आत्याबाईंच्या गोष्टी
आत्याबाई घरात सगळ्यात वडिल. साहजिकच त्यांना कुटूंबात मान असायचा. पण आपली वडिलकी
त्यांनी उगाचच कुणावर गाजवली नाही. नणंदांशी त्यांचे संबंध कायम सौदाहार्यपूर्णच राहिले.
त्या मुळेच घरातील सगळ्यांना त्या हव्याहव्याशा वाटायच्या. त्या माहेरपणाला कधी येतात याची
मंडळी वाट पहात असायची. आम्ही मुले तर त्यांच्या येण्याची डोळ्यात तेल घालून वाट पहात असू.
नऊवारी साध्या पातळातली, शांत,सोज्वळ, प्रेमळ अशी आत्याबाईंची मूर्ति समोर दिसली की आमच्या
आनंदाला पारावार रहात नसे. याला आणखीही एक कारण होत, आणि ते म्हणजे आत्याबाईंच्या गोष्टी.
पेशंट : वा फारच छान वाटतंय आता , डॉक्टर तुमच पाहिलं शस्त्रक्रिया खूपच यशस्वी झाली
चित्रगुप्त : साहेब डॉक्टर खाली राहिले तुम्ही स्वर्गात आलात
पत्नीशी मुद्दाम वाद काढल्यामुळे काही घटकांचे स्वातंत्र्य प्राप्त होते हे आपण सर्व जाणतोच! हा वाद परिणामकरकरीत्या व खात्रीलायक पद्धतीने काढता येईल किंवा नाही याबाबत मागे काही विचारमंथन केलेले होते. त्याबाबत काही टिपण्ण्या:
पत्नीशी वाद कसा काढावा -
असा एक लेख 'हसलात तर कळवा' मध्ये लिहीला होता. ३ वर्षांच्या वाढीव अनुभवानंतर काही नवीन टिप्ससह येथे देत आहोत. याचा उपयोग करताना रॉयल्टी द्यावी लागणार नाही मात्र स्वतःच्या जबाबदारीवर या उपायांची अंमलबजावणी करावी लागेल.
मूळ पुस्तक माझ्याकडेच उपलब्ध असून ते फुकट नेणार्यास दहा रुपये मिळतील.
-'बेफिकीर'!
दूल्हा
टीव्हीवर आजतक चॅनेलवर बातम्या ऎकत होतो.
स्क्रीनवर खाली रनवेवर स्फुट बातम्यांची विमान उडत होती.
लक्ष गेल तर बॉलिवूडच कौतुक -"दुल्हन बनेगी दिया, उसका कौन
बनेगा दूल्हा..."
एकदम सापडल उत्तर :- "माचिस"
ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा
(ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
(भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव)
अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती उशीर? आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार? अन सरकार कसे हादरणार?
(अर्जून रंगमंचावर येरझर्या घालतो.)
पाषाणभेद यांच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ.
नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.
वाडेश्वरचे संस्थापक अजीत घाटगे यांची काल मुलाखत घेतली. सायंकाळी साडे सात वाजता मी वाडेश्वरला गेलो तेव्हा ते विषण्ण मनस्थितीत अंधारलेल्या आकाशाकडे पाहून आता आयुष्यात काहीही राहिले नाही हे भाव लोचनांत धारण करून अध्यात्मिक होण्याच्या मार्गावर बरेच पुढे गेले असल्याची जाणीव करून देत होते.
"सर, आपली मुलाखत घ्यायला आलो आहे"
"घ्या, फक्त घ्या, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण काहीतरी तरी घ्या"
"म्हणजे काय सर??"
एक खिन्न सुस्कारा सोडून माझ्याकडे 'माझ्या थ्रू' पाहात असल्याप्रमाणे पाहात ते म्हणाले.
"तुम्हाला काय वाटते?? हे.. हे जे आजूबाजूला आहे हे सगळे काय आहे आहे???"
तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्
तु घरी नसतेस तेंव्हा घर कसे डायलटोन गेलेल्या फोन सारखे वाटते । तो म्हणाला
तुम्ही घरी नसता तेंव्हा घर कसे सिमकार्ड नसलेल्या मोबाईल सारखे वाटते । ती म्हणाली
मुलं जवळच होती, ती म्हणाली आई, बाबा तुम्ही घरी नसता तेंव्हा आंम्हाला कसा फ्रिटॉक टाइम मिळाल्या सारखा वाटतो. आई, बाबा मुलांना म्हणली बेटयांनो तुम्ही घरी नसता तेंव्हा आंम्हाला घर कसे कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेल्या सारखे वाटते ।