आपण नेहमीच्या या जगात अनेक माणसे पाहतो. पण लक्ष न देता आपण आपले पुढे जात असतो. कधी साधा विचार सुद्धा करावासा वाटत नाही कि आपल्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये अशी कोणती भिन्नता आहे. तर , त्या दिवशी कांदिवली ला जाताना रेल्वे , बस असा प्रवास होणारच होता पण त्या प्रवासात एक गोष्ट अशी पाहायला मिळाली आणि लिहावसं वाटलं.
मिसळपाव
बरेचदा आपण वेगवेगळी माणसे पाहतो ज्यांचे विचार, आवडी-निवडी आणि बरंच काही जरी भिन्न असलं तरी आपण सगळेजण एका गोष्टीशी सारखेच जुळलेले आहोत ते म्हणजे खवय्येगिरी. रोज घरातील भाजीपोळी जरी प्रिय असली तरी बाहेर मिळणारे काही पदार्थ अगदी मन आनंदित करून जातात. त्यात पाणीपुरी, डोसा , वडापाव असे अनेक पदार्थ जरी असले तरी माझ्यामते ख्यातनाम असा एक पदार्थ अगदी सहजतेने कुठेही पाहायला माफ करा खायला मिळतो आणि तो म्हणजे मिसळपाव. उसळ, फरसाण मिसळून त्यात कांदा, कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळून बनवलेली मिसळ जणू तोंडाला पाणी आणते.
नवीन नाशिक महामार्गावरुन नाशिकला जाताना इगतपुरी जवळच काही डोंगर आपल्याला खुणावत असतात. आता पहिला पाऊस पडुन गेल्यानंतर सुंदर पोपटी रंगाच्या मखमालींनी वेढ्लेल्या ह्याडोंगर रांगात असलेले हे एक दुर्ग रत्न 
त्रिंगलवाडी गावामुळे किल्ल्याचे नावही त्रिंगलवाडी 

बळवंतगड आणि कावनई हे दोन किल्ले ही जवळपासच आहेत.
कळसुबाई डोंगररांगात हा भाग गणला जातो, इगतपुरी स्टेशन जवळूनही येथे पोहोचता येते आणि खाजगी वहानानेही पायथ्याच्या गावात पोहोचता येते. त्रिंगलवाडी धरणाच्या भिंती वरुनही वाट आहे.
बायको माहेरी जाऊन आज पाचवा दिवस उजाडला होता. गेले चार दिवस तिचे आयुष्यात नसणे फारसे जाणवले नाही, कारण कामाच्या व्यापात गुंतलो होतो, किंवा स्वताला गुंतवून ठेवले होते म्हणालात तरी चालेल. सकाळी उठल्याऊठल्या टॉवेल शोधण्यापासून चहा गरम करून देण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची आठवण यायची पण फारशी कमी जाणवायची नाही. आपले आपणच काहीतरी करू शकतो हे माहीत असायचे. दुपारी जेवताना आज डबा नाही तर बाहेर खावे लागणार म्हणून पुन्हा ती आठवायची, पण रोज रोज घरचा डबा खाण्यापेक्षा चार दिवस बाहेरचे खाऊन जीभेचे चोचले पुरवुया हा विचार करून बरेही वाटायचे.
मी आणि माझी पत्नी कुसुम, पहिल्यांदा जीवनात परदेश प्रवास केला दिनांक २३.०३.२०१२ ते २७.०३.२०१२ असा ५ दिवसाचा थायलंडचा प्रवास केसरी टूरच्या माध्यमातून केला.
मार्च महिन्याच्या कालावधीत वातावरण दिवसा थोडं गरम तर रात्रीला आल्हाददायक असते. मध्येमध्ये पावसाचे तुषार येऊन जात असल्याने वातावरणातील गरमपणा काही प्रमाणात कमी होत असतो. त्यामुळे केसरीने आम्हाला रेनकोट पण दिले होते. आम्ही ट्रॅव्हल बसमध्ये असतांना एकदा पट्टायाला पाऊस पडला होता. परंतु प्रत्यक्षात रेनकोटची तशी पूर्ण प्रवासात गरज पडली नाही.
