आठवण...!!
आठवण...!!
तुझी आठवण आली की
विचारांचे आभाळ मनात दाटते,
डोळ्यांत पाणी अन् ओठांन् वर्ती स्मित हास्य आणते...
सोबतचा एक-एक क्षण
हा नविनचं वाटायला लागतो,
तो फ़क्त प्रत्येक क्षणांणची आठवण देऊन
डोक्यात फ़क्त विचार ठेऊन जातो...
कारण; घालवलेले प्रत्येक क्षण हे सुख-दुखा:चे होते
तुझी आठवण आली कि, मन मात्र 'वेडे' होते....
कळत-नकळत मला तो क्षण हि आठवतो
मग मात्र तुझा तिरस्कार मनात दाटतो,
पानावलेल्या डोळ्यांनि ऊर भरुन येतो
अन् शेवटी केवळ " आठवण " हा एकच् शब्द ऊरुन जातो.....