१.
नमस्कार तुषारजी, अयोध्येतल्या पराभवाने खचलो होतो. तुमचे विश्लेषण वाचून मनावरचे मळभ दूर झाले. मनाला शांत वाटत आहे. धन्यवाद.
धन्यवाद केशवजी,
आता आपण सगळे सावध होऊया मित्रांनो. आजपासूनच कामाला लागूया. व्हॉट्स अप वर जास्तीत जास्त आप्तेष्टांना परिचितांना जागे केले पाहिजे. नाहीतर येत्या विधानसभेला जड जाईल. शत्रूला कमी लेखून चालणार नाही.
२.
अ : कोरसेकर आपली गुपिते फोडतात. विरोधी पक्षातले नेते कोरसेकरांचे व्हिडिओ बघून सावध होतात आणि त्याप्रमाणे स्ट्रॅटेजी बनवतात. युपी मध्ये हेच घडले असेल का हो? कारण कोरसेकर हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवतात. ते अखिलेश यादवांनी बघितले असतील का? कृपया यावर उजेड टाकावा. धन्यवाद.
ब : सहमत. कोरसेकरांना हे कुणीतरी सांगायला हवे.
३.
अ : किती करायचे हो एकट्या मोदीजींनी..! दिवसरात्र झटतात ते देशासाठी. आपणच कमी पडलो. आता संसदेत वेगाने विकास होणार नाही. पप्पू अडथळा आणेल.
ब : अगदी बरोबर! तुमचे विश्लेषण मला नेहमीच पटते. आता देश पन्नास वर्षांनी मागे जाईल, असे वाटते.
४.
अ : दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या. मोदीजींनी तसा कायदा करायला पाहिजेय.
ड : आता तसला कायदा करता येणार नाही. नीतीश नायडू करू देणार नाहीत.
अ : अमितजी शहाजी करतील त्यांना बरोबर सरळ. थोडी वाट पाहूया. आता आपणच एकमेकांना धीर द्यायला हवे आहे. धन्यवाद.
५.
अ : दोनवेळा एवढे पाशवी बहुमत मिळूनही CAA कायदा केला नाही. मी इथे केव्हापासून सांगत होते. आमचे कुणी ऐकतच नाही. आम्ही वयस्क लोक. काय करणार दुसरं सांगण्याशिवाय?
ब : पाशवी बहुमत असे कसे म्हणता? हे चूकीचे आहे. कृपया असे बोलू नये. मोदीजींना लोक प्रेमाने मतं देतात. धन्यवाद.
६.
दोन दिवसांपासून झोपलेलो नाही. मोदीजींच्या मनाला तर किती यातना झाल्या असतील. काल ते किती निराश दिसले..! काही नाही, आपण सगळे त्यांच्या पाठिशी उभे राहूया. सगळ्यांनी त्यांना पॉझिटिव्ह व्हाईब्ज पाठवूया. ईश्वर त्यांना पुन्हा भरारी घेण्यासाठी ऊर्जा देवो हीच प्रार्थना. धन्यवाद.
७.
अ : कालचा समारंभ पाहिला. डोळ्याचे पारणे फिटले. नीतीशजी काल किती प्रेमाने बोलले मोदीजींबद्दल. खरं सांगू का? मनाला फार फार समाधान वाटले. आता काही चिंता करण्याचे कारण नाही. होईल सगळे नीट.
ब : नीतीश प्रेमाने बोलले म्हणून तर धाकधूक वाढली आहे.
अ : नाही नाही, तसे काही होणार नाही. नाहीत पलटणार नीतीश. तुम्ही आतापासूनच धाकधूक वाढवू नका हो. सकारात्मक रहा की थोडंसं. // स्वामी ओम् //
८.
सगळ्या मराठी मिडियावर बंदी घातली पाहिजे. आमच्यात तर मराठी चॅनेल्स बघायचे बंद केलेय. रिपब्लिक भारत बघतो. किती परखड बोलतात अर्णवजी. सगळं पटतं मनाला. पण लोकांना हे का कळत नाही, कुणास ठाऊक.! दुर्दैव आहे या देशाचं. लोक हिंदू म्हणून मतदान करायला कधी शिकणार? ते लोक कसे एकगठ्ठा करतात?
९.
अ : अयोध्येच्या आजूबाजूला 'ते' लोक ऐंशी टक्क्यांहून जास्त आहेत. त्यामुळे आपण हरलो. आम्ही गेलो होतो फेब्रुवारीत दर्शनाला. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तिथल्या स्थानिक लोकांशी बोलण्याचा योग आला, त्यातून मला समजले होते तेव्हाच. हे असेच चालणार. अवघड आहे.
ब : मला तरी हे सगळे आंतरराष्ट्रीय कारस्थान असावे असे वाटते. मशीन हॅक केल्या असतील का हो?
१०.
