सम्भाजी राजे.
.
लहानपण
संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
तसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच".
१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन 'रुस्तुम-ए-जमा' याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्यासोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा 'फाझलखान'. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला. खुद्द राजे मिरजेच्या किल्ल्याभोवती वेढा टाकून बसले. आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने 'सिद्दी जोहर'ला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले.
आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.