समकालीन प्रकाशन

रसग्रहण स्पर्धा - परत मायभूमीकडे - डॉ. संग्राम पाटील

Submitted by आर्फी on 1 September, 2011 - 00:01

पुस्तकाचं नाव - परत मायभूमीकडे
लेखक - डॉ. संग्राम पाटील
प्रकाशक - समकालीन प्रकाशन
प्रथम आवृत्ती - ६ मार्च, २०११
-------------------------------------------------------------

प्लॅटफॉर्म नंबर झिरो - अमिता नायडू

Submitted by चिनूक्स on 24 August, 2011 - 21:57

रेल्वे स्टेशनावर, किंवा रस्त्यांवर गर्दीत बरेचदा फाटक्या, मळक्या कपड्यातला एखादा बारका हात आपल्या समोर येतो. आपण सवयीनं तिकडं दुर्लक्ष करतो. फारच मागे लागला, तर पोलिसांकडे द्यायची धमकी देतो. मग तो हात दुसर्‍या कोणासमोर पसरला जातो. हा पसरलेला हात कोणाचा याचा विचार क्षणभरसुद्धा आपण करत नाही, इतकं हे आपल्याला सवयीचं झालेलं असतं.

कर के देखो - संपा. श्री. सदा डुंबरे

Submitted by चिनूक्स on 1 June, 2010 - 08:01

दांडीयात्रेच्या वेळी गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आखला होता. पण त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल शंका असणारे, घेणारे भरपूर होते. या मिठाच्या सत्याग्रहानं नक्की काय साध्य होणार? ब्रिटिश सत्ता हलायचीसुद्धा नाही तुमच्या चिमूटभर मिठाने.. अशी शंका घेणारे केवळ सामान्य लोकच नव्हते, तर मोतीलालजी नेहरूंसारखे नेतेही होते. मोतीलालजींनी गांधीजींना एक मोठ्ठं बावीस पानी पत्र लिहिलं. मोतीलालजी होते बॅरिस्टर. त्यांना नवीन मुद्दे मांडून समोरच्याला नामोहरम कसं करायचं, ते पुरतं ठाऊक होतं. 'या सत्याग्रहानं काहीही साध्य होणार नाही. झालंच तर हसं होईल.

Subscribe to RSS - समकालीन प्रकाशन