वृत्तपत्र

भारतीय परराष्ट्र धोरणाला पूरक - युद्धनौकांची आखातात तैनाती

Submitted by पराग१२२६३ on 30 May, 2016 - 08:15

"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.

INS Delhi.jpg

बावनकशी- जिद्दीचा कैलास पर्वत!

Submitted by झुलेलाल on 28 May, 2016 - 12:24

या कथेतील पात्रे, प्रसंग काल्पनिक नाहीत. त्यामुळे या कथेतील जे काही आहे ते वास्तवच आहे. दोन दशकांच्या एका कालखंडाचे वास्तव. या वास्तवाने एका जगण्याला विस्तवाहूनही अधिक दाहक चटके दिले, पण ते जगणे डगमगले नाही. जिद्दीने वास्तवाशी झुंजत राहिले. जणू हे विधीलिखित कपाळावर लिहूनच आपल्याला देवाने इथे पाठवले आहे, या भावनेने ते जगणे आता आयुष्याचा अर्थ जगाला समजावण्यासाठी सज्ज झाले आहे.

अमेरिकेच्या आकाशात भारतीय हवाईदलाचे 'पक्षी'

Submitted by पराग१२२६३ on 15 May, 2016 - 06:03

‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.

l2016050483234.jpg

बेजबाबदार कोण अधिकारी की कंत्राटदार ?

Submitted by नितीनचंद्र on 19 April, 2016 - 01:11

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5028796491016038209&Se...

ही दैनीक सकाळ मधली आजची बातमी पहा.

दुर्लक्षित आंबेडकर

Submitted by घायल on 10 April, 2016 - 04:18

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही

आजची मराठी पत्रकारिता

Submitted by पराग१२२६३ on 21 March, 2016 - 23:22

ओबामा काय म्हणतायत, त्यांनी किती वर्षांच्या आजींची भेट घेतली किंवा कसा
डान्स केला, अमेरिकेत काय चालू आहे, कोणता नवा हँडसेट तिकडे बाजारात
आलेला आहे, चीन भारताला घेरतोय आणि कोणत्या तरी क्षुल्लक संशोधनातून
लक्षात आले आहे की पुरुष महिलांपेक्षा जास्त फळं खातात इ. अशाच
बातम्यांमध्ये रमून स्वतःतील दृष्टीदोष आणि अक्षमता लपविण्याची सवय मराठी
पत्रकारितेत काही वर्षांपासून भिनलेली आहे. त्यामुळे वाचकांपेक्षा
त्यांचे विश्व अतिशय संकुचित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा आणखी एक
पुरावा म्हणजे पुढील बातमी. भारतीय नौदलाच्या क्षमतेची दखल साऱ्या जगात

'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss'

Submitted by झंप्या दामले on 19 March, 2016 - 10:28

'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !! :
-------------------------------------------------------------------------
Dilgiri_1.jpg

लोकसत्ताने मागे घेतलेला अग्रलेख

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 19 March, 2016 - 10:12

‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.

मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.

http://www.loksatta.com/sampadkiya-category/aghralekh/

भारतीय टेलिव्हिजनमधील ऐतिहासिक एपिसोड - रवीशकुमारचे आभार

Submitted by घायल on 19 February, 2016 - 22:37

कालचा दिवस भारतीय टीव्ही पत्रकारितेतला एक ऐतिहासिक दिवस होता. अण्णांच्या आंदोलनापासून मिडीयाच्या दडपशाहीबद्दल नाराज असणारे हास्यास्पद प्राणी बनत चालले होते. तुम्ही बहुमतासोबत नसाल तर देशद्रोही पासून ते नैराश्य आलेले मानसिक रुग्ण इथपर्यंत ऐकून घ्यावं लागत होतं. वेगवेगळी मतं असणं ठीक. पण जे नेमकं शब्दात सांगता येत नव्हतं त्याला काल योग्य शब्द मिळाले आणि डीटीएच चं सबस्क्रीप्शन भरून मी पुन्हा टीव्ही जिवंत केला. आपल्या पैशांनी विकतचं दुखणं घरातच नको म्हणून माहीतीचे स्त्रोतच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेल्या माझ्यासारख्या (कदाचित) अल्पसंख्य लोकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

"इंद्रधनुष्य"

Submitted by salgaonkar.anup on 2 February, 2016 - 23:06

शीतयुग उलटले आणि शुभ्रवर्णी वसुंधरा शुभ्रवस्त्र परिधान करून ब्रम्हलोकी जगतनिर्माता ब्रम्ह देवासमोर येऊन उभी राहिली. ब्रम्ह देवाने तिचे स्वागत केले नि म्हणाले, " सांग वसुंधरे, काय इच्छा आहे तुझी ?"
यावर वसुंधरा उत्तरली " देवा, मला नवचैतन्य प्रदान करावं, जे स्व निर्मित असावं. "
ब्रम्ह देव तथास्तु म्हणाले आणि शुभ्रवर्णी वसुंधरेच्या कायेतून जन्म झाला रंगांचा.
तांबड्या लाल रंगाने तिच्या भाळी कुंकवाचा आकार घेतला.
नारिंगी नक्षीदार रंगाने तिचे हात रंगून गेले.
पिवळ्या रंगाने गळ्यात, हातात सुवर्णालंकार आकाराला येऊ लागले.
हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात खळखळू लागल्या.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वृत्तपत्र