इतिहास

सम्भाजी राजे.

Submitted by dreams.jhep on 31 August, 2010 - 11:39

सम्भाजी राजे.
.
लहानपण

संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

विषय: 

परग्रहवासी आणि मनुष्यजन्म

Submitted by गुंड्याभाऊ on 29 August, 2010 - 07:07

तसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे "पृथ्विवर माणुस ऊपराच".

विषय: 

१४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ...

Submitted by सेनापती... on 23 August, 2010 - 22:11

१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन 'रुस्तुम-ए-जमा' याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्यासोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा 'फाझलखान'. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला. खुद्द राजे मिरजेच्या किल्ल्याभोवती वेढा टाकून बसले. आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने 'सिद्दी जोहर'ला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले.

विषय: 

पावनखिंडीचा रणसंग्राम... ३५० वर्षे पूर्ण ...

Submitted by सेनापती... on 17 August, 2010 - 00:15

आषाढ शुद्ध पौर्णिमा उर्फ़ गुरूपौर्णिमेच्या आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. या वर्षी गुरुपौर्णिमेला नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख...

विषय: 

१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...

Submitted by सेनापती... on 16 August, 2010 - 21:48

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले.

विषय: 

वेदकालीन संस्कृती भाग ५

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या |
असिक्न्या मरुद्व्र्धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ||
तर्ष्टामया परथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया |
तवं सिन्धो कुभया गोमतीं करुमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे || (ऋग्वेद १०|७५)

प्रकार: 

अन्नं वै प्राणा: (५)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

I am going to kill you, Rice Plate Reddy, and teach the whole world how to eat holy broccoli. Mind it. - Quick Gun Murugan

annamvai.jpg
प्रकार: 

जगभरातील मृत-जीवंत लिप्या

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जगभरातील पुरातन लिप्यांची थोडक्यात ओळख. ब्राह्मी लिहायला शिकत येइल कदाचीत... जुने टी.म.वी चे दिवस आठवले Happy

जगभरातील पुरातन लिप्या

विषय: 
प्रकार: 

जगभरातले गणिती

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

जगभरातील गणितींच्या बायोग्राफीज येथे वाचावयास मिळतील. काही भारतीय गणीती ह्यात सापडतीलः
जास्त वाचल्या गेलेल्या बायोग्राफीज
बायोग्रफीजची जंत्री -५००एडी - सद्यकाल

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास