क्रिकेट
क्रिकेट
... आणि गावसकर 'पेटला'!
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्याच गोष्टी आठवल्या.
१९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता. त्यात चार महिन्यांनतर त्यांचा भारत दौरा आला...
ऑल टाईम ग्रेट टीम
अमोल.. क्रिक इन्फोवर ऑल टाइम ऑस्ट्रेलियन ११ पाहीली का? हेडन व मार्क टेलर नाही व त्या ऐवजी ट्रंपर व आर्थर मॉरीस? निल हार्वे व बॉबी सिंप्सनची गैरहजेरी सुद्धा मला जाणवली. तसच बिल ओरायली ऐवजी मी रिचि बेनॉला घेतल असत व बॉर्डरऐवजी स्टिव्ह वॉ किंवा निल हार्वेला. पॉन्टिंगला पण जागा नाही त्यात. पण ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट इतिहास बघता फक्त ११ खेळाडु निवडणे फारच कठीण!आपण मायबोलिवर सुरु करुयात का तसे सदर? म्हणजे ऑल टाइम इंडियन ११ वगैरे? सगळ्यात कठीण.. ऑल टाइम वेस्ट इंडि़ज ११!
चल मीच सुरु करुन टाकतो इथे..
ऑल टाइम वेस्ट इंडिज ११.
आयसिसी T20 विश्वचषक
आजपासून विश्वचषक सुरु होणार.
कोण जिंकेल?
मला वाटतं भारत परत जिंकणार, कारण आपल्या सर्वच खेळाडूंना आयपियल मुळे व्यवस्थित सराव मिळाला आहे. तसेच बरेच भारतिय खेळाडू (रैना, धोनी, आर पी, गंभीर, रोहित, झहिर) फॉर्मात आहेत.
पॅकेज
http://www.liverel.com/Beta $25
आयपीएल २००९
आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.
कपिल-५०
आपला कपिल ५० वर्षाचा झाला तरी त्याबद्दल फारसे कोठेच काही आले नाही? कदाचित आयसीएल मधल्या त्याच्या सहभागामुळे बीसीसीआय ने काही उत्साह दाखवला नाही. कदाचित मध्यंतरी त्याचे नाव मॅच फिक्सिंग मधे आले होते त्यामुळे ही असेल, पण त्याची शक्यता कमी आहे.
चला निदान आपण तरी काही जबरी आठवणी लिहू 
१. पाक मधे (बहुधा जगात) पहिल्यांदाच भारतीय बोलर विरूद्ध हेल्मेट घालायची वेळ आली प्रतिस्पर्धी फलंदाजांना 
२. इंग्लंड मधे फॉलोऑन टाळायला २४ रन्स व फक्त एक विकेट शिल्लक असताना सलग ४ सिक्स मारून टाळलेला फॉलोऑन!
सचिन आणि चेन्नई
टीम इंडीया
"काका" अशोक मांकड
आजच्या विशी-तिशीतल्या क्रिकेटप्रेमींना अशोक मांकडबद्दल जास्त माहीती नसावी... पण माझे क्रिकेट समजणे.. गावस्करच्या उदयापासुन सुरु झाले.. म्हणजे १९७१-१९७२ पासुन.. त्यावेळच्या वाडेकरच्या टिमने भारताला इंग्लंड व वेस्ट इंडिजच्या दौर्यात प्रथमच विजय मिळवुन दिला होता.. त्या वेळेला अशोक मांकड हा सुनील गावस्करचा सलामी भागीदार म्हणुन काही टेस्टमधे खेळला होता... पण अशोक मांकड खर्या अर्थाने रणजी ट्रॉफी मॅचेसमधेच चमकला... त्याच्या दु:खद निधनानिमित्ताने मी इथे त्याच्याबदलची... मी स्वतः पाहीलेली एक ठळक आठवण टाकत आहे...
२५ जून १९८३
२५ जून १९८३, विंडीज ला हरवून भारताने विश्वचषक जिंकला. दूरदर्शन ने एक दिवसाचे सामने थेट प्रक्षेपित करायला बहुधा तेव्हाच सुरूवात केली.
तेव्हा घरात टीव्ही असणे हे एवढे कॉमन नव्हते, काही गावांत्/शहरात बूस्टर लावल्याशिवाय तर काही ठिकाणी तरीही टीव्ही दिसत नसे.
त्यावेळच्या तुमच्या आठवणी काय आहेत? मॅचेस तुमच्या कडे दिसल्या का? विजय तुम्ही कसा साजरा केला? आजूबाजूला कसा साजरा होताना बघितला?