त्या लोकांना बघवत नाही आपला जगात डंका वाजलेला. ते लोक गावोगावी संख्या वाढवत चालले आहेत आणि आपण झोपून राहिलो आहोत. असं कुठवर चालणार. वेळीच जागे व्हायला हवे.
११.
उनो लोगों को लगा की अब इस बार हमारेकु देश के बाहेरीच निकाल कु देंगे. कुच तो बी करना पडता इस टैम.
हमने बोला की बाबा वैसा नय होना करके. तुम लोगोंकु निकाल देंगा तो उनो लोगों का पालिटिक्स कैसा करने का.? दुकानीच बंद होता ना ? पर उनो लोगोंने मानाच नय. खचाखच खचाखच बटन दबाकू आया.
१२.
अ : विरोधकांनी महाराष्ट्रात खोटा प्रचार केला. विरोधक कपटी आहेत. आणि आपले आयटी सेल झोपा काढत होते का? मालवीय यांच्यावर मोदीजींनी कारवाई करावी. धन्यवाद.
ह : सहमत. खोट्या प्रचाराला लगेच उत्तर द्यायला हवे.
१३.
अ : देवेंद्रजींनी आता अन्याय सहन करू नये. भाजपमधून बाहेर पडून वेगळा पक्ष काढावा. भाजपचे आणि विरोधी पक्षातले आमदारही देवेंद्रजींसोबत येतील. आता बस झाले. किती सहन करायचे त्यांनी. आणि किती त्याग करायचा अजून ?
क : ते असलं काही करणार नाहीत. ते मास लीडर नाहीत.
कुणीही आमदार मागं येणार नाहीत. त्यांनाही ते माहित आहे.
अ : मास लीडर नाहीत असं कसं म्हणता? तुम्ही ब्रिगेडी आहात. जातीयवाद पसरवता.
१४.
अ : मोदीजींनी सगळ्या मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्येत दर्शनाला जावे. त्याचा एक वेगळाच इंपॅक्ट पडेल. आणि त्यामुळे मंदिराचा प्रभाव पुन्हा वाढेल. तुम्हाला काय वाटते ?
ब : पूर्णपणे सहमत. छान कल्पना.
१५.
अ : आमच्या नाशकात आणि दिंडोरीत कांद्याने आपले उमेदवार पाडले. भुजबळांनी नाराज होऊन काम केले नाही, ते वेगळेच.
ब: ह्या शेतकऱ्यांना सगळं फुकट पाहिजे. कुणालाही काहीही फुकट द्यायचे बंद करावे. खांग्रेसींनी या सगळ्या वाईट सवयी लावून ठेवल्या आहेत लोकांना.
अ : शेतकरी काहीही फुकट मागत नव्हते. कांद्याची निर्यातबंदी उठवा म्हणत होते फक्त.
ब : तुम्ही गप्प बसा हो. तुम्हाला काही कळत नाही. पवार शेतकऱ्यांना उचकवतात. आणि सगळं मोदीजींनीच करायचं तर मग स्थानिक नेते काय करणार ?
१६.
अयोध्येच्या स्थानिक व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकायला सांगा. पाचशे वर्षांच्या गुलामगिरीतून मोदीजींनी आपल्याला मुक्त केले. पण हे आपल्यातलेच जयचंद घातक ठरले. लाजिरवाणी गोष्ट आहे.
१७.
अ: नमस्कार सुमितजी, कोरसेकर कमेंट्स सेक्शन बंद करून ठेवतात. त्यांना तो उघडायला सांगा. म्हणजे आमचे इनपुट्स त्यांच्यापर्यंत पोचवता येतील. तुमचा त्यांच्याशी काही कॉंटॅक्ट आहे का? कळावे. धन्यवाद.
ब : नको. कमेंट सेक्शन उघडला की लोक शिव्या देतात.
क: होय. दुर्दैवाने खरे आहे. आदरणीय भाऊंसारख्या निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारांचंही ट्रोलिंग होत असेल तर त्याहून वाईट काय असू शकतं. //स्वामी ओम्//
१८.
अ : कंगना राणावत वर हल्ला झाला. आणि उलट तिलाच ट्रोल करत आहेत लोकं. भयंकर आहे सगळं. एखाद्या खासदाराला असे कसे काय मारू शकतात? उद्या कुणीही उठून कुणालाही मारेल. अशी हिंसा करणे योग्य नाही. जाहिर निषेध.
ब : कुठलीच हिंसा योग्य नाही. गांधींना गोडसेनं मारलं, तेपण योग्य नव्हतं.
क : अशी तुलना करणे योग्य नाही. तुम्ही जरा इतिहास नीट वाचा. पंडीत नथुराम देशभक्त होते. त्यांची कृती चुकीची असली तरी, अत्यंत प्रखर देशभक्तीतूनच त्यांनी ती कृती केली, हे लगेच तुम्हाला समजुन येईल. धन्यवाद.
