त्या दिवशीची ती बातमी वाचतांना चहाचा कप खालीच ठेवला. शहारे आले अंगावर..
सुखी संसाराची स्वप्नं पाहत नवविवाहित दांपत्य दुस-या शहराल निघालेलं आणि व-हाडी दोन तीन गाड्यांतून. एप्रिल मे च्या हंगामात सर्रास दिसणारं हे चित्रं. बसला शुभ विवाहाचे कापडी बॅनर्स झळकत असतात. लग्नाचे विधी, चालीरिती, मानपान , उकाडा, गर्दी यामुळे दिवसभराचा शीण येऊन अंग ठणकत असतं. नातेवाईक भेटले म्हणून उगाच गप्पाष्टकं पडलेली आणि दुपारी तीन पासून निघू निघू म्हणता म्हणता रात्रीचे आठ वाजतात आणि मग हा दिसतोय का, तो दिसतोय का... माझी पोरगी राहिली असा सावळा गोंधळ घालत गाड्या रात्रीच्या अकरा बाराच्या दरम्यान प्रत्यक्षात निघतात.
हा निर्बल अर्र निर्मल बाबा काय प्रकार आहे ?
सकाळी उठलं कि बघू त्या channal वर याची किरपा बरसत असते
असला चमडी वाटतो हा माणूस
म्हणजे समागम* भरवतो
समागम म्हणजे तसला नव्हे याची नोंद घ्यावी
काल दिमाखाने मातृदिन साजरा करणार्या माझ्यासकट तमाम पुरूषवर्गाला विचार करायला लावणारा लेख. तो नक्की कुठल्या विभागात आणि कसा पोस्ट करावा याचं मार्गदर्शन कृपया कुणीतरी करा.
*****************************************************
ब्लॉग माझा : ए, आई गं!
वंदना धर्माधिकारी , शनिवार , १२ मे २०१२
chaturang@expressindia.com
क्राईम पॅट्रोल दस्तक हा भारतीय समाजाचा लखलखीत आरसा आहे. इतर समाजांचा नसेलही किंवा असेलही, पण आपल्या समाजाचा आहे.
निवेदक अनुप सोनी हा रुबाबदार माणूस अत्यंत संवेदनशीलपणे सर्व नाजूक विषयांवर भाष्य करत 'गुन्हा करण्याची मानसिकता कोणत्या क्षणी तयार होते हे लोकांच्या लक्षात यावे' यावर उपयुक्त बोलतो.
हिंदी चित्रपट संगिताच्या सुवर्णकाळातले सर्वच संगितकार हे जनमानसातले हिरो होते. पडद्यावर कुणीही माठ असला तरी त्याची रसिकांना पर्वा नसायची. पण ही सगळी गाणी आपण ऐकतो तेव्हा एखाद्या गाण्यातला एखादा बासरीचा, व्हायोलीनचा, सतारचा किंवा अगदी ढोलकचा तुकडा आपल्याला घायाळ करून जातो आणि आपण त्या संगितकाराला दुवा देतो. पण प्रत्यक्षात चाल बांधणे या पलीकडे कित्येक संगितकारांचे कर्तृत्व नव्हते हे नंतर लोकांना माहिती होत गेले. गाण्यातल्या वाद्यांचे तुकडे, त्यांचे स्वरलेखन हे काम अॅरेंजर्स करायचे. त्याही पलीकडे जाऊन हे तुकडे (म्युझीक-पीसेस) प्रत्यक्ष वाजवणारे कलाकार मात्र कायमच उपेक्षीत राहीले.
.
विद्यमान राष्ट्रपतीमहोदयांचा कालावधी तीन महिनेच राहिला आहे. नंतरचे तीन महिने नव्या राष्ट्रपतींच्या " निरनिराळ्या सत्कार समारंभात आणि परदेश दौरा करण्यात " जाणार !
आमचा जीव इथे टांगणीला लागून राहिला आहे, याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही ? खरोखरच "भारतीय जनते"चा कळवळा येत असेल, तर एखाद्या राजकीय पक्षातल्या एखाद्या आमदार- नामदार- खासदाराने त्या क्रूरकर्मा कसाबची फाईल, सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन, लगेच राष्ट्रपतीमहोदयांपुढे "अत्यंत तातडीचे" असे संबंधितांचा शेरा मारून योग्य मार्गाला लावावी, ही "हात जोडून" विनंती !
काही दिवसांपूर्वी (वर्षे) थोडंफार लिहिलं होतं इथे. आता परत काही लिहावं असं वाटतंय. आहात कारे बाबांनो वाचायला?(वाचवायला) विशेषतः दिनेशदा, शुभांगी कुलकर्णी, साती, आगाऊ स्पेशली बेफिकीर?
लहानपणापासून कोकणात जातो आहे—चिपळूण, दापोली, आडे, पाडले, आंजर्ले, आणि आमचं केळशी. शाळेत असताना वार्षिक परीक्षा संपली की जे पळायचं कोकणात ते थेट जूनच्या पहिल्या आठवड्यात परतायचं हा आमचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम. त्यात मुक्काम आणि म्हणूनच जास्त वेळ घालवला आहे तो अर्थातच केळशीला. कालांतराने फार राहणं जमत नसलं तरी कोकणाबद्दल आणि विशेषत: केळशीबद्दल प्रचंड प्रेम, आकर्षण, आणि जिव्हाळा आहे तो तसूभरही कमी झालेला नाही.
१ भर रस्तावर एका ठीकाणी गर्दी दिसली, एक माणुस पडलेला होता आणी त्याच्या आजुबाजुला दोन चार स्त्रिया बसुन त्याच्या चेहयावर पाणी शिंपडत होत्या, काय झाले होते कोणालाच माहित नव्हते बहुतेक जण दुरुन बघुन गाडीचा वेग कमी करुन त्या कडे बघुन पुढे जात होते तेव्हढ्यात एक जोडपेही गाडीवरुन जात होते, माणुस गाडी थांबंवुन तिकडे जावु लागला तसे त्याला मागे खेचण्यात आले, अहो आजकाल काही खर नसते, कोणी दारु पिउन पडते, कोणी भांडणात जखमी हौउन पडते, तुम्ही कशाला नसत्या फ़ंदात पडता, चला लवकर....
हा शहरात मध्यवस्तीत घडलेला किस्सा.......
नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)
१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.