कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

Submitted by मथुरादास दावणगिरी on 8 August, 2011 - 04:52

कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.

बॉलिंग तरी कशी ? एक दोन ओव्हर कुणीही टाकायचं कि लगेच स्पिन अ‍ॅटॅक सुरू. या तिकडीच्या जोरावर मायदेशात काही सामने जिंकले कि पब्लिक खूष. पण परदेशात गेले कि हे वाघ मार खाऊन येत. ऑलआउट ३६ असा विक्रमही त्यांनी गाजवला. कुठलंच टीम स्पिरीट नसलेला हा संघ . कपिल आल्यानंतर वेगवान बॉलिंग भारताला मिळाली. पाच पाच विकेटस काढून त्याने ऑपोझिशन चं कंबरडं मोडायला सुरूवात केली. लवकरच त्याची दहशत बसली.

पण आपले विक्रमवीर त्याच्या कामगिरीचा फायदा घेऊ शकत नसत. म्हणून मग त्याने बॅटींग मधेही चमक दाखवायला सुरूवात केली. तळाच्या बॅटसमनना घेऊन खेळायला सुरूवात केली. या सर्वांवर कळस झाला तो १९८३च्या वर्ल्डकप मधे. दुस-या वर्ल्डकपमधे भारताने भाग घेतला होता. सुनील गावसकरने ६० ओव्हर्स खेळून आउट न होता ४६ धावा जमवल्या पण टीम स्पर्धेतून आउट झाली.

१९८३ला कपिलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीममधे जिंकण्याचा विश्वास कपिलने निर्माण केला. स्वतः तर कामगिरी चांगली केलीच पण के श्रीकांत, मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ या प्लेयर्सकडूनही चांगला खेळ करून घेतला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे सिद्ध करताना झिंबावेविरूद्ध त्याने केलेली १७५ नाबाद ची खेळी आज माइलस्टोन आहे. त्या दिवशी कपिल मैदानात आला तेव्हा सीनयर्सने पुन्हा नांगी टाकली होती. पाच आउट १७ असा स्कोरबोर्ड. मॅच हरल्यास मुंबईचा रस्ता धरायचा. अंगात १०५ ताप अशा परिस्थितीत त्याणे सैद किरमाणीला साथीला घेत ती मॅच एकहाती जिंकून दिली.

त्या वर्ल्डकप नंतर भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. संघाकडे आदराने पाहिलं जाऊ लागलं. मानसिकता बदलली. देशातही क्रिकेटचं वारं जोमाने वाहू लागल. एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले. सामने पहायला लोक येऊ लागले. टीव्हीचे हक्क मिळाले. जाहीरातींच उत्पन्न वाढलं. खेळाडूंना पैसे मिळू लागले. त्याआधी खेळाडू रेल्वे किंवा बँकेत नोकरी करून क्रिकेट खेळत.

भारतिय क्रिकेटला एकीकडे संजीवनी देतानाच कपिलने ४०० बळींचा टप्पाही पार केला. त्याने भारतीय बॉलिंगचा गाडा आपल्या खांद्यावर एकट्याने ओढला. त्यातूनही निम्मे सामने भारतातच झाले. अशा पाटा पीचेसवरही त्याने विकेटस काढल्या हे विशेष. त्याला दिवसभर दिवसभर बॉलिंग करूनही थकवा, दुखापती कधीही सतावत नसत. दुखापतीमुळे तो खेळला नाही अस झालच नाही.

फक्त एकदा पुण्याच्या सामन्यात सुनील गावसकरने त्याला खेळू दिल नाही त्यामुळे सलग सामने खेळण्याचा त्याचा विक्रम झाला नाही. असले विक्रम नाहीतर फालतू असतात. कपिल देशासाठी आणि संघासाठी खेळणा-यातला होता. स्वार्थी खेळाडू नव्हता.

या अशा खेळाडूला भारतरत्न द्यायची मागणी क्का झाली नाही याच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कपिलच्या कोट्यावधी चाहत्यांना भारतरत्नची मागणी करायची असते हेच माहीत नव्हत. क्रिकेट खेळणा-यांना भारतरत्न दिल्याचं ऐकिवात नव्हतच मग त्यांना कसं समजणार ते ?

पण ज्यांनी त्याचा खेळाचा आनंद लुटला अशा सुशिक्षितांनी अशी मागणी त्या वेळी का केली नसावी ? कि त्याच्या या जिगरी खेळाचा आनंद त्यांना झाला नसावा ? कि त्याचं देशासाठी झोकून देणं त्यांना पसंत नसावं ? काही कळत नाही. जे झालं ते झाल.

आता भारत सरकार भारत रत्नच्या अटी शिथील करणार आहे अस ऐकलय. मग आता तरी ही मागणी का करू नये ? ज्यांना ज्यांना कपिलच्या खेळाचा अभिमान आहे , देशप्रेम आहे ते या मागणीला पाठिंबा देतीलच. ज्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्यावर जबरदस्ती करता येत नाही पण त्यांनी विरोध करू नये हे आवाहन आहे.

- मथुरादास दावणगिरी

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

.

>>तुम्ही देखील सुरूवात करू शकता जर तुम्हाला देशाबद्दल थोडं जरी प्रेम्न असेल तर

देशाबद्दल प्रेम असण्याचा इथे काय संबंध? काय भारतालाच भारतरत्न द्यायचंय का? Rofl
तुम्ही एवढ्या पोटतिडकीने धागा काढलाय म्हणून म्हटलं तुम्ही करा सुरवात.

