भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर
मोकळा होतो श्वास, आभाळ रडून गेल्यावर
भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर
क्षितिजावरती हे नेमके, गर्द धुके दाटते
भास होती अंधाराचे, सूर्य गडून गेल्यावर
उघडतात मग हळूहळू, बंद कवाडे तेजाची
उघडा पडतो रवी हा, पाऊस निघून गेल्यावर
तू भिजतेस नेहमी, आठवणी मागे पडतात
हुरहूर होते मनाची, तू सोडून गेल्यावर
जरी भिजलेली असेल काल, ही 'प्रति’ ची गजल
भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर
©प्रतिक सोमवंशी
Insta @shabdalay