ड : त्या बाईचे खलिस्तानी लोकांशी संबंध असावेत, अशी शंका येते. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे.
थ : बॉलिवूडचे लोक कसे गप्प आहेत बघा. एवढा हल्ला झाला तरी कुणी बोलत नाही. त्यांनी न घाबरता बोलले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे.
ज : होय. अगदी सहमत. किमान हृतिक रोशनने तरी बोलायला पाहिजे.
१९.
अ : आदरणीय भाऊसाहेब कुठे आहेत? अजून जुनेच व्हिडिओ का टाकत बसले आहेत? मी कधीपासून वाट बघतोय.
ब : निकाल बघून ते आजारी पडले आहेत, असे म्हणतात. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य देवो. आणि लवकरात लवकर कार्यरत होण्याचे बळ देवो. धन्यवाद. //जय हिंद//
२०.
काही नाही. सगळ्यांना आता खरी हुकुमशाही काय असते ती दाखवून द्यावी मोदीजींनी. बास झाले आता या लिब्रांडूंचे लाड. यांना मोकळे सोडण्यात अर्थ नाही. आणि ते राऊत रोज सकाळी येऊन भोंगा वाजवतात. कशाला काढले त्यांना बाहेर.? अमितजींनीच आता पक्षाध्यक्ष व्हावे. नड्डा काही कामाचे नाहीत.
२१.
अ : तुमचं विश्लेषण पटलं. एवढा मोदीजींनी जगात डंका वाजवला. तरीही असा निकाल लागला. एवढी कामे करूनही लोक असे वागतात, याला काय म्हणायचे?
भ : डंकापतींचं लीड वाराणसीत दीड लाखांवर आलंय.
च : लोकांना चांगल्या माणसाची किंमत नसते, हेच यातून सिद्ध झाले.
भ : खरंतर कॉंग्रेसवाल्यांचे आभार मानले पाहिजेत.
अ : म्हणजे ? काय म्हणायचेय तुम्हाला?
भ : कॉंग्रेसवाले बिचकले. त्यांनी रिस्क घेतली नाही. वाराणसीत प्रियंका गांधीला उतरवलं असतं तर डंकापतींचा बंटाधार झाला असता ४ जूनलाच. शपथविधी वगैरे सगळा पुढचा विषयच मिटला असता.
अ : खांग्रेसी स्पॉटेड !!
भ : जन्मांधभक्त स्पॉटेड..!!
२२.
घ : ह्या अजित पवारांना घेऊन काहीही उपयोग झाला नाही. तोटाच झाला. आपल्यापण लोकांना आवडले नाही. आणि तिकडे काकाच्या बाजूने वारं फिरलं. बारामती पण गेली.
झ : अगदी सहमत. आणि आता ते केंद्रात दोन दोन मंत्रीपदं मागत आहेत? काय खाऊ आहे का?
त : मला तर वाटते त्यांना काकानेच शिकवून पाठवले आहे. अर्थखात्याची सगळी तिजोरी सताड उघडून दिलीय त्यांच्या त्यांच्या आमदारांना. आता अधिवेशनात अजून उरलासुरला डल्ला मारून ऐनवेळी काकाकडे पसार झाले नाहीत म्हणजे झालं.!
झ : राज्यातला मंत्रीमंडळ विस्तार कधी आहे ? त्यातपण भांडणं लागणार आता यांची.
त : आता कसला विस्तार न् फिस्तार? तीन महिन्यात निवडणूक येते. काय करणार मंत्री होऊन? सगळे ह्या सरकारपासनं लांब पळायला बघायला लागलेत.
छ : हो. खरंय. आपण सावध झाले पाहिजेय.
द : हम्म. झोपा आता. उद्या बघू.
जबरी लिहिलय
जबरी लिहिलय
सांप्रति
सांप्रति
सूक्ष्म उपहास अचूक टायमिंगला आला तर कसला कहर माजवतो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हा धागा.
लिहीत रहा.
बरोबर आहे शीर्षक.. वाट्टेल ते
बरोबर आहे शीर्षक.. वाट्टेल ते..
भारी लिहिलंय!
भारी लिहिलंय!
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय. हे ग्रुपपुरतं मर्यादित का आहे? खुलं करा.
जब्बरदस्त !! लिहिते रहो!!
जब्बरदस्त !! लिहिते रहो!! तंबी दुराई ची आठवण आली
कहर लिहिलय अगदी
कहर लिहिलय अगदी
पु ल लिखित खिल्ली ची आठवण झाली
जबरी!
जबरी!
मला तर वाटतंय हे जसं च्या तसं
मला तर वाटतंय हे जसं च्या तसं ट्विटर वरून घेतलयं.....सध्या ट्विटर वर महाराष्ट्रांतल्या भाजप आयटी सेलवाल्यांचं आणि भाजपासमर्थक ट्रोल्सचं हेच चालू आहे.