गहाणात ७/१२.....
गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे
कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे
रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?
अता अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे
बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे
कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?
खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
तुला कधी मिशा फुटणार?
पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर
पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर
काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?
राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर
तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच
आधी जरा साहेन मी
केव्हातरी सांगेन मी
अंधार जेथे एकटा
तेथे दिवा टांगेन मी
प्रीतीत बाजी हारलो
हारूनही जिंकेन मी
जादू तुझ्या डोळ्यातली
झाली नशा झिंगेन मी
राखेतुनी झालो उभा
आता कसा भंगेन मी
तुषार जोशी, नागपूर
ज्याची मनास भीती तेची घडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे
डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा?
मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने
त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा
दूरातूनी विराणी सनई उदास गाते
ह्रदयास घाव देती अन चौघडे अताशा
इतके जपून होते ह्रदयात ठेवले की
नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा
पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे-
मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा?
इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने
लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा
कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा
नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ?
ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा
जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा
संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो
गेली उडून माझ्या ओठावरील भाषा
माझे अबोलणेही भासे मला विषारी
कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा
आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला
माझा अनाम साथी असला सुना नकाशा
तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची
तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा
-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/