मी राहत असलेल्या 'San Antonio ' ह्या शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा अर्थात 'public transport service' बेताच्या सोयीचीच होती. तुम्हाला जर कुठे बस ने जायचे असेल तर आधीपासून योजना आखायला लागायच्या. कारण बस ची 'फ्रीक्वेन्सी' ही दर एका तासाने अशी होती. अमेरिका हा कितीही विकसित देश असला तरीही काही प्रमुख शहरं सोडली तर सगळीकडे हीच तऱ्हा आहे. गाडी घेण्याची संस्कृती असलेल्या देशात ( ह्याचा संबंध कृपया श्रीमंतीशी लावू नये) गाडी न घेणाऱ्यांचे वांदे नाही झाले मगच आश्चर्य! आणि अमेरिकन सामान्य माणसं न्याहाळणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला गाडी घेऊन कसे चालेल?
मी त्या वेळेस आर्टीकल शीप करत होते. आमचे एक काम मुंबई शेअर बाजारात होते. मोठ्ठ्या ब्रोकर चे खूप काम आमचे सर करायचे. त्यामुळे खूपशी मुलं नेहेमी त्यांच्या ऑफिसला जायचो. एकदा गेले की ३-४ महिने आम्ही रोटेशन ने तिकडेच असायचो. मला तिकडे जाणं आवडायचं. याच कारण मला तो फोर्ट आणि आजूबाजूचा परिसर खूप आवडायचा. त्या ब्रोकरची दोन ऑफिसे होती. एक मोठ्ठ शेअर बाजाराच्या इमारती मध्ये आणि दुसरे त्याच्याच मागच्या बाजूला कर्हाड बँकेच्या इमारती मध्ये. आम्ही बर्याचदा कर्हाड बँकेच्या इमारती मध्ये बसायचो. शेअर बाजाराची इमारत आणि आमची इमारत ह्यात एक अगदी छोटा रस्ता होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल एवढा.
पुंडलीक वरदे हाआआआरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाआआआराम
पंढरीनाथ महाराज क्क्क्क्की ज्ज्ज्ज्ज्ज्जय
संक्रांतीला छाटला गेलेला पतंग दिवाळीला नीट अवस्थेत त्याच मालकाला मिळावा, चाळिसाव्या वर्षीही लग्नच ठरत नसलेल्या मुलीला प्रिन्स चार्ल्सने मागणी घालावी आणि सोमवारी सकाळी ऑफीसला पोचल्यावर कळावे की आज सुट्टी आहे तसे झाले...
काय वर्णावा माझ्या मनातील आनंद मायबापा?
असे क्षण फार कमी येतात... मागे एकदा माझ्या कडेवर बसलेलं एक निर्व्याज परकं बाळ त्याच्या बापाच्या हातात टेकवल्या टेकवल्या मुतलं होतं आणि माझा शर्ट पवित्र राहिला होता तेव्हा असा आनंद झाल्याचे आठवते...
http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Mayevina%20Bal%20Kshanbha...
मायेविन बाळ, क्षणभरी न राहे
न देखता होय, कासावीस ॥
आणिक उदंड, बुझाविती तरी
छंद त्या अंतरी, माऊलीचा ॥
नावडती तया, बोल आणिकांचे
देखोनिया नाचे, मायदृष्टी ॥
तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली
आणिकांचे बोली चाड नाही ॥
दिवसभर तापानं फणफणलीये पोर. दोन क्षणही खाली ठेवता आलं नाही. कसं करणार घरचं सगळं? गाई-गुजी, झाड-लोट, स्वयंपाकपाणी...
नमस्कार,
नक्की माहित नाही, तुला हे माहित कि नाही. माहिती असेल तरीही वाच एकदा. आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींचा त्रास होतो. सहन होत नाही. दुसऱ्याच ऐकायचा नसता. असा वाटतं सगळं जग खायला उठला आहे. आणि आपण अजूनच खचून जातो. असा वाटतं सगळं दुखः देवाने आपल्यालाच दिले आहे. आणि मग निराशेचा खेळ चालू होतो.