गद्यलेखन

आठवणींना उजाळा (जन्म कवितेचा)

Submitted by संतोष वाटपाडे on 2 November, 2015 - 04:37

या कवितेविषयी मला बरंच काही सांगायचंय खरं तर.....

मला आवडलेले पुस्तक - भाग १ - पोखिला

Submitted by कविता क्षीरसागर on 30 October, 2015 - 09:44

मला आवडलेले पुस्तक - भाग १ - पोखिला

पोखिला - अपहरणाचे ८१ दिवस

लेखक - डॉ . विलास बर्डेकर

नावापासूनच हे पुस्तक आपल्या मनाची पकड घ्यायला लागते . डॉ . विलास बर्डेकर यांच्या जीवनात
घडलेल्या त्या चित्त थरारक ८१ दिवसांची ही अनुभव मालिका .

फुलपाखरांच्या शोधात अरुणाचल प्रदेशाच्या जंगलात गेलेल्या या संशोधकाला बोडो दहशतवादी,
पत्रकार समजून चुकून पकडतात . त्यांचे अपहरण करतात . आणि तब्बल ८१ दिवस डॉ विलास यांना
या दहशत वाद्यांच्या ताब्यात राहावे लागते .

तेव्हाचे सर्व अनुभव अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत . जरी त्यांना तिथे ओलिस

शब्दखुणा: 

ये मोहमोहके धागे..

Submitted by नंदिनी on 29 October, 2015 - 05:04

ये मोह मोह के धागे...

खूप दिवसांनी असं काहीतरी ऐकलं. जीवाला गुंतवावं असं... कसा जीव गुंतला होता, नाजुक नाजुक दोर्यांणच्या वेढ्यांमध्ये. धागे सोडवावेत तरी कसे, थोडे माझ्या हातात, थोडे तुझ्या हातात. एकमेकांना स्पर्श न करता सोडवणं अशक्य... तू तिथं दूर मी इथं कुठंतरी. तरीपण एकमेकांच्या बोटांमधले गुंतलेले काहीतरी अनामिक, अपूर्ण, अर्धवट!

झोंबाड

Submitted by जव्हेरगंज on 28 October, 2015 - 19:09

आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला.

शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं.
"आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो.

सल …

Submitted by कविता क्षीरसागर on 28 October, 2015 - 12:42

सल ….

ऑफिस मधून बाहेर पडले . सकाळीच स्कूटी सर्विसिंगला दिली होती . आज रिक्षाने घरी जावे लागणार या विचाराने रिक्षासाठी मी रस्त्याच्या कडेला थांबले होते . (जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा सगळ्या रिक्षा कायम भरलेल्या कशा असतात? ) . काही वेळाने एक रिक्षा आली . मी हात दाखवला अन रिक्षात बसले. त्याने मीटर टाकत, मागे वळून मला विचारले ,"बहेनजी , कहा जाना है ? "

तो आवाज ऐकून मी एकदम चमकलेच. 'अरेच्या ! राझाकमिया इकडे कुठे ?' क्षणभर वाटून गेलं . मी नीट त्यांना पहिले तर ते राझाकमिया नव्हते . पण आवाजात विलक्षण साम्य होते .तो आवाज ऐकून माझं मन पाहता पाहता भूतकाळात गेलं .

शब्दखुणा: 

समुद्र ...!

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 October, 2015 - 07:34

हो !

नाही आवडत मला समुद्र ......!!

त्याची गुढ-गंभीर गाज मुग्धावते
फेसाळणारे किनारे लुभावतात

आकाशाच्या रंगात रंगणा-या,
सुर्य प्रकाशात चकाकणा-या,
चंद्र प्रकाशात लखाखणा-या
हिंदोळत्या पृष्ठभागाचही कोण कौतुक वाटत राहत !

वेळोवेळी आकाशाप्रमाणे बदलणारा रंग,
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा कानमंत्रच देत असतो जणू !!

आणि हो, तरिही नाही आवडत मला हा समुद्र ......!!

कारण तर विचारशील ?

अरे, थांग लागू देत नाही पठ्ठ्या आपला !
समोरच्याने लावत बसावेत
ज्याला जे हवे ते आपापले निकष
आपापल्या सोईने !
म्हणून मग मी ही शांत राहते !
तो जितका खवळलेला तितकीच शांत !!

नवरात्र कोकणातलं...

Submitted by मनीमोहोर on 24 October, 2015 - 11:00

कोकणात गौरी गणपतिचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो पण आमच्याकडे नवरात्र गणपती पेक्षा ही जास्त उत्साहाने साजरे केले जाते. त्याच काय आहे .... आम्ही रहायला कोकणात पण आमची कुलदेवता आहे लांब मराठवाड्यात.... अंबाजोगाईची श्रीयोगेश्वरी. आमच्या आधीच्या पिढ्या आर्थिक टंचाई आणि प्रवासाची अपुरी साधन यामुळे कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जाऊ नाही शकल्या म्हणून मग लाड, कौतुक उत्सव सगळं घरातल्या देवीचचं करायची प्रथा घातली गेली असेल. या वर्षी नवरात्रात कोकणात गेले होते. तो अनुभव इतका सुंदर होता की इथे शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये.

बहिणाईची गाणी … एक रसग्रहण

Submitted by कविता क्षीरसागर on 24 October, 2015 - 05:29

बहिणाईची गाणी …

आमच्या लायब्ररीत मी एका वेगळ्याच पुस्तकाच्या शोधात गेले होते. पण तिथे अचानक प्र. के. अत्रे संपादित "बहिणाईची गाणी" हे पुस्तक हाताला लागले . अलीबाबाच्या गुहेतला सारा खजिना मिळाल्यासारखा आनंद मला त्यादिवशी झाला
.
मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर

शब्दखुणा: 

ब्येनं

Submitted by जव्हेरगंज on 22 October, 2015 - 13:25

तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेल थोडा रिंगणात लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.

कबुतर जा जा जा …।

Submitted by कविता क्षीरसागर on 22 October, 2015 - 09:17

कबुतर जा जा जा …।

अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका ह . मी काही या कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाहीये की कसला संदेसा . अन संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की ' बाबा जा , जा . माझ्या आयुष्यातून , माझ्या नजरेसमोरून दूर कुठेतरी निघून जा "
आता तुम्ही म्हणाल की " का गं बाई, या छान , गोंडस पक्षाबद्दल तुला एवढा राग का ? किती निरुपद्रवी अन गोजिरवाणा दिसतो तो . "
पण हेच तुम्ही आमच्या बिल्डींग मध्ये वा आजूबाजूच्या मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा निरुपद्रवी वाटणारा पक्षीही किती ना ना प्रकारे उपद्रव देऊ शकतो ते . अहो इथे राहणे मुश्किल केलय यांनी .!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन