गणेश पावले

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४३ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०१६ (१८ जून २०१६)

Submitted by गणेश पावले on 20 June, 2016 - 03:36

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४३ वा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा २०१६ – श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड
3.jpg
दरवर्षीप्रमाणे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो तो क्षण म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा. हा दिवस म्हणजे हिंदवी स्वातंत्र्याचा, रयतेच्या राज्याचा, गुलामगीरीच्या विळख्यात खितपत पडलेल्या हिंदुस्थानात एक मराठा राजा टिच्चून उभा होता आपल साम्राज्य प्रस्थापित करून हा लढवय्या योद्धा आजच्या दिवशी सिंहासनाधिश्वर झाला होता. अर्थात "श्रीशिवराज्याभिषेक सोहळा."

विषय: 

भक्ती आणि शक्ती संगम - धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून.

Submitted by गणेश पावले on 11 July, 2015 - 04:25

☼"ज्ञानोबा - तुकोबा"च्या मंत्रात "शिवाजी - संभाजी" हे दोन महामंत्र गुंजले अन धन्य झाले पुणेकर हा अविस्मरणीय सोहळा पाहून☼

संत पाऊली गोजीरी ,गंगा आली आम्हावरी
जेथे उडावी रजधुळी ,तेथे करावी अंघोळी

मित्रहो,
मान्य कि वारीत तलवारी काय कामाच्या….

वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्राची परंपरा.
अन या परंपरेला शिवकाळात अभय दिल असेल तर ते फक्त शिवाजी संभाजी या पितापुत्रांनी.

अस म्हटल जात वारीला हि छ. शिवाजी महाराज भेट देत, साधु संतांच्या दर्शनाला जात.

आणि
हि परंपरा अखंड चालू होती.

बेफिकीर…पण काही क्षणापुरताच

Submitted by गणेश पावले on 5 June, 2015 - 02:11

कागदावर रेखाटलेलं आयुष्य, ओरबडलेलं लेखन आणि कित्येक कागदांचा चुरा करून हिरमुसून सांडलेले अश्रू सारं काही तुझ्यासाठीच…
तुझ्या सवयी, गोड आठवणी जपताना साऱ्या जखमां पुन्हा भळभळत ताज्या होतात, तीव्र वेदनेत त्या कळा नकोशा झाल्या कि अबद्र ते सारे शिव्या शाप मीच मला देत कुडत बसतो.
मनाची कवाडे केंव्हाच बंद केली पण त्यावरील तुझी दस्तक अजूनही तशीच. रोज तीळ तीळ तुटताना मगरमिठीत गवसल्याची जाणीव होते या भाबड्या जीवाला. नकोसा होतो हा देह, नकोसा वाटतो जीव. मी जगतो ते फक्त तुझ्या निशाणीसाठी.

तुझं प्रेम

Submitted by गणेश पावले on 5 June, 2015 - 00:53

कित्येक मैलाचा प्रवास केल्यावर
मिळालेला विसावा म्हणजे तुझं प्रेम

अथांग सागर पोहून पार केल्यानंतर
मिळालेला किनारा म्हणजे तुझं प्रेम

आयुष्याच्या खडतर प्रवासात
लाभलेलं सुख म्हणजे तुझं प्रेम

अपार कष्ठानंतर सुखाची ओंझळभरून
मिळालेलं फळ म्हणजे तुझं प्रेम

सुखादुखाच्या असह्य वेदनेनंतर
क्षमलेली कळ म्हणजे तुझं प्रेम

मायेचा ओलावा.. ममतेचा पाझर
जीवनभराचा गारवा म्हणजे तू प्रेम

- गणेश पावले

आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

Submitted by गणेश पावले on 4 June, 2015 - 01:27

☼ आई हिंदवी स्वराज्य स्थापू दे !!

जन्म घेवू पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज,
मातीसाठी मरू कितीदा घेवू शपथ आज.

