२५ जून १९८३
Submitted by फारएण्ड on 23 June, 2008 - 16:28
२५ जून १९८३, विंडीज ला हरवून भारताने विश्वचषक जिंकला. दूरदर्शन ने एक दिवसाचे सामने थेट प्रक्षेपित करायला बहुधा तेव्हाच सुरूवात केली.
तेव्हा घरात टीव्ही असणे हे एवढे कॉमन नव्हते, काही गावांत्/शहरात बूस्टर लावल्याशिवाय तर काही ठिकाणी तरीही टीव्ही दिसत नसे.
त्यावेळच्या तुमच्या आठवणी काय आहेत? मॅचेस तुमच्या कडे दिसल्या का? विजय तुम्ही कसा साजरा केला? आजूबाजूला कसा साजरा होताना बघितला?