गणेश शिंदे
हरवलेली कवितांची वही ...
हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन
आठवणीतला रेडिओ...
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
आठवणीतला रेडिओ...
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
बाजार..
मार्च महीण्यातले रणरणते उनं..गावातला आठवडी बाजार गच्च फुललेला होता..लग्नसराईचे दिवस असल्यानं सगळ्याच दुकानवजा पालावर आजुबाजुच्या खेड्यावरील बाया,माणसे,मुला-मुलींची गर्दी मावत नव्हती..ज्या मुलींची लग्न ठरलेली होती त्या मैत्रिणीसोबत कटलरी-स्टेशनरी च्या दुकानावर 'नकपालीस',मेंदीकोण,पावडर,लाली,चमकी,बिंदी,'भारी'चे सेंट,हातरुमाल,छोटे आरसे घेतांना मध्येमध्येच वेड लागल्यागत खुदकन हसत होत्या..या सगळ्यामध्ये बिचार्या दुकानदाराची त्रेधातिरपिट उडत होती..
पळपुट्या जखमा किती..
पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!
मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!
लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!
आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!
ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी...
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!
कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..??
सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
बर्याचवेळा...
बर्याचवेळा..
भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..!!
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!
देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!
ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!
व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!
त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!
खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!
-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
गजल
कोठुनी शिकले असे हेे विस्तवाने?
आतल्या आतून जळते मन पहाने..!!
ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!
गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!
प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!
वायदा दुःखासवे कुठलाच नाही..
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!
भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!
दूर गेली फार तू कुठल्या कलेने?
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..
उपवास..
उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते तर त्यांच्यासोबत लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय' कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
उपवास..
उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते तर त्यांच्यासोबत लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय' कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
Pages
