महाराष्ट्रदिन
केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.
केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.
मोहनदास करमचंद गांधी हा 'माणूस' व 'विचार' समजणं अतिशय कठीण. गांधीजींचं आयुष्य, एका सामान्य माणसाचं 'महात्मा' बनणं खरोखर अद्भुतरम्य आहे. गांधीजींना ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीविचार व गांधीचरित्र लेखन-कथन हा नारायणभाईंचा ध्यास आहे. 'मारु जीवन एज मारी वाणी' (माझे जीवन हाच माझा संदेश) या नावाने चार खंडांत त्यांनी गुजराती भाषेत गांधी चरित्र लिहिलं आहे.
माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.
पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.
“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “
गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.
फार पुर्वी, माझ्या जन्माच्या आधी माझे बाबा शिवचरित्र अख्यान सांगत. एक एक प्रसंग त्यांनी वर्णन करावा नी उपस्थित प्रेक्षकांनी तल्लीन होऊन जावे. जिजाऊ सती जाण्यास निघतात तो प्रसंग ऐकताना लोकांना अश्रु आवरत नसत. पूढे राजकीय क्षेत्रात वावर वाढला, पक्षातील जबाबदार्या वाढल्या तसा हा उपक्रम मागे पडला. आम्ही भावंडांनी प्रत्यक्ष कधी त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकलेच नव्हते. आता त्यांनी पुन्हा सांगायला सुरुवात करावी असे गेली बरीच वर्षं आम्ही सगळे त्यांना सांगतोय. पण तो योग काही जुळून येत नव्हता. गेल्या वर्षी काही निमित्ताने बाबांच्या मागे लागून एक भाग रेकॉर्ड करुन घेतला (कसा ती एक वेगळीच कथा होइल).
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२
भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.
मुंबईपुढचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात दुर्लक्षिला गेलेला प्रश्न कोणता असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा. मुंबईपुढचे पाणीटंचाईचे संकट दरवर्षी उग्र स्वरुप धारण करत आहे. पावसाळ्यात तानसा,वैतरणा,विहार्,मोडकसागर तलाव भरुन वाहू लागल्याच्या बातम्या एकेकाळी वर्तमानपत्रांमधे आल्या की आता उन्हाळ्यापर्यंत पाणी नक्की पुरणार असं समजून मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडायचा.
(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ.