गद्यलेखन
विविध दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य
ऑनलाईन प्रदीर्घ लिखाण वाचताना
हल्ली बरेच जण ऑनलाईन पुस्तकं वगैरे वाचतात. मला मात्र आजही पुस्तक हातात धरून वाचायला आवडतं. पुस्तक, मासिक असं काहीही. एक तर ते जवळ बाळगता येतं. डोळ्याला उजेडाचा त्रास नाही. लोळत वाचता येतं. सगळ्यातमहत्वाचां म्हणजे दीर्घ कथा असेल तर कुठपर्यंत आलीय कथा हे पान क्रमांक पाहून किंवा मार्कर, पेन, पेन्सिल असं काहीही ठेवून लक्षात ठेवता येतं. थोड्या वेळानं मग पुढची कथा कंटिन्यू करता येते.
वपु- भाग १
" ज्या मनाला आपण हळवं समजतो, ते तुफान बलदंड आणि मस्तवाल असतं. त्याला पर्याय चालत नाही. त्याला हरवलेली वस्तूच हवी असते....आणि दुरावलेली व्यक्ती ! सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही. कोणताही उपदेश उपदंशासारखा वाटतो. भक्तीरस सक्तीसारखा वाटतो. ' बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या ' हे सांगणं म्हणजे ' गाडीतलं पेट्रोल संपलंय, हे कुणाला सांगू नका, तसंच प्रवास करा ' असं म्हणण्यासारखं आहे !"
---वपु.
माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं
गेले दोन-तीन दिवस मी खूपच अस्वस्थ होते. त्याला कारणही तसेच होते - माझ्या मधाळ, एकसुरी संसारात अचानक काहितरी कमी आहे असे मला जाणवले. माझे डोळे खाडकन उघडले, त्या उघड्या डोळ्यांनी काहितरी वाचले आणि मला माझ्या संसारातील उणीव स्पष्ट दिसायला लागली. अचानकच जीवनात कसलीतरी पोकळी का काय म्हणतात ती जाणवायला लागली. हेच ते.... हेच कमी होते माझ्या घरात - विबासं! ही आपली खुपच बेसिक अशी नैसर्गिक आणि मानसिक गरज आहे असं कळल्यामुळे तर आजवर आपली फारच भावनिक कुचंबणा झाल्याचा साक्षात्कार झाला. मी काही वर्षांपूर्वी जशी होते तशीच राहिलेय या विचाराने भलतीच डिप्रेस्ड झाले आणि मी ठरवले ... आजवर जे जगले ते जगले ...
आता काय करावं? (एक जुनी (च) गोष्ट)
मायबोलीवरचं जुनं साहित्य पुन्हा इथं पोस्ट करायचं नाही असं ठरवलं होतं.
पण मधे एकदा शोधायचं म्हटलं तर इतका घाम गाळावा लागला.
स्वतःच्या शोधताना इतकी मारामारी तर इतरांच्या आवडलेल्या कथा शोधणं किती अवघड आहे ते कळलं.
कथाकथीचा घाट घालणार्याला सलाम...
तर ही मायबोलीवर मी लिहीलेली पहिली कथा.
वाड्याच्या दारातून पळत येताना बैठकीत पोहोचेपर्यंत तान्याला दम नव्हता. 'बाबासायब बाबासायब बाबासायब'
या हृदयीचे त्या हृदयी!
ही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. माबो वर टाकली होती पण तेव्हाचे अर्काइव्हज नाहीयेत. आणि तेव्हानंतर आता काही बदलही केलेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
"केवढा फुललाय चेहरा! काय विशेष आज?"
"आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय.."
"काय झालं काय एवढं? नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन!!"
"केलात पचका!! लावलीत वाट!!‘
"का? नाही आणलं काही त्यानं? मग काय झालंय? का काही विशेष? काही खावंसं वाटतंय का? मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं!!"
एक होती वैदेही
‘‘कसं वळलात गाण्याकडे? तुमच्या घरी गाण्याची पार्श्वभूमी आहे का?’’
‘‘नाही हो, घरात कोणीच गाणारं नाही. बाबांना गाण्याची आवड होती त्यामुळे त्यांनी क्लासला घातलं. मी आपलं जमेल ते शिकत होते. पण माझ्या गुरूंनी, सरनाईक बाईंनी माझ्यातली गायिका ओळखली आणि मला दत्तकच मागून घेतलं माझ्या वडलांकडून. तेव्हापासून रियाझ कधी थांबला नाही.’’
मी आणि नवा पाऊस
२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली कथा. जुन्या मायबोलीवरून इथे परत.
---------------------------------------------------------------------------------
‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा. त्याशिवाय का मे महिन्याच्या शेवटी शेवटी विद्यापीठात आलाय हा.
"मित्र?" माझा प्रश्न
एका हरण्याची गोष्ट
अडमाच्या लिस्टीत टाकण्यासाठी ही कथा परत टाकतेय इथे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात.
तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही. स्वतःला अजून दुखवून घेणं परवडण्यासारखं नव्हतं तिला.
Pages
