रुचकर मेजवानी - {आजीचा खाऊ } - { मोतीपाक} - { मनीमोहोर }
आपली खाद्य संकृती पंचक्रोशीच्या सीमा ओलांडून कधी पलीकडे गेली ते समजलं ही नाही. जिल्हा, प्रांत ह्यांच्या पलीकडे जाऊन आता आपण दुसऱ्या देशातले ही पदार्थ आपलेसे केले आहेत. घावन , आंबोळ्या ह्यांच्या बरोबर डोसे, अप्पम ह्यांनी ही न्ह्याहरी च्या ताटलीत मानाचे स्थान पटकावले आहे. आणि थलिपीठं, आणि कुरडया शेवया इतकाच नव्हे तर काकणभर अधिकच पिझ्झा आणि पास्ता आपल्याला आवडू लागला आहे. अर्थात त्यात काही गैर आहे असं ही नाही. सतत नावीन्याचा ध्यास, ओढ हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. ह्या मुळेच तर मानवाने इतकी प्रगती करून दाखवली आहे . असो.