साहित्य

प्लॅटफॉर्म नंबर झिरो - अमिता नायडू

Submitted by चिनूक्स on 24 August, 2011 - 21:57

रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्‍या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं.

रसग्रहण स्पर्धा- 'कुहू' लेखिका: कविता महाजन

Submitted by शर्मिला फडके on 23 August, 2011 - 14:55

कुहू
लेखिका- कविता महाजन
प्रकाशक- कविता महाजन, दिशा क्रिएटिव्हज
मूल्य- रु.१५००/-
प्रथम आवृत्त्ती- जानेवारी-२०११

'कुहू'ही कविता महाजनांची मल्टिमिडिया कादंबरी.
मल्टीमीडिया कादंबरी आहे म्हणजे नेमकं काय? अगदी थोडक्यात सांगायचं तर कुहू हे एक टीव्ही अथवा संगणकावर बघत ऐकण्याचे पुस्तक आहे. ही कादंबरी तुम्ही वाचूही शकता आणि पाहूही शकता. अनेक कलांचा संगम असलेलं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा कलात्मक वापर करुन बनलेलं हे मिश्रमाध्यमातील हे ‘पुस्तक. भारतीय साहित्यातला हा पहिलाच प्रयोग..

रसग्रहण स्पर्धा - 'गोष्टीवेल्हाळ' - ले. मधुकर धर्मापुरीकर.

Submitted by ललिता-प्रीति on 13 August, 2011 - 07:21

टपोर्‍या मोत्यांचा एखादा सुरेखसा सर असतो. त्यातला प्रत्येक मोती त्याच्या घाटदार आकाराने पटकन डोळ्यांत भरतो. ‘गोष्टीवेल्हाळ’ हा मधुकर धर्मापुरीकरलिखित कथासंग्रह अश्याच मोत्यांच्या सराप्रमाणे आहे.

रसग्रहण स्पर्धा- 'त्या वर्षी' लेखिका: शांता गोखले

Submitted by शर्मिला फडके on 9 August, 2011 - 09:57

त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये

शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी. त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक, बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे, काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली. ना कुठे जाहिरात ना बोलबाला.

रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील

Submitted by केदार on 2 August, 2011 - 23:57

अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११

खरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.

विषय: 
शब्दखुणा: 

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

Submitted by अभय आर्वीकर on 27 July, 2011 - 08:43

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ!

Submitted by केदार on 4 July, 2011 - 23:23

भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.

बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे

Submitted by चिनूक्स on 21 June, 2011 - 11:37

जागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त.

सापशिडी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

'अमरेन्द्रा, ही बातमी पाहिलीस का'?, सिरीअल तोंडात ढकलत संगणकावरील बातम्यांवर दररोजप्रमाणे नजर फिरवीत युवराजने विचारले.
'कोणती, ती माकडचेष्टांची'?, त्याला पुर्ण बोलु न देताच पटावरील सोंगट्यांवरुन नजर न काढता अमरेंद्र बोलला.
'तुला कसे कळले की मी त्याच बातमीबद्दल बोलतोय म्हणुन'?, युवराज आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.
'आम्हाला डिटेक्टीव्ह मांजरेकर उगीचच म्हणतात का लोक'?
'तेही खरेच म्हणा, पण तरीही'?
'अरे, सोपे आहे. लक्ष वेधुन घेणारी तीच एक बातमी आहे आज'.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पुस्तक परिचय : 'द फर्म'

Submitted by ललिता-प्रीति on 16 April, 2011 - 00:31

रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.

-------------------------------

विषय: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य