माय मराठी जाचात भरडली मातला अनर्थ भारी,
करू अभिषेक रक्ताचा आज मिळून रायरेश्वरी.

पातशाहीचा बिमोड करू राखू लाज मुलुखाची,
प्राणपणाने स्वराज्य मिळवू इच्छा हि "श्री" ची.

आई भवानी आहे साथीला उंच उभारू भगवा,
तुकडे करू राई एव्हढे आलाच जर गनीम आडवा.

सह्याद्रीची उत्तुंग शिखरे साद घालिती आम्हास,
स्वराज्याचं तोरण बांधून रक्षु हिंदू धर्मास.

हर हर महादेवाचा नारा आता अटकेपार गर्जुदे,
मावळा लढण्यास सज्ज आई हिंदवी स्वराज्य स्थापु दे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

Submitted by गणेश पावले on 1 June, 2015 - 02:05

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड" (३१/०५/२०१५)

कशासाठी आणि जगावे कसे मी
विचारा स्वताला असा प्रश्न नेहमी
जगू पांग फेडावया माय भू चे
जगू पांग फेडावया धर्म भू चे
आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे….

राजांची पालखी
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, ३४२ वा " श्रीशिवराज्याभिषेक सोहळा " श्री शिवक्षेत्र, दुर्गदुर्गेश्वर रायगड"

विषय: 

एक थरारक प्रवास "किल्ले रांगणा" चा

Submitted by गणेश पावले on 29 May, 2015 - 03:37

मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून

Submitted by गणेश पावले on 26 May, 2015 - 04:43

माझ्या संगणक संग्रहात जुने फोटो चेक करता करता….
अंगावर शहारा आणणाऱ्या या रांगोळ्या दिसल्या.…

ठाणे शहरात अश्वमेघ प्रतिष्ठान ठाणे - यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवसृष्ठीला भेट देण्याचा योग आला. आणि तिथेच टिपलेल्या या अविस्मरणीय रांगोळ्या.

इतिहास जिवंत करणारी हि बोलकी चित्रे वाटलं तुम्हापर्यंत पोहचवावी…।
म्हणून इथे प्रकाशित करत आहे.

पहा…. मन थक्क करणारा इतिहास रांगोळीतून

-धन्यवाद
गणेश पावले

हिंदवी स्वराज्य संस्थापक

किल्ले वसई दर्शन व अभ्यास

Submitted by गणेश पावले on 19 May, 2015 - 03:54

श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान मुंबई विभाग यांच्यावतीने किल्ले वसई दर्शन आणि अभ्यास मोहीम हाती घेण्यात आली. इतिहासाबद्दल अभ्यासू वृत्ती व्हावी व दिन शिवस्मरणात जावा यासाठी मुंबईजवळच आसलेल्या किल्ले वसई या जलदुर्गाची निवड करण्यात आली. चिमाजी आप्पा आणि त्यांचा अद्वितीय पराक्रम, शौर्याची गाथा आपल्याला माहित आहेच. पण त्यांची खुबी. आणि लढाई कौशल्य फारच कमी लोकांना माहित आहे.

विषय: 

निद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे

Submitted by गणेश पावले on 13 May, 2015 - 03:15

Lohgad_1_0.jpgनिद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे

स्वैर झाले विचार, मुठ हातातच गळली
जाज्वल्य इतिहास आपला, आजची पिढी विसरली

जिथ स्वराज्य स्थापिले, तीच ही सह्याद्री माउली
स्वाभिमान विसरून कार्टी, गडाकड फिरकली

दगडावर नाव कोरले, गळ्यात गळे घातले
इतिहास विसरून आपला, अब्रूस वेशीवर टांगले

सुशिक्षित म्हणती स्वताला, ज्ञान मात्र शून्य
बापजाद्याची आठवण नाही, नपुसंक त्यांचे पुण्य

आई बापाचेच संस्कार नाहीत, लेकरे उद्दाम निपजली

Pages

Subscribe to RSS - गणेश पावले