नकळत घडली चूक
==============
(कथा काल ऐशीच्या दशकातील).
आम्ही बोकलवाडी सेंट परषु (षु का शू?) माध्यमिक शाळेतील सातवी 'ड' मधली थोर मुलं भुक्कड अशोक सरांना 'पंखा' म्हणतो. त्याची शास्त्रीय कारणे दोन. एक तर शिकवताना टेबला खालून त्यांचे (गुलाबी बेलबोट्म घातलेले) सुकडे पाय कायम समोरच्या बाकाला हवा घातल्या सारखे हलतात आणि दुसरं चित्रकलेच्या देखण्या नयन खेतान बाई. आलं लक्षात? नसेल तर एव्हढच सांगतो त्या काळात खेतानचा पंखा फार पॉपुलर होता. फारच गार गार हवा हो. अतिशय ए वन. असो.
हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन
उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.