* * * Here is a small fact * * *
You are going to die.
* * * Reaction to the aformentioned fact * * *
Does this worry you? I urge you - don't be afraid. I am nothing but fair.
बार्न्स अन नोबल्स मध्ये रिकमंडेड फॉर स्कुल रिडिंग सेक्शन मध्ये मला "बूक थीफ" दिसले, ते मी उचलून सहज चाळले. अन पहिल्या पानातच शॉक लागला.
मार्कस झुझॅक बद्दल मी वाचले होते, अगदी बूक थीफ बद्दलही ऐकले / वाचले होते. बाबा, अजून तुम्ही हे वाचले नाही? असे मागे कधी तरी मला माझ्या मुलीने विचारल्यावर मी अजून नाही, असे म्हणालेले आठवले. आणि लगेच हे पुस्तक घेतले.
आईच्या घनिष्ट परिचयाच्या दळवीबाईंनी 'कोवळी उन्हे' हे पुस्तक 'उदयला वाचायला द्या' असं आईला सांगितलं आणि आईने जेंव्हा 'कोवळी उन्हे' हे विजय तेंडुलकर यांचं पुस्तक मला वाचायला दिलं आणि जेंव्हा मी ते वाचून संपवलं,तेंव्हा कळलं वाचनानंद काय असतो ते! ही गोष्ट १९७४ सालची. साल नक्की लक्षात आहे कारण लगेच २/३ महिन्यात सिध्दांती (माझी जवळची मैत्रीण नंदिनी आत्मसिद्ध) ने,'सावित्री' हे पु.शि.रेगे यांचं पुस्तक हातात ठेवत, 'हे पुस्तक वाच.तुला आवडेल.'असं म्हटल्याचे लक्ख आठवतंय. सीगल हे बाख चं पुस्तक देखील नंदिनीनेच वाचायला दिल होतं. पूर्ण वाचलेलं ते माझं पाहिलं इंग्लिश पुस्तक.
भारतात पक्षीनिरीक्षकांची पंढरी म्हणता येईल अशी ३-४ महत्वाची ठिकाणे आहेत. सह्याद्री किंवा पश्चिम घाट (Western Ghat), कच्छचे रण, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड. यापैकी या आधी पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांविषयी मी लिहीलेले आहेच. आत्ता पर्यंत महाराष्ट्र कर्नाटका व गोवा या भागात फिरुन झाले आहे. तमिळनाडु, केरळा, पश्चिम बंगाल, गुजराथ व अरुणाचल अजुनही झालेले नाही.
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
गोपिकाच्या खुनाची सात वर्षे शिक्षा भोगल्यानंतरही विष्णु आपल्या भूतकाळाशी लढतोच आहे. त्या काळरात्रीची त्याची असलेली आठवण खरी आहे की खोटी ह्याबद्दल त्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे. डॉ सुजाता त्याच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि आयुष्याबरोबर समझोता करण्यासाठी त्याला मदत करायची तयारी दाखवते. पण सत्य काय आहे? त्यांना ते कधी कळेल का? आणि कळले तर विष्णूची त्या सत्याला सामोरे जायची तयारी आहे का????
झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!
स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष.
'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग.
स्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते.
या वर्षीच्या (अनेक) संकल्पांमध्ये संपूर्ण हेमिंग्वे नीट वाचायचे असाही एक आहे. आणि नीट वाचायचं म्हणजे त्याबद्दल लोकांना ते वाचावंसं वाटेल, इतकं नीट लिहायचं असाही उपसंकल्प आहे. जानेवारीत फॉर हूम द बेल टोल्स या हेमिंग्वेच्या बहुचर्चित पुस्तकापासून सुरुवात करायची ठरवली.
एक आणखी पुस्तकं वाचुन संपवल..नाही संपल म्हणुया..
श्री मिलिंद वाटवे यांच 'आरण्यक'..
खरतर लॅपटॉप बंद करुन ठेवलेला परत उघडला ते लिहिण्यासाठी. पुस्तक संपल्यावर ज्या काही भावना मनात उठतात त्या शिळ्या व्हायला नको म्हणुन लिहायला बसली.
खुप आवडावं, मनात रुतुन बसावं असं हे पुस्तक मला स्वतःला तरी वाटलं नाही पण एक प्रचंड ओढ मात्र जाणवली ते वाचताना..माणुस तल्लीन होऊन जातो तसं काहीसं..
कालचं डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिलेलं पहिलंवहिलं पुस्तक 'वृक्षगान' वाचुन काढलं.
येथे असलेल्या निसर्गप्रमी माबोकर शांकलीकडून याबद्दल ऐकलं होत आणि वाचायच पक्क केलं.
सुंदर, अप्रतिम अनुभूती.