मंदार जोशी

तुम्हाला खरच कपिलदेव यांना पाठिंबा द्यायचा असेल तर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्र लिहा. पत्ता देऊ का ? त्यासाठी कुणाची वाट बघू नका.

कपिलदेवचे कुठे काय करायचे. भारतरत्नाचे करायचे आहे.<<
अहो तेच म्हणतोय आम्ही पण दावणग्गीरीना कोण सांगणार.

गणू....आता ठरलेय ना सगळ्यांनाच द्यायचे म्हणून...मग आता नो मागणी वगैरे बर का....
माझे तर म्हणणे आहे, किमान एक डझनभर पुरस्कार गणूलाच मिळावेत...नुसते भारतरत्न काय घेऊन बसलात.
त्याचे अवांतर काम इतके प्रचंड आहे की ते पुरस्कारही कमी पडावेत

तुम्हाला खरच कपिलदेव यांना पाठिंबा द्यायचा असेल तर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्र लिहा. पत्ता देऊ का ? त्यासाठी कुणाची वाट बघू नका.<<<
अहो पण तुम्ही आधी पत्र लिहलत का पांठींबा द्यायला. Happy

काय म्हणता ? देशाचा संबंध नाही ?

क्रिकेट हा राष्ट्रीय धर्म आहे वगैरे वाचलं नाहीत का माबोवर यापूर्वी ? मग जया खेळात ज्याच्यामुळे आज काही खेळाडू कोटीच्या कोटी रूपये केवळ कैप्लच्या पायाभरणीच्या जोरावर कमवून खाताहेत त्याला नको का द्यायला भारतरत्न ? त्याला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोहच कि

असो, मथुरादास काका...तुम्ही फार मनाला लाऊन घेऊ नका...इथे कुणी कुणाचे कौतुक करत नाही. तुम्ही माबोवर मागच्या जन्मी होताय म्हणताय आणि तरीही तुमचा धागा सगळ्यांनी गांभिर्याने घ्या म्हणताय...यात जबरदस्त विसंगती नाही का...
मंदार गप रे आता...कपील देवचे काय करायचे ते आयसीएलचे पदाधिकारी बघुन घेतील.

मथुरादास, आपण फेणी + व्होडका + देशी दारू
एकदम घेऊ शकता आणि इथे टाईपही करु शकता याची खात्री झाली.

असो. आपण कपिलदेवकडे वळूया का? तुम्ही धागा काढलाय ना? मग बोला तुम्ही काय करणार आहात?

>>मंदार गप रे आता...कपील देवचे काय करायचे ते आयसीएलचे पदाधिकारी बघुन घेतील.

अरे हे महाशय देशप्रेम, देशद्रोह, राष्ट्रीय धर्म वगैरे सुसाट सुटले आहेत.
त्यांना खांदा देऊन मूळ मुद्द्याकडे आणायचा क्षीण प्रयत्न करतोय.

मंदार

पार्थिव पटेल आणि कपिलदेव यांची तुलना करून तुम्ही काय घेतलय हे सांगायची तरी गरज आहे का ? तुमची उतरली कि मी सांगेना हा मी काय करणारे ते Proud

अरे हे महाशय देशप्रेम, देशद्रोह, राष्ट्रीय धर्म वगैरे सुसाट सुटले आहेत.

ही पूर्वापार परंपरा आहे हो. मी फक्त त्या परंपरांचा पाईक होण्याचा क्षीण प्रयत्न करतोय

>>पार्थिव पटेल आणि कपिलदेव यांची तुलना करून तुम्ही काय घेतलय हे सांगायची तरी गरज आहे का ?

पुन्हा तेच. मी कुठे तूलना केलीये? त्यालाही द्या असं म्हटलं फक्त.

असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.

>>असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.

ते सोडून बोलताय तुम्ही सगळं. मुद्द्यावर या.

कपिलदेवच्या जोडीला पार्थिव पटेलचं नाव ? याआधी कधी नाही आठवलं ते ? काय म्हणता ?

तुमची उतरली कि सगळया पोस्तस पुन्हा वाचा. तोपर्यंत जयहिंद ! Wink

असो. आता कपिलदेवचं काय करायचं? धागा तर काढला आहात, आता पुढाकारही घ्या.<<<<<<<
देशप्रेम, देशद्रोह, राष्ट्रीय धर्म सध्यातरी त्यांची गाडी यावर गेलेय.

माझे तर म्हणणे आहे, किमान एक डझनभर पुरस्कार गणूलाच मिळावेत...नुसते भारतरत्न काय घेऊन बसलात.
त्याचे अवांतर काम इतके प्रचंड आहे की ते पुरस्कारही कमी पडावेत>>>

नको हो नको. तुम्हि जास्त लायक आहात त्यासाठी. मी प्रयत्न करिन तुम्हाला पुरस्कार मिळण्यासाठी. तुम्हि फक्त पुरस्काराचे नाव सांगा.

अरे काय चाल्लय...

मी उद्याच घोषणा करतो....."भारतरत्न ज्याचा आहे त्याला परत देउन टाका म्हणुन" नको ती लफडी....एक 'कोंबडी' नी हजार चोमडी.

मी आता एक स्पर्धा जाहीर करतो...मूळ धाग्याशी संबधित पोस्ट शोधून दाखवणार्यास
फेणी + व्होडका + देशी दारू , माझ्यातर्फे Happy

याचबरोबर, बेफकिर आणि बेफिकीर यांच्यातील सूक्ष्म आणि स्थूल फरक ओळखून दाखवणार्यास ही हे बक्षीस लागू (श्रीराम नव्हे ) राहील

Pages