सातवीत शिकणारा राहुलला यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची खूप उत्सुकतेने वाट बघत होता. कारणही तसंच होतं म्हणा! यंदा दिवाळीच्या भाऊबीजेला तो त्याच्या आईबाबांबरोबर नागपूरजवळच्या, वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा जंगलातील अभयारण्यात सफारीसाठी जाणार होता. त्याची आत्या नागपूरला रहात होती. आत्याचे कुटुंबपण ताडोबाला येणार होते त्यामुळे यंदाची भाऊबीज अगदी वेगळी आणि मजेची जाणार होती. शिवाय राहुलच्या बाबांनी घेतलेल्या नवीन कारमधून, नव्यानेच बनलेल्या मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गावरून ते ताडोबासाठीचा प्रवास जाणार होते त्यामुळे राहुल प्रवासासाठी आणखीनच उल्हसित झाला होता.
नुकतीच मी फॅमिलीसहित ऐतिहासीक (गड, किल्ले) आणि धार्मिक सहल (मंदिरे) पार पाडली. मला आणि माझी सौ. मंजुषा दोघांना इतिहासाची आवड असल्याने आम्ही जमेल तसे ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत असतो. तसेच पुण्यातील टेकड्यांवर भ्रमंती करतो. मुलांना पण आपल्या महान महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत व्हावा हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश. त्याचे प्रवासवर्णन खाली देत आहे. एसटी आणि इतर सार्वजनिक वाहनांनी आम्ही पूर्ण प्रवास पार पाडला. हा प्रवास अगदी शंभर टक्के नियोजित नव्हता.
दिवस पाहिला (10 Feb 2023)
पुण्याहून सातारा शहराकडे:
खूप दिवसांनी वश्या दिसला. आधीच कळकट ध्यान, त्यात मांजरवक्या रंगाचं ढोपरापर्यंत ओघळलेली हुडी, पायात मात्र फ्लुरोसंट रंगाचे स्पोर्ट शूज होते. आम्ही, म्हणजे मी अन श्याम्या, मुडक्याच्या 'टी शाप' मध्ये बसलो होतो.
"सुरश्या, आलं बघ वश्याच ध्यान!" श्याम्या खाली मुंडी घालून, चहात खारी बुडवून खाताना पुटपुटला. तोवर वेश्या जवळ आला. त्याने नाकाला एका हाताने रुमाल लावला होता. सतराशे साठ खिशे असलेल्या पॅंटीच्या एका खीशातून, दुसऱ्या हाताने एक टिशू पेपर काढून, त्याने आधी बाकड्यावरली धूळ साफ केली. मग उगाच खांदे उडवत शेजारी बसला.
पहाटेच्या प्रकरणाने आता भाऊश्या निमूटपणे येणार हे आम्हाला माहितीच होते. त्यामुळे आम्ही दोघेही बिनधास्त होतो. त्याला काय आणायचे आहे आणि काय नाही आणायचे हे ब्रिफ करून हितेश पुन्हा झोपी गेला. दुपारी १ ला निघायचा असल्यामुळे सगळे निवांत होते. दुपारी १:०० ला मी आणि हितेश स्टॅन्ड वर भेटलो
पहिलेच लेखन ! काही चुकलंच तर लहान बाळ समजून माफ करा ...
पुण्याहून सिकंदराबादपर्यंत शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याचा बेत नुकताच आखला. दिवस निश्चित केला. मधला दिवस असल्याने आणि परीक्षांचे दिवस असल्याने आरक्षणही भरपूर शिल्लक होतं. शताब्दीतून फेरफटका मारायचा असल्याने पहाटे पुण्याहून निघून लगेच त्याच गाडीने परत पुण्यात यायचं होतं. असं मागं दोनवेळा केलेलं होतंच. अशा प्रवासानंतर खरंच प्रचंड उत्साही आणि समाधानी वाटतं. या दोन्ही बाबी इतर कशातूनही मिळतील असं मला वाटत नाही.