To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते...
**************************
गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा
**************************
“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... काय करायचं आहे आपल्याला? ...
माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? वेळ चांगला जावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले (कोरोना काळात ...!). त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.
बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?
२०२० साली नवे शैक्षणीक धोरण जाहीर झाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आतापर्यंत कळलेले काही ठळक मुद्दे:
- ५वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषा किंवा राज्याच्या अधिकृत भाषेमधुन.
- वैद्यकीय व कायदा वगळता ईतर सर्व उच्चशिक्षणासाठी एकच केंद्रीय मंडळ.
- उच्चशिक्षणामधे अनेक एग्झिट पॉईंटस - उदा - १ वर्षी बाहेर पडल्यास सर्टीफि़केट, २ वर्षे डिप्लोम , ३ वर्षे डीग्री ई.
- १०/१२ बोर्ड परिक्षा रद्द (unverified)
- १०+२ ऐवजी आता ५+३+३+४
- भाषांतर व भाषा यासाठी नवी संस्था. संस्कृतवर भर.
- सहावीपासुन कोडींग शिकवणार
यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आयआयटी कॅम्पसला ऑटोने नव्हे तर सायकल रिक्षातून जायचे ठरवले. पहिल्यांदा एडमिशन साठी आले होते तेंव्हा सभोवतालचे दृश्य पाहून फार छान वाटले होते. पण बरोबर आई आणि माझ्या चार मोठ्या बॅगा, म्हणून टॅक्सी केली होती. त्याच वेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेंव्हा स्टेशन ते कॅम्पस सायकल रिक्षाची मजा लुटू. मी स्टेशनबाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. मी एका रिक्षेकडे वळले आणि पाठमोऱ्या असलेल्या त्याला विचारले," तुमि की आमाके आयआयटी निये आबे..?" रिक्षावाल्याने माझ्याकडे वळून पाहिले, आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदानंद!
अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्यात,लॉबीच्या कोपर्यात, लिफ्ट मधे कोपर्यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते.
नमस्कार!
मला शैक्षणिक उपयोगासाठी एक अॅन्ड्रॉईड अॅप बनवुन हवे आहे. त्यामध्ये साधारण १० जीबी पर्यन्त माहिती साठवली जाईल. पिडीएफ , ऑडिओ, व्हिडिओ अश्या स्वरुपामध्ये माहिती द्यायची आहे.
वर्गवार व विषयवार फोल्डर्स असावेत. फार किचकट डिजाईन नसावी. अशी अपेक्षा आहे.
सदर अॅप हे विद्यार्थी व पालकांना शक्यतो मोफत द्यायचे आहे, त्यामुळे त्यानुसार बजेट आहे.
किती दिवस लागतील व किती खर्च येईल त्याबाबत क्रुपया त्या क्षेत्रातील जाणकारांनी विचारपुस / इमेल द्वारे संपर्क करावा.
धन्यवाद!
काल टीव्हीवर कुठलासा चित्रपट पहात होतो. चालू असलेल्या सीन मध्ये साध्या वेशात असलेला नायक दोन हवलदार घेऊन नायिकेच्या घरी जातो आणि आपण पोलीस असल्याचे सांगतो. तो साध्या वेशात असल्यामुळे अर्थातच नायिकेचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती त्याला त्याचे आयकार्ड मागते. त्याच्या चेहऱ्यावर आधी ‘आपल्याला आयकार्ड विचारणारी ही कोण?’ असे काहीसे भाव उमटतात, पण काही क्षणातच त्याचा चेहरा हसरा बनतो. तो आपल्या खिशातून आयकार्ड काढतो आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये नायिकेसमोर धरतो. प्रसंग अगदी साधा. पण तो नायक ज्या पद्धतीने आपले आयकार्ड दाखवतो हे पाहून मला माझे पहिले आयकार्ड आठवले.