सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली व पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले. यावर गुन्हेगारांचे फटाके वाजवून स्वागत करणे पुण्याच्या संस्कृतीला शोभत नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावर माणिकराव ठाकरे कसे गप्प बसतील? कलमाडींची बाजू घेत ते म्हणाले, ‘‘पद्मसिंग पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसता हे चालते काय?’’ महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत. भ्रष्टाचार व गुंडगिरीचे पुरावे देत आहेत. भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या हाती सत्ता असणे हाच महाराष्ट्रात ‘गुंडा’राज सुरू असल्याचा पुरावा आहे.
मंडळी
इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने) ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.
तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.
बेल्लारीच्या पोट निवडणुकीचा निकाल इंटरेस्टिंग आहे. मूळ भाजपचे पण आता बंडखोर उमेदवार श्रीरामुलू (चुभूद्याघ्या) अपक्ष म्हणून विजयी झाले. भाजपच्या अधिकृत उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. एकूण मतांची संख्या (जी आमदारकी च्या निवडणुकीच्या मानाने फार कमी वाटते) पाहता ४७,००० मतांचा फरक जबरदस्त आहे.
हा मतदारसंघ म्हणजे त्या सगळ्या मायनिंग स्कॅण्डलचाच ना?
सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लोकांनी दिलेला निकाल म्हणावे तर हे श्रीरामुलू यात अडकलेल्या रेड्डी बंधूंचेच उमेदवार्/साथीदार आहेत असा आरोप आहे.
कापूसप्रश्नी सर्वपक्षीय बैठकीत
शेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स मधुन सभार -
अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना हात घालत केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मल्टीब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परकीय गुंतवणुकीला ( एफडीआय ) अखेर परवानगी दिली . या निर्णयामुळे वॉलमार्ट , टेस्को , कॅरीफर यासारख्या बहुराष्ट्रीय जायंट रिटेल कंपन्यांना देशातील ५३ शहरांत ' मेगा स्टोअर ' उभी करता येणार आहेत . तसेच , ' सिंगल ब्रँड ' रिटेलमध्ये एफडीआयवर असलेले ५१ टक्क्यांचे बंधन काढून घेऊन या क्षेत्रात १०० टक्के गुंतवणुकीस मान्यता देण्यात आली आहे .
लोकसत्ता मधुन सभारः-
सीमा भागातील मराठी भाषकांचा जन्म गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे. त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये प्रतिस्पर्धी देश वाटतात, असे मराठीद्वेष्ट्ये विधान सोमवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी बेळगावात एका कार्यक्रमात केले.
बेळगावचे आधी नामांतर करावे. रेल्वे स्थानकावर तत्काळ बेळगावी फलक लावण्यात यावा, अशी सूचनाही कंबार यांनी केली.
दहावीपर्यंत कन्नड सक्ती करावी तसेच सीमा भागातील मराठी भाषकांना मराठीतून शिक्षण हवे असेल तर त्यांनी कर्नाटकातून चालते होऊन महाराष्ट्रात निघून जावे, असे संतापजनक उद्गार यापूर्वी कंबार यांनी काढलेले आहेत.
नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?
कॉंग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांच्या अकलेची नव्हे तर बेअकलेची तारीफ करावी तेवढी थोडी. कधी काय मुफ्ताफळे उधळतील व अकलेचे चांदतारे तोडतील याचा नेम नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्दुसरा अपवाद वगळता सलगपणे राहुल गांधीचे घराणेच दिल्लीची गादी उबवीत आले आहे व आताही युवराज राहुलचेच नाव कॉंग्रेसचा अध्यक्ष आणि मनमोहन सिंगांच्या जागी भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे. अर्थात या लल्लूची तेवढी कुवत आहे काय? हा प्रश्न आहेच. उत्तर प्रदेशात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तेथील एका सभेत युवराजांनी उत्तर भारतीयांना विचारले, ‘पंजाबमध्ये जाऊन किती दिवस मोलमजुरी करणार?
एअर इंडियाचा महाराजा कंगाल, भिकारी झाला व त्यास भिकारी करणारे मंत्री व लुटमार करणारे अधिकारीच होते. आता अति श्रीमंत, गर्भश्रीमंत वगैरे उपाध्यांनी प्रख्यात असलेले विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही देशोधडीस लागली. अर्थात किंगफिशर देशोधडीस लागल्यामुळे मल्ल्या यांची श्रीमंती, त्यांचे ऐटबाज राहणीमान, त्यांची छानछोकी यात कुठेही कमी झालेली नाही. त्यांचे रंगढंग सुरूच आहेत, पण किंगफिशर देशोधडीस लागल्याचा सगळ्यात जास्त फटका प्रवाशांना व त्यांच्या कर्मचार्यांना बसला आहे. विजय मल्ल्या यांच्या किंगफिशरचे काय होणार याची सर्वाधिक फिकीर लागली आहे ती अर्थशास्त्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांना.
शुन्याचा शोध भारताने लावला असे शाळेत सांगितले होते. पण नुकतेच वाचले की तो शोध अर्बी लोकान्नी लावला होता. भारतात आर्यभटाने शुन्य शोधुन काढले असे वाचून अभिमान वाटला होता. विमानाचा शोधही एका भारतातल्या माणसाने खुप पुर्वी लावला होता. पण ते क्रेडीट राईट ब्रदर्सला गेले. तसेच शुन्याच्या शोधाचे झाले असेल का ? सर्च इंजिनवर सर्च केल्यावर शुन्याचा शोध अरबान्नी, ज्युन्नी व भारतियान्नी लावला अशा लिन्क्स येतात. म्हणजे शून्य नक्की कुणी शोधले होते ? तुम्हाला काय वाटते ?