझ्या बांधवांनी, माझ्या देशातील क्रीडापटूंनी सन २०११ चा विश्वकरंडक अंतिम क्रिकेट सामना जिंकला तो क्षण कुणी मित्रांच्या भल्या मोठ्या समूहात वाजत-गाजत साजरा केला असेल तर कुणी दूरवर परदेशी गेलेल्या भारतीयांनी अगदी एकट्यानेच आपल्या फुलून आलेल्या हृदयात वाजणार्या स्पंदनांसोबत साजरा केला असेल!
सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
(मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे)
मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
दे घुमाके !!!
सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज
परवा आणखी एका संस्थळावरील एका सभासदाच्या लेखातील मॅच पहाताना "करायच्या-न करायच्या" गोष्टींमुळे होणार्या शकुन-अपशकुनाबद्दलचे उल्लेख वाचून गंमत वाटली आणि हा लेख लिहायची स्फूर्ती झाली. (अर्थात सचिन खेळत असताना "करायच्या-न करायच्या" गोष्टीची माझीही यादी आहेच!)
एक (गैर)समज असाही आहे (किंवा सचिनच्या हितशत्रूंनी तो रचला आहे) कीं त्याने शतकी खेळी केली कीं भारत तो सामना हरतो.
ता. २७ फेब्रुवारी २०११, स्थळ चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु ! मला वाटते भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशातील क्रिकेटचे चाहते हा दिवस कधीही विसरणार नाहीत. कालच्या दिवशी साहेबांनी पुन्हा एक नवीन विक्रम नोंदवला. साहेबांचे विश्व चषक स्पर्धेतले पाचवे शतक ! या शतकानेसह आपल्या लाडक्या तेंडल्याने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटपटू या नव्या विक्रमाची नोंद केली . त्याच्या नावावर जमा झालीत पाच शतकं. वनडेमधील हे साहेबांचं ४७वं शतक.
गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते.
एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.