कबुतर जा जा जा …।
अहो उगीच गैरसमज करून घेऊ नका ह . मी काही या कबुतराबरोबर कुणाला चिट्ठी पाठवत नाहीये की कसला संदेसा . अन संदेसा असलाच तर तो या कबुतरालाच आहे की ' बाबा जा , जा . माझ्या आयुष्यातून , माझ्या नजरेसमोरून दूर कुठेतरी निघून जा "
आता तुम्ही म्हणाल की " का गं बाई, या छान , गोंडस पक्षाबद्दल तुला एवढा राग का ? किती निरुपद्रवी अन गोजिरवाणा दिसतो तो . "
पण हेच तुम्ही आमच्या बिल्डींग मध्ये वा आजूबाजूच्या मंडळींना विचाराल तर ते सांगतील की हा निरुपद्रवी वाटणारा पक्षीही किती ना ना प्रकारे उपद्रव देऊ शकतो ते . अहो इथे राहणे मुश्किल केलय यांनी .!
http://www.maayboli.com/node/55743
फातिमा माझ्या हातात तिकिट आणि पासपोर्ट ठेवून गेली आणि मला हर्षोल्हासाने नाचावसं वाटू लागलं. ओरडून सगळ्या जगाला सांगावसं वाटू लागलं की मी परत जाणार. मी माझ्या देशात परत जाणार. माझ्या सागरबरोबरच्या लग्नाचं भविष्य काय असेल मला माहित नव्हतं तरी मला माझ्या माणसात परत जायला मिळणार ह्याचा आनंद खूप जास्त होता. आज मी तो आनंद शब्दात मांडूच शकत नाही. अति आनंदाने मी ओक्साबोक्शी रडू लागले. जेनी तिथे आहे तिला काही सांगावं हे माझ्या लक्षातच नाही आलं.
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय.
मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु.
विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः
माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!
रांजणातलं गार पाणी पिऊन आबाला जरा तरतरी आली. अर्धा तांब्या पिऊन झाल्यावर राहिलेल्या पाण्यानं त्यानं तोंड धुतलं. पंच्यानं तोंड पुसत त्यानं अजुन एक तांब्या भरायला घेतला.
"उनाचं लय पाणी पीव नकु रं, डोस्क धरतं अशानं" म्हातारी तुळशीपाशी बसुन शेंगा निवडत म्हणाली.
आबानं एक ना दोन करत आख्खा तांब्या घटाघटा पिऊन टाकला. तोंडात राहिलेल्या पाण्याची चुळ भरत पिचकारी मारत म्हणाला " म्हातारे, लग्नाला का आली न्हाय?, वंदीनं तुझ्या नावाचा धोसरा काढला हुता"
गुढ
इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी.....
"शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला.
" व्वा,मित्रा आलास तु!! आणला का माझा निकाल?लवकर दे.आई यायच्या आत,लपवुन ठेवतो."
" शुभम,तु फक्त माझ्यासोबत चल." अजिंक्य अजुनही धापा टाकत होता.
"अरे पण कुठे ते तरी सांगशील?आणि निकाल कुठे आहे माझा?" शिवम.
निसर्गातले भाग्यक्षण .....
पहाटेसच जाग आली. मुख्य फाटकाचे कुलुप उघडण्यासाठी दिवा लावला आणि अंगणात पाऊल टाकताच लक्षात आलं कि दिव्याची आज अजिबात गरज नाहीये - किंबहुना दिवा नसण्यातच आज खूप मजा आहे. दिवा बंद करुन अंगणात येऊन पाहिलं तर आकाश अगदी निरभ्र. चांदोबा बिचारे चेहरा मुडपून आकाशात स्थिरावलेले - बहुतेक वद्य अष्टमी-नवमी असणार आज. चांदोबासारखा नटसम्राटच मवाळल्याने बाकीचे तारे -तारका आज भाव खात होते - मृगशीर्ष, व्याध नेमके डोक्यावर चमकताना दिसत होते. कृत्तिकेचा तारकापुंजही नीट ओळखू येत होता, वृषभ राशीचा तो मोठासा तारा पण उठून दिसत होता.
नुकतंच माझ्या सासर्यांनी (आम्ही सगळे त्यांना आप्पा म्हणतो) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. त्या निमित्तानी हा लेखनप्रपंच. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल.
त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात ते लिहिते.
आधीच्या भागानंतर बरीच गॅप आल्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.
मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066
*************************************************************************************************************
"हॅलो..."
"तू फोन करणार होतास ना?"
"हो.. म्हणजे, योगेशला विचारतो. त्याला माहिती असेल कदाचित." राहुलनी फोन योगेशला दिला.
"हॅलो...., मी योगेश बोलतोय.."
"सॉरी, फोनवर राहुल आहे कळालच नाही मला!"
"हो..."
"तुझ्या घरी फोन केला होता तेव्हा तू राहुलकडे आहेस असं सांगितल तुझ्या आईनी.."